Breaking News

महत्वाच्या बातम्या

कुंबळेंच्या क्रिकेट समितीवर कोहलीचा निशाणा

चेन्नई ः वृत्तसंस्था इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताचा 227 धावांनी पराभव झाला. यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहचण्याचे भारताचे अलंडविरुद्धच्या पराभवानंतर विराट कोहलीने अनिल कुंबळेंच्या नेतृत्वातील आयसीसी क्रिकेट समितीवर निशाणा साधला आहे.कोरोना लॉकडाऊनमुळे मागच्या वर्षी फार टेस्ट खेळल्या गेल्या नाहीत. त्यामुळे कुंबळेंच्या नेतृत्वातील आयसीसी क्रिकेट समितीने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या नियमांमध्ये बदल केले. …

Read More »

दुसर्‍या कसोटीत अँडरसनला विश्रांती

चेन्नई ः वृत्तसंस्थाभारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीत इंग्लंडचा 227 धावांनी दणदणीत विजय झाला. भारतातील इंग्लंडचा हा सगळ्यात मोठा विजय होता. इंग्लंडचा कर्णधार ज्यो रूटचे द्विशतक आणि जलद गोलंदाज जेम्स अँडरसनच्या भेदक गोलंदाजीमुळे इंग्लंडने हा विजय साकारला, पण आता दुसर्‍या कसोटीत अँडरसनला विश्रांती दिली जाऊ शकते. इंग्लंडचे मुख्य प्रशिक्षक क्रिस सिल्व्हरवूड यांनी याबाबतचे …

Read More »

भारतीय संघ दुखापतींच्या फेर्‍यात; पाच खेळाडू अनफिट

चेन्नई ः वृत्तसंस्थाभारताला इंग्लंडविरुद्धचा पहिला कसोटी सामना गमवावा लागला. त्यानंतर दुसर्‍या सामन्यासाठी संघ निवड ही भारतीय संघासाठी महत्त्वाची आहे, पण भारतीय संघ अजूनही दुखापतींच्या फेर्‍यांमध्ये अडकलेला पाहायला मिळत आहे. कारण भारताचे पाच खेळाडू अजूनही अनफिट ठरले आहेत. त्यामुळे भारतीय संघासाठी हा एक मोठा धक्काच असेल. परिणामी भारतीय संघासमोर आता जास्त …

Read More »

महावितरणने वीज जोडण्या तोडल्याने कर्जत-कळंब भागातील आदिवासीवाड्या अंधारात

कर्जत : बातमीदार थकीत वीज बिल न भरल्याने कर्जत तालुक्यातील कळंब ग्रुपग्रामपंचायत हद्दीतील तीन आदिवासी वाड्यांमधील  45घरांच्या वीज जोडण्या तोडण्यात आल्या आहेत. या कारवाईचा निषेध करून, सर्व आदिवासींच्या वीज जोडण्या त्वरित पुर्ववत कराव्यात, अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करू, असा इशारा कळंब भागातील कार्यकर्ते शिवराम बदे यांनी महावितरणला दिला आहे. कळंब …

Read More »

शेकडोहून अधिक भाजप कार्यकर्त्यांची टीएमसीच्या गुंडांकडून हत्या -अमित शाह

नवी दिल्ली ः वृत्तसंस्थापश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. भाजपा व टीमसीमध्ये जोरदार संघर्ष पाहायला मिळत आहे. गुरुवारी (दि. 11) कुचबिहारमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एका सभेत बोलताना टीएमसीवर जोरदार हल्ला चढवला. बंगालमध्ये ममता बॅनर्जी गुंडांच्या बळावर निवडणूक जिंकतात. आतापर्यंत 130पेक्षा अधिक भाजप कार्यकर्त्यांची टीएमसीच्या गुंडांनी …

Read More »

पाटणेश्वर देवस्थानच्या विकासासाठी कटिबद्ध भाजप जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांची ग्वाही

पेण : प्रतिनिधी  श्री क्षेत्र पाटणेश्वर देवस्थानासाठी काम करू तेवढे कमीच आहे. त्यामुळे पाटणेश्वर क्षेत्राचा विकास या पुढेही मोठ्या प्रमाणात करणार आहोत. येथील रस्त्याचे  काम आणि तलाव सुशोभीकरणासाठी आमदार निधीचा वापर करणार असल्याचे प्रतिपादन भाजप जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांनी येथे केले. पेण तालुक्यातील पाटणेश्वर येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ वैकुंठ …

Read More »

‘गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी राज्यव्यापी दुर्ग महासंघ’

कोल्हापूर ः प्रतिनिधीराज्यातील गडकिल्ल्यांचे जतन, संवर्धन करण्यासाठी दुर्गप्रेमी संस्थांचा राज्यव्यापी दुर्ग महासंघ स्थापन करण्यात येत आहे, अशी घोषणा रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष, खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी गुरुवारी (दि. 11) येथे केली. खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या 50व्या जन्मदिवसानिमित्त दुसर्‍या दुर्ग परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मार्गदर्शन करताना ते बोलत …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांचा पुणे महापालिकेसाठी स्वबळाचा नारा

पुणे ः प्रतिनिधीआगामी काळात पुणे महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांसाठी आतापासूनच भाजपसह विविध राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली. त्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा दिला आहे, तसेच आम्हाला कोणाची गरज नाही. आम्ही आमच्याच ताकदीवर निवडणूक लढवून जिंकू शकतो, असे म्हणत युतीच्या …

Read More »

मोदी सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे आत्मनिर्भर भारतासाठी तरतूद

महाराष्ट्र प्रदेश भाजप प्रवक्ते अवधूत वाघ यांचे प्रतिपादन पनवेल ः प्रतिनिधीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प म्हणजे आत्मनिर्भर भारताच्या संकल्पाचा एक योजनाबद्ध दस्तऐवज आहे. या अर्थसंकल्पात गावे, गरीब, शेतकरी, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि व्यावसायिक या सर्वांचा विचार करण्यात आला आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र …

Read More »

राज्यपालांना विमान प्रवास नाकारला

भाजपकडून ठाकरे सरकारवर टीकेची झोड मुंबई ः प्रतिनिधी ठाकरे सरकार आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यातील वादाचा नवा अंक गुरुवारी (दि. 11) समोर आला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी उत्तराखंडला जाण्यासाठी सरकारी विमानाने निघाले होते, मात्र राज्यपालांना सरकारी विमानाने प्रवास करण्यास ठाकरे सरकारकडून परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे विमानात बसलेले राज्यपाल खाली उतरून खासगी …

Read More »