Breaking News

महत्वाच्या बातम्या

नवी मुंबई प्रथम क्रमांकाचे स्वच्छ शहर बनेल

आमदार गणेश नाईक यांचा विश्वास; स्वच्छता, वृक्षारोपण अभियानाचा शुभारंभ नवी मुंबई ः बातमीदार नागरिक, लोकप्रतिनिधी, प्रशासन तसेच स्वयंसेवी संस्थांनी कृतिशील संकल्प केल्यास नवी मुंबई शहर स्वच्छ भारत अभियानात नक्कीच प्रथम क्रमांक पटकावेल, असा विश्वास आमदार गणेश नाईक यांनी व्यक्त केला. भारत स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत ग्रीन होप, संत निरंकारी चॅरिटेबल ट्रस्ट …

Read More »

अक्षता म्हात्रे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड

पनवेल ः प्रतिनिधी वांगणी तर्फे वाजे गु्रप ग्रामपंचायत उपसरपंचपदासाठी मंगळवारी (दि. 1) झालेल्या निवडणुकीत  भारतीय जनता पक्षाच्या अक्षता म्हात्रे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली. या निवडीबद्दल त्यांचे भाजप नेते प्रमोद भिंगारकर यांच्यासह मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सरपंच सुरेखा पवार, मोहो अध्यक्ष मोतीराम पाटील, माजी सरपंच …

Read More »

सिडको मलनिस्सारण केंद्रातून पुनर्प्रक्रिया केलेले पाणी तळोजा औद्योगिक क्षेत्राला पुरविण्याचे नियोजन प्रस्तावित

 पिण्यायोग्य पाण्याची होणार बचत नवी मुंबई ः सिडको वृत्तसेवा सिडकोच्या नवी मुंबईतील कळंबोली येथील नियोजित मलनिस्सारण पुनर्प्रक्रिया केंद्रातून 30 दशलक्ष लिटर पाणी तळोजा औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांना पुरविण्याचे नियोजन सिडकोतर्फे प्रस्तावित आहे. त्यामुळे तितक्याच प्रमाणात पिण्यायोग्य अशा स्वच्छ पाण्याची बचत होणार आहे. सिडकोचे कळंबोली येथे 50 द. ल. लिटर क्षमतेचे मलनिस्सारण …

Read More »

विवाह सोहळ्यास आलेल्या पाहुण्याचा मृत्यू; पालीतील घटना

पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील पाली येथील मराठा समाज सभागृहात सोमवारी एका विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी आलेल्या  एका पाहुण्याचा  हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यामुळे पालीत सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत पाली पोलिसांनी दिलेल्या  माहितीनुसार प्रवीण महादेव चव्हाण (वय 40) राहणार भांडुप ठाणे (पश्चिम)हे सोमवारी (दि.30) …

Read More »

तिघे एकत्र या, नाही तर चौघे या…आम्ही एकटे पुरेसे आहोत!

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कडाडले सांगली : प्रतिनिधी तुम्ही तिघे एकत्र या, नाही तर चौघे या. आम्ही एकटे पुरेसे आहोत, अशी गर्जना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे तसेच जगात कोणावरही बोललो तरी मंत्री हसन मुश्रीफ माझ्यावर टीका का करतात हे कोडे सध्या माध्यमांनाही पडले आहे, असा टोलाही पाटील …

Read More »

माथेरानमधील व्यावसायिक घेणार ‘पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर’चा लाभ

कर्जत : बातमीदार माथेरानमध्ये फुटपाथवर व्यवसाय करणार्‍या व्यावसायिकांचा पथविक्रेते म्हणून समावेश करण्यात आला आहे. पदपथावर व्यवसाय करणार्‍यांसाठी पंतप्रधान आत्मनिर्भर योजना जाहीर करण्यात आल्यानंतर या व्यावसायिकांचा नगरपरिषद कर्मचार्‍यांकडून सर्व्हे करण्यात आला होता. त्या अहवालावरून नगरपरिषदे मार्फत संबंधित योजनेचे प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यात आले होते. ज्या व्यावसायिकांनी या योजनेमधील सर्व कागदपत्रांची पूर्तता केली …

Read More »

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पालीकरांची एकजूट; नदी, जॅकवेलमधील गाळ काढण्यासाठी श्रमदान

पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील पाली ग्रामपंचायतीची पाणीपुरवठा योजनेतील जॅकवेल व बाजूचा परिसर गाळाने भरला होता. ग्रामस्थांनी एकजुटीने श्रमदान मोहीम राबवून जॅकवेल व पाण्याच्या मार्गावर साचलेला गाळ काढला. त्यामुळे पालीमध्ये वेळोवेळी भासणारी पाणीटंचाई सध्या तरी दूर झाली आहे. अष्टविनयकापैकी एक स्थान असलेल्या पाली गावाला येथील अंबा नदीतून पाणी पुरवठा केला …

Read More »

नागोठण्यातील आंदोलनाला पनवेल, उरणच्या संघटनांचा पाठिंबा

नागोठणे : प्रतिनिधी लोकशासन आंदोलन संघर्ष समितीच्या वतीने 27 नोव्हेंबरपासून नागोठणे येथील रिलायन्स कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर प्रारंभ करण्यात आलेले ठिय्या आंदोलन मंगळवारी (दि. 1) पाचव्या दिवशी सुरूच आहे. मात्र आमदार रविशेठ पाटील यांच्या व्यतिरिक्त पालकमंत्री तसेच एकही लोकप्रतिनिधी आणि रिलायन्सच्या अधिकार्‍यांसह कोणताही सरकारी अधिकारी याठिकाणी पोहोचलेला नाही. दरम्यान, आंदोलनकर्त्यांचा उत्साह दररोज …

Read More »

…तोपर्यंत भात खरेदी केंद्र सुरू करू देणार नाही; थकबाकी मिळण्यासाठी कर्जत तालुक्यातील शेतकरी आक्रमक

कर्जत : बातमीदार नेरळ येथील भात खरेदी केंद्रात गेल्या वर्षी विक्री केलेल्या भाताचे पैसे अद्यापही शेतकर्‍यांना मिळालेले नाहीत. त्यामुळे संप्तत झालेल्या या सर्व शेतकर्‍यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. जोपर्यंत थकबाकी मिळत नाही, तोपर्यंत नेरळ केंद्रात नवीन भात खरेदी करू देणार नाही, असा इशारा या शेतकर्‍यांनी दिला आहे. शेतकर्‍यांच्या उत्पादनाला चांगला …

Read More »

कोरोनासंदर्भात तातडीची बैठक बोलवा

पनवेल मनपा स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी यांची आयुक्तांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका हद्दीतील कोरोना रुग्ण तसेच उपाययोजना या संदर्भात प्रशासनाच्या वतीने तातडीची बैठक आयोजित करण्यात यावी, अशी मागणी स्थायी समितीचे सभापती संतोष शेट्टी यांनी आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे केली आहे. याबाबतचे निवेदन शेट्टी यांनी दिले आहे.या निवेदनात …

Read More »