Breaking News

महत्वाच्या बातम्या

रेल्वे कर्मचार्‍याने वाचविले चिमुकल्याचे प्राण

वांगणी स्थानकावर थरार कर्जत ः बातमीदारपॉईंटमन मयूर शेळके यांच्या प्रसंगावधानाने रेल्वे रुळावर पडलेल्या एका चिमुकल्याचे प्राण वाचले आहेत. वांगणी रेल्वेस्थानकात शनिवारी (दि. 17) ही घटना घडली. काळजाचा ठोका चुकवणारा हा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला आहे.वांगणी रेल्वेस्थानकातील प्लॅटफॉर्मवर एक अंध महिला शनिवारी संध्याकाळी 5च्या सुमारास मुलासह चालत होती. चालता …

Read More »

बनावट सोनेप्रकरणी आंतरराज्य टोळी जेरबंद

एका महिलेसह चौघांना बेड्या; 68 लाखांचा मुद्देमाल हस्तगत अलिबाग ः प्रतिनिधीसोन्याचे शिक्के देतो असे सांगून चक्क पितळेचे शिक्के देत गंडा घालणार्‍या आंतरराज्य टोळीला जेरबंद करण्यात रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला यश आले आहे. यात चार आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून, त्यात एका महिलेचाही समावेश आहे.प्रभूभाई गुलशनभाई सोलंकी ऊर्फ कल्पेश …

Read More »

उद्धव ठाकरेंनी पीपीई किट घालून बाहेर पडावे

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा सल्ला पुणे ः प्रतिनिधीराज्यातील कोरोना संकट दिवसेंदिवस गडद होत असून, त्याचा अतिरिक्त भार आरोग्य यंत्रणेवर पडत आहे. राज्यात निर्माण झालेल्या ऑक्सिजनच्या तुटवड्यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पीपीई किट घालून घराबाहेर पडत कारखानदारांच्या भेटीगाठी घेण्याचा सल्ला दिला आहे.पाटील यांनी पुण्यात झालेल्या पत्रकार …

Read More »

देशातील रुग्णसंख्येचा नवा उच्चांक; एकूण दीड कोटींचा टप्पाही पार

नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाजगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 14 कोटींवर गेली आहे, तर लाखो लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतातही कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, देशातील रुग्णसंख्येने आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे.आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात सोमवारी (दि. 19) सकाळी संपलेल्या 24 तासांमध्ये कोरोनाचे तब्बल …

Read More »

राज्यात संपूर्ण लॉकडाऊन?

मंत्री वडेट्टीवार यांचे संकेत; दोन दिवसांत निर्णय मुंबई ः प्रतिनिधीराज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन लागण्याचे संकेत दिले आहेत. मुख्यमंत्री दोन दिवसांत या संबंधी निर्णय घेतील, अशी माहिती त्यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत दिली. दिल्लीत नुकताच सहा दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेला असून, त्याची …

Read More »

लॉकडाऊनमुळे माठविक्रेतेही संकटात; वाढत्या कोरोनामुळे ग्राहकांची खरेदीकडे पाठ

उरण : वार्ताहर दरवर्षी उन्हाळ्याची चाहूललागताच गार पाण्यासाठी गरिबांचा फ्रीज म्हणून ओळखल्या जाणार्‍या माठाची मागणी वाढते. यामुळे माठ विक्री व्यावसायिकांना यंदाच्या वर्षी तरी काहिसा दिलासा मिळणार असल्याचे चित्र सुरुवातीला दिसत होते, मात्र कोरोनाच्या दुसर्‍या टप्प्यामुळे माठ खरेदी करण्यास कोणीही येत नसल्याने गरिबांचा फ्रीज ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहे. एप्रिल महिना सुरू झाला …

Read More »

हातावर पोट असलेल्यांना खांदेश्वर पोलिसांची मदत

पनवेल : वार्ताहर हातावर पोट असलेल्या गोरगरीब बांधवांसाठी मदतीचा हात म्हणून खांदेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक देवीदास सोनावणे व त्यांचे सहकारी धावले. या बांधवांसाठी त्यांनी गेल्या चार दिवसांपासून सकाळ-संध्याकाळ जेवण तसेच मास्कचे वाटप केले आहे. लॉकडाऊनचा कालावधी वाढविण्यात आल्यामुळे तसेच शुक्रवार ते सोमवार सकाळपर्यंत लॉकडाऊन कडक पाळण्यात येत असल्याने मोलमजुरी …

Read More »

‘कोविशिल्ड’चे 20 हजार डोस मनपाला प्राप्त

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त येथील महानगरपालिका क्षेत्रातील 49 केंद्रांवर कोविड लसीकरण केले जात असून दररोज साधारणत: सात हजाराहून अधिक नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. आतापर्यंत एक लाख 75 हजार 873 नागरिकांचे लसीकरण पूर्ण झालेले आहे. त्यामध्ये शासनाकडून आणखी 20 हजार कोविशिल्ड लसींचा साठा प्राप्त झालेला असून सर्व लसीकरण केंद्रांवर …

Read More »

नवी मुंबईत दिल्लीतील टोळ्यांचा सुळसुळाट; कर्ज, नोकरीच्या बहाण्याने अनेकांची फसवणूक

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त स्मार्ट सिटी म्हणून नावलौकिक मिळत असलेल्या नवी मुंबईत दिल्लीतले गुन्हेगार डोके वर काढत असल्याचे पाहायला मिळत आहे. भाडोत्री जागेत कार्यालये थाटून बनावट कंपन्यांच्या माध्यमातून ही फसवणूक होत आहे. अशाच एका टोळीचा उलगडा वाशी पोलिसांनी केला आहे. नोकरी, व्यवसायाच्या बहाण्याने तसेच कर्जाचे आमिष दाखवून फसवणूक होत …

Read More »

चिंताजनक! नवी मुंबईत मृत्यूदर वाढला; दोन महिन्यांत 150 जणांनी गमावले प्राण

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त राज्यात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. रुग्णांच्या दैनंदिन वाढीमुळे आरोग्य सुविधांच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सुद्धा घटले आहे. यातच कोरोनामुळे रुग्ण दगावण्याचे प्रमाण सुध्दा चिंताजनक आहे.  नवी मुंबईतील मृत्युदरात वाढ झाली असून दोन महिन्यांत 150 जणांनी आपले प्राण …

Read More »