Breaking News

महत्वाच्या बातम्या

जुई गावात ‘दिबां’ची जयंती

पनवेल : रामप्रहर वृत्त जुई (कामोठे) गावातील स्थानिक प्रकल्पग्रस्त ग्रामस्थ आणि एकता ग्रुप मित्र मंडळ यांच्या वतीने परिराणी कार वॉशिंग सेंटर जुई येथे दिवंगत लोकनेते दि. बा. पाटील यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात दि. बा. पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत यांच्या हस्ते करण्यात आले …

Read More »

पटवर्धन रुग्णालयाच्या अद्ययावत ऑपरेशन थिएटरची पाहणी

बाळासाहेब पाटील, विक्रांत पाटील यांची सदिच्छा भेट पनवेल : वार्ताहर पनवेल येथील डॉ. पटवर्धन रुग्णालयाच्या माध्यमातून नवीन अद्ययावत अतिदक्षता विभाग आणि ऑपरेशन थिएटरची निर्मिती करण्यात आली आहे. त्याचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. या वेळी कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील आणि भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील …

Read More »

रायझिंग डे अंतर्गत कामोठे पोलिसांकडून उपक्रम

पनवेल : वार्ताहर रायझिंग डे अंतर्गत कामोठे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय पाटील यांनी कामोठे वसाहतीमधील ज्येष्ठ नागरिकांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांना कोविडसंदर्भात मार्गदर्शन केले. तसेच बदलापूर येथील एका अंध व्यक्तींच्या संस्थेला रोख रकमेची मदत केली. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामार्फत सर्व पोलीस ठाण्यांत रायझिंग डे उपक्रम राबविण्यात आला. त्या अनुषंगाने …

Read More »

चौथ्या कसोटीत खेळण्यास तयार!; सेहवागची बीसीसीआयला मजेशीर ऑफर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था बॉर्डर-गावसकर कसोटी मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. ब्रिस्बेन येथे चौथा व निर्णायक कसोटी सामना होणार आहे. हा सामना जिंकून चषकावर कब्जा करण्याच्या इराद्याने दोन्ही संघ मैदानात उतरतील, मात्र भारतीय संघ दुखापतींमुळे बेजार आहे. एकापाठोपाठ एक खेळाडू दुखापतग्रस्त झाल्याच्या बातम्या समोर येताहेत. भारताचा माजी विस्फोटक फलंदाज …

Read More »

करंजातील पाण्याची समस्या सोडविणार

आमदार महेश बालदी यांची ग्वाही उरण : वार्ताहर करंजा गावामध्ये भाजपतर्फे अनेक विकासकामे केली जातील. तसेच येथील पाण्याचा प्रश्न सोडविणार असल्याची ग्वाही आमदार महेश बालदी यांनी दिली. ते ग्रामपंचायत निवडणुकीनिमित्त करंजा येथे मंगळवारी (दि. 12) प्रचारसभेत  बोलत होते. आमदार महेश बालदी म्हणाले की, करंजा बंदरासाठी दीडशे कोटींचा  निधी आणला, जेणेकरून …

Read More »

भारतीय खेळाडू सुविधांपासून वंचित?; हॉटेलमध्ये करावी लागतेय टॉयलेटची सफाई

ब्रिस्बेन : वृत्तसंस्था ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर टीम इंडियाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यात ब्रिस्बेन येथे होणार्‍या चौथ्या कसोटीवर कोरोना व्हायरसमुळे संकट होते. त्यातही भारतीय संघ तेथे दाखल झाला, मात्र क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून त्यांना कोणत्याही प्रकारच्या क्वारंटाइन नियमांत सूट मिळालेली नाही. उलट त्रास वाढला आहे. एका वृत्तानुसार भारतीय संघ मंगळवारी ब्रिस्बेन …

Read More »

मुबलक पाणी असूनही माथेरानमध्ये टंचाई

कर्जत : बातमीदार मुबलक प्रमाणात पाणी साठा असूनही गेले पाच दिवस माथेरानमध्ये पाणी पुरवठा होत नसल्याने येथील नागरिक पुरते हवालदिल झाले आहेत. एमजेपीच्या अधिकार्‍यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे बोलले जात आहे. शारलोट तलाव व नेरळ कुंभे येथील योजनेतून माथेरानला पाणी पुरवठा करण्यात येतो. मात्र सध्या नेरळ कुंभे येथून पाणी पुरवठा …

Read More »

ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेरळ पोलिसांचा रूट मार्च

कर्जत : बातमीदार तालुक्यात होत असलेल्या नऊ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूका शांततेत पार पडाव्यात या अनुषंगाने कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल घेरडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली नेरळ पोलीस ठाण्यातील सर्व  अधिकारी, कर्मचारी आणि होमगार्ड यांची रूट मार्च काढण्यात आला. कर्जत तालुक्यातील दामत, पोशिर, साळोख तर्फे वरेडी, कोल्हारे, कडाव, वैजनाथ, भिवपुरी, हुमगाव आदी नऊ …

Read More »

राज्य शासनाकडून डिझेल परतावा रखडला

  रायगडातील मच्छिमार आंदोलनाच्या तयारीत; जिल्हा मच्छिमार संघाच्या उपाध्यक्षांचा इशारा मुरूड : प्रतिनिधी दोन वर्षांपासून रखडलेले डिझेल परतावे शासनाने माच्छिमार सोसायट्यांना तातडीने द्यावेत, अन्यथा रस्त्यावर उतरून मोठे जनआंदोलन करण्याचा इशारा रायगड जिल्हा मच्छिमार संघाचे उपाध्यक्ष मनोहर बैले यांनी दिला आहे. रायगड जिल्ह्याला 220 कि.मी. लांबीचा समुद्र किनारा लाभला असून किनारपट्टीवरील …

Read More »

सार्वजनिक जीवनातील पथ्ये

एखाद्या लोकप्रतिनिधीचे खाजगी प्रकरण जाहीररित्या चर्चेत येऊ न देण्याचा अन्य नेतेमंडळींनी प्रयत्न केला तरी समाजमाध्यमांमध्ये असली प्रकरणे अत्यंत चवीने चघळली जातात. तसे पाहता अशाप्रकारचे वर्तन दुर्दैवीच म्हणायला हवे. कारण लोकप्रतिनिधींच्या खाजगी आयुष्यातील ढवळाढवळ चव्हाट्यावर आणली की राजकारणाचा दर्जाही तितकाच खालावत जातो. आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळाले त्याला आता 73 वर्षे होऊन …

Read More »