Breaking News

महत्वाच्या बातम्या

इंडिया बुल्स क्वारंटाइन सेंटरमध्ये महिलांसाठी सुरक्षा रक्षक नेमावा

नगरसेविका वृषाली वाघमारे यांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त इंडिया बुल्स येथील अलगीकरण व विलगीकरण सेंटरमध्ये महिलांसाठी महिला सुरक्षा रक्षक नेमण्यात यावेत, अशी मागणी भाजप नगरसेविका वृषाली वाघमारे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी पनवेल महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांना लेखी निवेदन दिले आहे. नगरसेविका वाघमारे यांनी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटल्याप्रमाणे पनवेल …

Read More »

भाज्यांचा जाणवतोय तुटवडा

पनवेल : बातमीदार पावसाळा सुरू झाला आहे आणि मंगळवारपासून श्रावण महिनाही सुरू होत आहे. अनेकांचा शाकाहार सुरू होऊन भाजीपाल्याच्या मागणीत वाढ होणार आहे. मात्र अनेक ठिकाणी असलेल्या लॉकडाऊनमुळे बाजारात भाज्यांची आवक कमीच आहे. त्यामुळे भाज्यांचा तुटवडा निर्माण झाला असून दरही वाढलेले आहेत. या आठवड्यापासून तर घाऊक बाजारात अनेक भाज्यांचे दर …

Read More »

सोशल डिस्टन्सिंग धुडकावत गटारीनिमित्त उरणमध्ये मांस खरेदी

उरण : प्रतिनिधी, वार्ताहर उरण तालुक्यातील बहुतांशी मटण विक्रेत्यांच्या दुकानासमोर गटारी अमावस्येनिमित्त मटण खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचे चित्र दिसत होते. गटारी रविवारी (दि.19) आल्याने मटण-चिकन खवय्ये पहाटेपासूनच लांबच लांब रांगा लाऊन व कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये त्याकरिता स्वत:ची सुरक्षा म्हणून मास्क व सोशल डिस्टन्सिंग पाळून मटण-चिकन खरेदी करताना दिसत …

Read More »

मासळीची आवक घटली

खवय्ये नाराज; मच्छीमारांना प्रतीक्षा 1 ऑगस्टची मुरूड ः प्रतिनिधी – मुरूड तालुक्यात पावसाळी हंगाम सुरू असल्याने व शासनाच्या नियमाप्रमाणे 1 जून ते 31 जुलैपर्यंत मच्छीमारी करण्यास प्रतिबंध असल्याने मासळी मार्केटमध्ये मासळीची आवक घटली आहे. यांत्रिकी बोटींना समुद्रात जाण्यास मज्जाव असल्याने सध्या मुरूड समुद्र किनार्‍यावर पेर्‍याने पकडण्यात आलेली मासळी तसेच समुद्राच्या …

Read More »

काकडी विक्रीला लॉकडाऊनचा फटका

शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान माणगाव ः प्रतिनिधी – माणगावातील अनेक शेतकर्‍यांनी यंदा पावसाळ्यापूर्वी माळरानावर मोठ्या प्रमाणात काकडीची लागवड केली होती. सुरुवातीच्या पावसात चांगली रुजून गेल्या आठ-दहा दिवसांपासून काकडी तयार झाली. शेतकर्‍यांनी काकडीचे एक-दोन तोडे बाजारात विकले व आर्थिक  उत्पादन सुरू झाले, मात्र उत्पादन सुरू असतानाच जिल्ह्यात 15 जुलैपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा …

Read More »

रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची मागणी

खोपोली ः प्रतिनिधी – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या जिल्ह्यात लॉकडाऊन घोषित झाल्याने खोपोली शहरातील रस्ते निर्मनुष्य आहेत. वाहनांची संख्याही ठप्प झाली. या संधीचा फायदा घेऊन खोपोली नगरपालिकेने शहरातील प्रामुख्याने जे रस्ते फारच खराब व दयनीय अवस्थेत आहेत त्या  रस्त्यांतील खड्डे तातडीने बुजवावेत, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. शहरातील बहुतेक सर्वच रस्त्यांमध्ये …

Read More »

कर्जतमध्ये चार ग्रामपंचायतींवर बसणार प्रशासक

कर्जत ः बातमीदार – कर्जत तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींची पाच वर्षांची मुदत संपली आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमला जाणार असून, त्यातील एका ग्रामपंचायतीचे विभाजन होऊन दोन नवीन ग्रामपंचायती अस्तिवात आल्या आहेत. दरम्यान, त्यामुळे मुदत संपलेल्या चार ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमला जाणार आहे. कर्जत तालुक्यातील सार्वत्रिक निवडणूक घेतल्यानंतर पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण …

Read More »

देशात कोरोनाचा वाढता संसर्ग

24 तासांत तब्बल 34,884 नवे रुग्ण; 671 जणांचा मृत्यू नवी दिल्ली : वृत्तसंस्थादेशात कोरोनाचा विळखा दिवसागणिक वाढतच चालला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, शनिवारी (दि. 18) सकाळी संपलेल्या 24 तासांमध्ये 34 हजार 884 नव्या रुणांची नोंद झाली असून, 671 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे 22 हजार 942 रुग्ण बरे झाले. …

Read More »

कोरोनापासून बचावासाठी काळी मिरी, रम आणि अंडी!

मंगळुरू : वृत्तसंस्था जगभरात कोरोना व्हायरसने कहर माजवला आहे. विविध देशांतील वैज्ञानिक कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करीत असून, कोरोनावरील लस येण्याची सर्व जण आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच कर्नाटकातील उल्लाल नगर परिषदेतील काँग्रेस नगरसेवकाने कोरोना व्हायरसचा खात्मा करण्यासाठी रम, काळीमिरी आणि अंड्यांचे सेवन करण्याचा अजब उपाय सुचविला आहे. हा …

Read More »

‘सरकारमध्ये काँग्रेसला विचारतोय कोण?’

मुंबई : प्रतिनिधीकाँग्रेसचे अनेक नेते पक्ष सोडून भाजपमध्ये येण्यास तयार आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसला कोणी विचारात तरी घेत का, असा सवाल भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी उपस्थित केला आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह हर्षवर्धन पाटील, जयकुमार गोरे, धनंजय महाडिक, विनय कोरे, रणजीतसिंह नाईक-निंबाळकर या …

Read More »