Breaking News

महत्वाच्या बातम्या

शाळकरी मित्र-मैत्रिणींची 51 वर्षांनंतर भेट

मोहोपाडा : प्रतिनिधी सन 1968 साली दहावी (मॅट्रिक) झालेल्या विद्यार्थी मित्रांचा स्नेहमेळावा सिद्ध समाधी योग आश्रम, खोपोली येथे मोठ्या उत्साहात झाला. बडोदा, पुणे, मुंबई, पनवेल, पेण, अलिबाग येथे राहणारे हे वर्गमित्र एकमेकांच्या ओढीने एकत्र आले होते. नुकतेच खोपोली येथे आयोजित या चौथ्या स्नेहसंमेलनाचे उद्घाटनअ‍ॅड. श्रीकांत पाटणकर यांच्या हस्ते करण्यात आले. …

Read More »

करंजाडेतील प्रलंबित कामे मार्गी लावा

भाजपचे मिरेंद्र शहारे यांची सिडकोकडे मागणी करंजाडे ः रामप्रहर वृत्त करंजाडेमधील प्रलंबित कामे जसे रस्ते, गार्डन, गटारे तसेच सेक्टर 1 ते 3मधील गटार प्रश्नाबाबत करंजाडे भाजप शहर अध्यक्ष मिरेंद्र शहारे यांनी नुकतीच सिडको अधिकारी श्री. मुलानी तसेच पटेल यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. या वेळी प्रामुख्याने रस्ते, गार्डन व …

Read More »

‘रवी डायवेअर’मध्ये जय भारतीय जनरल कामगार संघटनेचा झेंडा; आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते युनिटच्या नामफलकाचे अनावरण

पनवेल ः प्रतिनिधी तळोजा औद्योगिक क्षेत्रातील रवी डायवेअर प्रायव्हेट लिमिटेड(युनिट 2) कंपनीमधील कामगारांनी जय भारतीय जनरल कामगार संघटनेचे सदस्यत्व स्वीकारले आहे. त्या पार्श्वभूमीवर शनिवारी (दि. 13) भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते येथील युनिटच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले. या वेळी भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, नगरसेवक प्रवीण …

Read More »

नियम पाळा, अपघात टाळा!

खारघर येथे रस्ते वाहतूक अभियान उत्साहात; मान्यवरांची उपस्थिती खारघर : रामप्रहर वृत्त भारतीय जनता युवा मोर्चा खारघर-तळोजा मंडल व खारघर वाहतूक विभाग यांच्या वतीने शनिवारी (दि. 13) रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात आले. त्या अंतर्गत वाहनचालकांसाठी सुरक्षेचे महत्त्व, तसेच मद्यपानामुळे होणारे अपघात या संदर्भात जनजागृती करण्यात आली. या वेळी भाजपचे उत्तर …

Read More »

आमदार महेश बालदी यांच्याकडून पागोट्यातील भाजपच्या शिलेदारांचे अभिनंदन

उरण ः वार्ताहरथेट सरपंच म्हणून निवडून आलेले पागोटे सरपंच अ‍ॅड. भार्गव पाटील यांच्यावरील अविश्वास ठरावाला ग्रामसभेत मंजुरी देण्यात आली. अविश्वास ठरावाच्या बाजूने 493 ग्रामस्थांनी, तर अ‍ॅड. भार्गव पाटील यांच्या बाजूने 376 लोकांनी मतदान केले. त्यामुळे सध्या बहुमताने अविश्वासाचा ठराव मंजूर होऊन पागोटे ग्रामपंचायतीवर पुन्हा भाजपचा झेंडा फडकला आहे. त्याबद्दल सदस्य …

Read More »

दक्षता देसाई ‘टीन इंडिया महाराष्ट्र’ची मानकरी

अलिबाग येथेरंगला सोहळा अलिबाग ः प्रतिनिधीयंदाची मिस टीन इंडिया महाराष्ट्र सौंदर्य स्पर्धा गुरुवारी (दि. 11) सायंकाळी अलिबाग येथे पार पडली. या वेळी गुणवत्तेच्या जोरावर दक्षता देसाई यंदाची ‘टीन इंडिया महाराष्ट्र’ची मानकरी ठरली आहे. आता ती टीन इंडिया स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करेल. नेहा पाटील उपविजेती, तर तनिशा चौगुलेने तृतीय क्रमांकाचा बहुमान …

Read More »

महाविकास आघाडीच्या नगरसेवकांमध्ये जुंपली

भाजपने केली मध्यस्थी ठाणे ः प्रतिनिधीमागील दोन दिवसांपासून स्थायी समितीत अर्थसंकल्पावरील चर्चा सुरू आहे, मात्र शुक्रवारी (दि. 12) ही चर्चा सुरू असताना महाविकास आघाडातील काँग्रेस व शिवसेनेच्या नगरसेवकांत थेट अंगावर खुर्ची फेकेपर्यंत राडा झाला, तसेच शिवीगाळ व शाब्दिक चकमकही झाली. या वेळी सभागृहात महिला सदस्यही उपस्थित होत्या, परंतु हे सदस्य …

Read More »

छबिनोत्सव आणि शिवजयंतीस बिनशर्त परवानगी द्या!

महाड भाजपची मागणी महाड ः प्रतिनिधीमहाडचे आराध्यदैवत श्री विरेश्वर महाराज यांचा छबिनोत्सव आणि देशाचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज जयंती तसेच गावागावांतील सर्व धार्मिक कार्यक्रमांना बिनशर्त परवानगी द्यावी, अशी मागणी महाड भाजपच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत शुक्रवारी (दि. 12) तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले.महाडचे आराध्यदैवत श्री विरेश्वर महाराज यांचा छबिनोत्सव …

Read More »

भाजपच्या तीव्र विरोधानंतर ठाकरे सरकारला उपरती

शिवजयंतीसाठी नवी नियमावली जाहीर मुंबई ः प्रतिनिधीसंपूर्ण राज्यभरात 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर शिवजयंती साधेपणाने साजरी करावी, असे आवाहन करीत राज्य सरकारने काही निर्बंध घालत गुरुवारी (दि. 11)शिवजयंतीसाठी नियमावली जारी केली होती. त्यावरून भाजपने ठाकरे सरकारवर निशाणा साधल्यानंतर राज्य सरकारने …

Read More »

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा काँग्रेसवर हल्लाबोल

नवी दिल्ली ः केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी (दि. 12) राज्यसभेत मुद्रा योजनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणार्‍यांवर निशाणा साधला. मुद्रा योजनेंतर्गत 27 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेची कर्जे देण्यात आली. ही कर्जे कोणी घेतली जावयाने का, असे म्हणत सीतारामन यांनी हल्लाबोल केला. त्यांच्या या वक्तव्याचा विरोधकांकडून कडाडून विरोध करण्यात आला. …

Read More »