Breaking News

महत्वाच्या बातम्या

माजी केंद्रीय मंत्री जितीन प्रसाद भाजपमध्ये

नवी दिल्ली ः वृत्तसंस्थापुढील वर्षी होणार्‍या उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीच्या आधीच काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. यूपीए-2च्या काळात केंद्रात मंत्रिपदी राहिलेले यूपीतील वरिष्ठ नेते जितीन प्रसाद यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या उपस्थितीत जितीन प्रसाद यांनी बुधवारी (दि. 9) भाजपचा …

Read More »

लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावासाठी गुरुवारी मानवी साखळी आदोलन

विमानतळ कृती समिती वेधणार सरकारचे लक्ष पनवेल ः रामप्रहर वृत्तनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचेच नाव द्यावे, या रायगड, ठाणे, पालघर, मुंबई आदी जिल्ह्यांतील लोकप्रतिनिधी, प्रकल्पग्रस्त, शेतकरी, कष्टकरी, ओबीसींसह विविध समाजातील जनतेच्या मागणीकडे राज्य सरकार दुर्लक्ष करीत असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेली बैठकही अयशस्वी ठरली …

Read More »

रायगडला पावसाने झोडपले आज अतिवृष्टीचा इशारा

अलिबाग ः प्रतिनिधीरायगड जिल्ह्यात बुधवारी (दि. 9) पावसाने दमदार हजेरी लावली. सकाळपासूनच पावसाच्या जोरदार सरी बरसत होत्या. त्यामुळे कामावर जाणार्‍या नागरिकांची त्रेधातिरपिट उडाल्याचे दिसून आले. जिल्ह्यात गेल्या 24 तासांत सरासरी 58.99 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने पुढील 48 तासांत रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.रायगड …

Read More »

‘पोस्को’च्या सांडपाण्याने नैसर्गिक जलस्रोत दूषित

कडापे ग्रामपंचायतीचा आंदोलनाचा इशारा माणगाव : प्रतिनिधीपोस्को स्टील कंपनीतील केमिकल मिश्रीत सांडपाण्यामुळे परिसरातील नैसर्गिक जलस्त्रोत प्रदूषित होत आहेत. या दुषीत पाण्यामुळे कडापे (ता. माणगाव) सह अनेक ग्रामपंचायतीमधील ग्रामस्थांना विविध आजारांना तोंड द्यावे लागत आहे. पोस्को कंपनीने कडापे ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थांना शुध्द पाणीपुरवठा करावा, अन्यथा उग्र आंदोलन करण्याचा इशारा कडापे ग्रामपंचायतीचे …

Read More »

आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील पुनर्वसनाकडे दुर्लक्ष?

महाड आणि पोलादपूर तालुक्यातील दरडग्रस्त गावांचे पुनर्वसन होण्यासाठी 2005मध्ये आपत्ती व्यवस्थापन कायद्यामध्ये सुधारणा करण्यात आली होती,  मात्र पोलादपूर तालुक्यात पुनर्वसनाला हरताळ फासला गेल्याने आपत्तीग्रस्तांना या कायद्यामुळे अद्याप न्याय मिळाला नसल्याची परिस्थिती कायम आहे.पोलादपूर तालुक्यातील 25 गावांना पूर आणि दरडींचा धोका असल्याचे आपत्कालीन यंत्रणेने जाहीर केले आहे, मात्र पुनर्वसनासंदर्भात ग्रामस्थांमध्ये प्रचंड …

Read More »

लसीकरणाबाबत आदिवासी समाजात संभ्रम; खालापुरात प्रशासन, सामाजिक संघटनांकडून जनजागृती

खोपोली : प्रतिनिधी कोरोना प्रतिबंधक लसीबाबत खालापूर तालुक्यातील आदिवासी समाजात विविध प्रकारचे गैरसमज असून, लस घेण्यासाठी टाळाटाळ होत असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. जनजागृतीसाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत. कोरोनापासून बचावासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. मास्क, सामाजिक अंतर आणि लॉकडाऊनचे पर्याय यांनीसुद्धा कोरोना आटोक्यात येत नसल्याने आरोग्य यंत्रणेवर …

Read More »

तीन तिघाडा काम बिघाडा

मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, शेतकर्‍यांचा पीक विमा, वादळग्रस्तांना साह्य, कांजूरमार्गची प्रस्तावित मेट्रो कारशेड, अभिजात मराठी भाषा आणि माननीय राज्यपालांकडे प्रस्तावित असलेला 12 आमदारांच्या नियुक्तीचा प्रश्न यांसारखे छोटेमोठे मुद्दे घेऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण या तिघांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी पंतप्रधानांशी तब्बल पावणेदोन तास चर्चा केली. शिष्टमंडळाने पंतप्रधानांसमोर …

Read More »

विनाकारण फिरणार्‍यांची अँटीजेन टेस्ट; सुधागडात आढळले सात कोरोना पॉझिटिव्ह

पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यात विनाकारण व विनामास्क फिरणार्‍यांची 63 जणांची सोमवारी (दि. 7) पाली, परळी व उन्हेरे फाट्यावर तालुका आरोग्य विभागाकडून अँटीजेन टेस्ट करण्यात आली. यामध्ये तब्बल सात जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत मढवी यांनी दिली. पालीमध्ये झालेल्या कारवाईत नगरपंचायत शिपाई प्रवीण थळे, …

Read More »

रायगडात उद्यापासून अतिवृष्टीचा इशारा; दरडग्रस्त गावांमधील लोकांचे होणार स्थलांतर

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात दोन दिवस (दि. 10 व 11) अतिवृष्टी होण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे समुद्रकिनार्‍यावरील 62 गावे, खाडीकिनार्‍यावरील 128 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यातील 20 दरडग्रस्त गावांमधील लोकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात येणार आहे. मुबईसह उत्तर कोकणमध्ये 10 व 11 जून रोजी अतिवृष्टी …

Read More »

नियोजित डोलवी प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध; जमीन मोजणीसाठी आलेल्या अधिकार्यांना रोखले

पेण : प्रतिनिधी तालुक्यातील काराव-गडब, डोलवी, वडखळ, बोरी ग्रामपंचायत परिसरात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) डोलवी औद्योगिक वसाहत विकसित करीत आहे. त्यासाठी सोमवारी (दि. 7) एमआयडीसी आणि भूमिअभिलेख विभागाच्या अधिकार्‍यांनी भूसंपादन करण्याचा प्रयत्न केला. त्याला शेतकर्‍यांनी तीव्र विरोध केला. त्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते. डोलवी औद्योगिक वसाहतीसाठी एमआयडीसी …

Read More »