Breaking News

महत्वाच्या बातम्या

जमावबंदीत बेकायदा दारूविक्री जोरात

पनवेल : बातमीदार दोन दिवसांपासून दारूविक्री करणारी दुकाने बंद झाल्यामुळे तळीरामांची मोठी अडचण झाली आहे. संचारबंदी, जमावबंदी असताना खारघरमधील गावांमध्ये सुरू असलेल्या दारूविक्रीला जोर आला आहे. इतर ठिकाणी दारू मिळत नसल्यामुळे गावांमध्ये चढ्या दराने दारूविक्री केली जात आहे. सिडकोने विकसित केलेल्या खारघर झोनमध्ये पूर्वीपासून दारूबंदी असल्यामुळे खारघर शहरात दारूविक्री करणारे …

Read More »

‘सतत प्रक्रिया उद्योग, फार्मासिटिकल कंपन्या कमी मनुष्यबळाचा वापर करून सुरू राहणार’

अलिबाग : जिमाका : कोरोना विषाणूच्या संसर्गाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रशासन सर्व पातळ्यांवर प्रयत्नशील आहे. जिल्ह्यातील कंपन्या सुरू राहण्याबाबतही प्रशासनाने शासन निर्देशाप्रमाणे काही निर्णय घेतलेले आहेत.  जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांच्यासह पाच सदस्यीय उद्योग समितीने राज्य शासनाच्या मुख्य सचिवांच्या कोविड-19 साथीचे रोग अधिनियम 1897च्या लॉकडाऊन आदेशातील …

Read More »

अपुरी झोप : गंभीर आजारास निमंत्रण

इंटरनेटच्या जमान्यात तरुण हे मोबाइलमध्ये गढलेले असतात. विशेषतः रात्रीच्या वेळी तरुण मोबाइलवर ऑनलाइन स्ट्रिमिंगवर चित्रपट, वेबमालिका किंवा तत्सम काही पहात असतात. त्याचा मेंदूवर, डोळ्यांवर परिणाम होतोच, पण झोपेवरही परिणाम होतो. मुळात झोपच शांतपणे पूर्ण होत नाही. अपुरी झोप किंवा सात तासांपेक्षा कमी होणारी झोप ही गंभीर आजारांना आमंत्रण देणारी असते. …

Read More »

‘तो’ प्रकार चुकीचा : पोलीस

नागोठणे : प्रतिनिधी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील काही भागांसह विभागातील अनेक गावांमध्ये इतर ठिकाणच्या (बाहेरील) व्यक्तींना प्रवेशबंदी केली असल्याचे धक्कादायक चित्र दिसून येत आहे. हा प्रकार अत्यंत चुकीचा असून रस्ते ताबडतोब खुले करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे यांच्या सूचनेनुसार विशेष शाखेचे हेड कॉन्स्टेबल निलेश महाडिक यांनी केले आहे. …

Read More »

लॉकडाऊन असतानाही खरेदीसाठी गर्दी; पोलीस झाले हैराण

रोहे ः प्रतिनिधी : कोरोना जगभर थैमान घालत आहे. देशातही कोरोनाचे रुग्ण सापडल्याने संचारबंदी व लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. या काळात नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी प्रयत्न चालू असताना रोह्यात मात्र खेरदीच्या नावावर काही हवसे, नवसे व बघ्यांची गर्दी होताना दिसत आहे, तर दुचाकी, चारचाकी वाहने रस्त्यावर फिरत आहे. त्यामुळे पोलीस …

Read More »

परदेश प्रवास करून रायगडात परतलेल्या नागरिकांची माहिती जाहीर

अलिबाग : जिमाका : जे नागरिक 1 ते 23 मार्चदरम्यान परदेश प्रवास करून रायगड जिल्ह्यात परतले आहेत, त्या प्रवाशांबद्दलचा तपशील जिल्हा प्रशासनाने जाहीर  केला आहे. एकूण परदेश प्रवासावरून जिल्ह्यात परतलेले नागरिक 935, परदेशी प्रवास करुन परतल्यानंतर 14 दिवसांचा इन्क्युबेशन कालावधी पूर्ण केलेले वा पुन्हा परदेशी परतलेले नागरिक 187, घरामध्ये अलगीकरणात …

Read More »

चुकीचा मेसेज तरुणाला भोवला; नेरळमध्ये पोलिसांची कारवाई

कर्जत : बातमीदार : कर्जत तालुक्यातील संचारबंदीच्या काळात नेरळ बाजारपेठ बंद असणार आहे, पण त्या कालावधीत जीवनावश्यक वस्तूंसाठी छत्रपती शिवाजी महाराज मैदानात बाजार भरला जाणार आहे. दरम्यान, नेरळमध्ये कोरोनाबाबत सोशल मीडियावर चुकीची माहिती देणार्‍या एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेरळ गावातील बाजारपेठेमध्ये 23 मार्च रोजी पोलिसांना लाठीचार्ज करावा …

Read More »

कोरोना : समज-गैरसमज

कोरोनाचा संशयित किंवा कोरोनाबाधित व्यक्ती ही काही वाळीत टाकण्याजोगी नसते. अशा व्यक्तीची काही चूक देखील नसते. परंतु अशा व्यक्तींना जवळपास वाळीत टाकण्याच्या घटना गेल्या काही दिवसांत आढळून आल्या आहेत. तर कोरोनाविषयीच्या या सार्‍याभ्रामक समजुती तातडीने दूर करायला हव्यात. किंबहुना, या लढाईचे स्वरुपच ते आहे. डोळ्यांनी दिसत नसलेल्या शत्रूशी लढणे अतिशय …

Read More »

निरोगी आरोग्याची गुढी उभारण्याचा संकल्प

पनवेल : रामप्रहर वृत्त गुढीपाडव्याचा सण बुधवारी (दि. 24) पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता यंदा निरोगी आरोग्याची गुढी उभारण्याचा संकल्प नागरिकांनी केल्याचे दिसून आले. चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून मराठी नववर्षारंभ होतो. भारतीय संस्कृतीत चैत्र महिन्याला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. केवळ धार्मिक, ऐतिहासिक, नैसर्गिकच नव्हे, तर आरोग्याच्या …

Read More »

आजपासून संपूर्ण देशात लॉकडाऊन

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांची मोठी घोषणा नवी दिल्ली ः वृत्तसंस्थापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशासह जगभरात कोरोनाचे संकट उद्भवल्यानंतर एकाच आठवड्यात सलग दुसर्‍यांदा देशाला संबोधित करताना बुधवारी (दि. 24) संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्याची मोठी घोषणा केली आहे. मोदी म्हणाले की, जनता कर्फ्यूने दाखवून दिले की देशावर ज्या वेळी कोणतेही संकट येते तेव्हा …

Read More »