Breaking News

महत्वाच्या बातम्या

महाड तालुक्यात वादळी वार्‍यासह गारांचा पाऊस

महाड : प्रतिनिधी तालुक्यात रविवारी (दि. 19) सायंकाळी वादळी वार्‍यासह गारांचा पाऊस पडला. पावसामुळे हवेत गारवा आला असला, तरी हा पाऊस पिकांसाठी नुकसानदायक ठरू शकतो. मध्यंतरीही महाडला वादळी पावसाने झोडपले होते. तशाच प्रकारे रविवारी पुन्हा सायंकाळी हजेरी लावली. या पावसामुळे उष्म्यापासून दिलासा मिळाला खरा, पण नुकसान होण्याची भीती व्यक्त होत …

Read More »

रस्त्यावर संदेश लिहून जनजागृती; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पेण पालिकेचा उपक्रम

पेण : प्रतिनिधी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पेण शहरात नगर परिषदेमार्फत स्वच्छता व जनजागृती मोहीम सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून शहरातील रस्त्यांवर प्रबोधनात्मक संदेश लिहून जनजागृती करण्यात येत आहे. पेण नगर परिषदेच्या नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता, फवारणी, निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. सर्व कर्मचार्‍यांना आरोग्यविषयक साहित्य देण्यात आलेले आहे. …

Read More »

नागोठण्यातही 33 जण ताब्यात

नागोठणे : प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागोठण्यातही मॉर्निंग वॉक करणार्‍या 33 जणांना रविवारी (दि. 19) नागोठणे पोलिसांनी ताब्यात घेतले. यात काही महिलांचाही समावेश होता. कोरोनामुळे असलेले लॉकडाऊन व संचारबंदीकडे दुर्लक्ष करीत नागोठण्यातील काही नागरिक बिनक्कित फिरत आहेत. अशाच प्रकारे रविवारी नागोठणे-वासगाव रस्त्यावर मॉर्निंग वॉक करीत असताना 33 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. …

Read More »

उरणमध्ये कोरोनाविरुद्धचा लढा आता होणार अधिक तीव्र; व्यापारी असोसिएशनचा पुढाकार; दुकानदार, विक्रेत्यांसाठी वेळापत्रक

उरण : वार्ताहर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उरण शहरात विविध उपाययोजना करण्याचे आवाहन व्यापारी असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे. दुकानदार, विक्रेते तसेच नागरिकांनी मिळून कोरोनाविरुद्ध लढा तीव्र लढा देण्याचे या माध्यमातून निर्धार करण्यात आलेला आहे. येत्या 20 एप्रिलपासून सर्व हॉटेल आणि मिठाई विक्रेते यांनी रोज सकाळी 8 ते दुपारी 2 व …

Read More »

मॉर्निंग वॉकला गेलेल्या 33 जणांची नेरळमध्ये पोलिसांकडून धरपकड

कर्जत : बातमीदार लॉकडाऊन आणि संचारबंदी असूनही मॉर्निंग वॉकला जाणार्‍या 33 जणांना नेरळ पोलिसांनी रविवारी (दि. 19) पकडले. यातील बहुतांश जण हे जेष्ठ नागरिक असल्याने सर्वांना समज देऊन सोडण्यात आले, मात्र यापुढे कुणीही अशा प्रकारे फिरताना आढळल्यास कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. संचारबंदीबाबत अनेक जण जागरूक नसल्याचे …

Read More »

मुरूड शहर आठवड्यातून दोन दिवस राहणार बंद; पहिल्याच दिवशी नागरिकांचा प्रतिसाद

मुरूड : प्रतिनिधी शेजारील श्रीवर्धन तालुक्यात कोरोनाचा रूग्ण आढळल्याने खबरदारीचा उपाय म्हणून मुरूड शहर रविवार व बुधवार असे दोन दिवस पूर्णत: बंद असणार आहे. व्यापारी, पोलीस आणि नगर परिषद यांनी मिळून हा निर्णय घेतला असून यातून अत्यावश्यक सेवा असलेली औषधांची दुकाने वगळण्यात आली आहेत. कोरोना विषाणूने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे.  …

Read More »

विठ्ठल मंदिरात पूजेसाठी जमलेल्या 25 जणांवर गुन्हा; अलिबाग तालुक्यातील भिलजी येथील घटना

रेवदंडा : प्रतिनिधी संचारबंदी असताना अलिबाग तालुक्यातील भिलजी येथील विठ्ठल-रूक्मिणी मंदिरात पूजा व आरतीसाठी गावकर्‍यांना जमविल्याप्रकरणी गावचे पोलीस पाटील, मंदिराचा पुजारी, सचिव याच्यांसह 25 जणांवर रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेत सर्व धार्मिक स्थळे भाविकांसाठी बंद करण्यात आली आहेत. असे असताना भिलजी येथील विठ्ठल-रूक्मिणी …

Read More »

ग्रीन, ऑरेंज झोनमधील उद्योग आजपासून होणार सुरू

मुंबई : प्रतिनिधी ज्या ठिकाणी कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव नाही किंवा रुग्ण आढळून आलेले नाहीत अशा हॉटस्पॉट नसलेल्या भागांमध्ये काही सवलतींसह विशिष्ट कामांना केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. दुसरीकडे राज्य सरकारनेही ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील उद्योगधंद्यांना सोमवार (दि. 20)पासून माफक स्वरुपात परवानगी दिली आहे. ऑरेंज झोनमधील जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव हा कमी …

Read More »

रायगड जिल्ह्यात कोरोनाचा दुसरा बळी; पोलादपुरातील महिलेचा मृत्यू

पोलादपूर : प्रतिनिधी येथील कोरोनाग्रस्त महिलेचा रविवारी (दि. 19) मध्यरात्री कस्तुरबा रूग्णालयात मृत्यू झाला. त्यामुळे पोलादपूर तालुक्यात खळबळ उडाली आहे. यासोबतच रायगड जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या दोन झाली आहे. लीला बाबूराव सकपाळ (वय 63) असे मृत महिलेचे नाव असून, त्यांचे पतीसह पोलादपूरच्या प्रभातनगर येथे वास्तव्य होते. लीलाबाईंचा रविवारी रात्री 12.05च्या …

Read More »

हल्ल्यापूर्वी कोविड धर्म, जात, पंथ पाहत नाही : पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : देशभरातील कोरोना फैलावाच्या पार्श्वभूमीवर कोविड-19 हल्ल्यापूर्वी वंश, धर्म, रंग, जाती, पंथ, भाषा किंवा सीमा यापैकी काहीही पाहत नाही. त्यामुळे आपला प्रतिसाद आणि आचरण हे ऐक्य-बंधूता यांना प्राधान्य देणारे असायला हवे, असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. पंतप्रधान मोदी यांनी ’लिंक्डइन’वरून एक लेख प्रसिद्ध केला आहे. …

Read More »