Breaking News

महत्वाच्या बातम्या

रायगडातील पूरस्थिती आली नियंत्रणात

अलिबाग : जिमाका कोकण विभागात मागील चार-पाच दिवसांपूर्वी पूरस्थिती निर्माण झाली होती. सध्या पाऊस बंद आहे. या भागातील पूरस्थिती नियंत्रणात असून त्यांना आवश्यक ते मदतकार्य करण्यात येत आहे. रायगड जिल्ह्यातील पूरस्थिती सध्या नियंत्रणात आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 500 व्यक्ती, रत्नागिरी जिल्ह्यातील 757, तर रायगड जिल्ह्यातील तीन हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले होते. …

Read More »

कर्जत-लोणावळादरम्यान दुरुस्तीची कामे अंतिम टप्प्यात

कर्जत ः बातमीदार जुलै महिन्यात कर्जत-लोणावळा मार्गावर मोठ्या प्रमाणात दरडी कोसळून वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे मेन लाइनवरील दक्षिण-मध्य मार्गावर वाहतूक थांबवून दुरुस्तीची कामे केली जात आहेत.दरम्यान, मध्य रेल्वेच्या या कामांमुळे बोरघाट अधिक सुरक्षित होत असून त्या कामाची पाहणी मध्य रेल्वेचे मुंबई येथील वरिष्ठ अधिकारीवर्गाने केली आहे. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक …

Read More »

मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक 16 ऑगस्टपर्यंत बंद

खोपोली ः वार्ताहर सिग्नल व्यवस्था, रेल्वे टॅ्रकची दुरुस्ती व घाटातील दरड भाग सुरक्षित करण्यासाठी मुंबई-पुणे सर्व प्रकारची रेल्वेसेवा दि. 16 ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे मुंबईकडील प्रवासी लोकलने खोपोलीला येऊन खोपोलीहून महामार्गमार्गे पुण्याकडे जात आहेत. खोपोली सिटी बसस्थानक व खोपोली मध्यवर्ती बस स्थानकांत पुण्याकडे जाणार्‍या प्रवाशांची …

Read More »

रोटरी क्लब रोहा सेंट्रलतर्फे मदत

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडून कौतुक रोहे ः प्रतिनिधी रोहे तालुक्यातील कवलठे या गावी भूस्खलनामुळे मोठे नुकसान झाले. तेथील नागरिकांना तातडीची मदत म्हणून रोटरी क्लब रोहा सेंट्रलतर्फे तूरडाळ, गोडेतेल, पोहे, मसाले, खोबरेल तेल, पेस्ट, लोणचे, अंगाचे साबण, कपड्याचे साबण आदी जीवनावश्यक जिन्नस असलेले पॅकेट्स 25 कुटुंबाना देण्यात आली. रायगडचे पालकमंत्री ना. …

Read More »

सोन्याच्या वाडीचे पुनर्वसन

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची ग्वाही; ग्रामस्थांना दिलासा माणगाव ः रामप्रहर वृत्त अतिवृष्टीमुळे गोरेगाव विभागातील सोन्याच्या वाडीमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. या वाडीचे पुनर्वसन केले जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली. या जलप्रलयामुळे संपूर्ण सोन्याच्या वाडीला पुराच्या पाण्याने अक्षरशः वेढा घातला होता. या पूरस्थितीतून जीवाची पर्वा न करता जिगरबाज …

Read More »

भारताच्या नंदनवनात स्वातंत्र्याची नवी पहाट

इच्छाशक्ती असेल तर किती धडाकेबाज पद्धतीने काम करता येऊ शकते, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. सात दशकांहून अधिक काळ भिजत पडलेला जम्मू-काश्मीरच्या विलीनीकरणाचा प्रश्न केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत मुद्देसूदपणे मांडला आणि तो व्यवस्थित सोडविलादेखील. काश्मीर खोर्‍यातून कलम 370 रद्द हद्दपार करण्याच्या ऐतिहासिक निर्णयामुळे …

Read More »

अस्पृश्यता संपली, सार्वभौमता स्थिर झाली

आपण 15 ऑगस्ट 1947ला स्वतंत्र झालो आणि लगेच नैर्बंधिक उपायांनी आपण अस्पृश्यता नष्ट केली.ही अस्पृश्यता दलित समाजातील काही घटकांपुरती होती, पण ती नष्ट होणे मनुष्यधर्माला अनुसरून अत्यावश्यक होते, पण त्याहून मोठी अस्पृश्यता त्या वेळी अस्तित्वात होती. ती राजकीय स्वरूपाची होती. ती अस्पृश्यता काश्मीरच्या संदर्भात काश्मीरबाहेरील म्हणजे उर्वरित भारतातील हिंदूंवर लादण्यात …

Read More »

सावित्री नदीपात्रालगत होणार रिंगरूट प्रकल्प : पालकमंत्री

महाड : प्रतिनिधी महाड तालुक्यात पुरामुळे झालेल्या नुकसानीची रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी शनिवारी (दि. 10) पाहणी केली. या वेळी त्यांनी महाड शहराला सावित्री नदीच्या पाण्याचा धोका पाहता शेडावपासून केंबुर्लीपर्यंत सात किमीची संरक्षक भिंत बांधून रिंगरूट प्रकल्पांतर्गत तिचा विकास करणार असल्याचे सांगितले. सर्व आपद्ग्रस्तांच्या व शेतीच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करून …

Read More »

मोहोपाड्यात जम्बो पक्षप्रवेश

शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीतील शेकडो कार्यकर्ते भाजपमध्ये पनवेल : रामप्रहर वृत्त जनभावना जाणून घेत समाजाप्रति प्रामाणिकपणे काम करणारे भाजप नेते महेश बालदी यांच्या रूपाने उरण विधानसभा मतदारसंघात विकासाचे युग येणार आहे. त्याचे साक्षीदार होण्यासाठी मोहोपाडा येथे शुक्रवारी (दि. 9) झालेल्या कार्यक्रमात शेकाप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांनी क्रांतिदिनाचे औचित्य …

Read More »

पूरस्थितीचे राजकारण करू नका : मुख्यमंत्री

सांगली : प्रतिनिधी पूरस्थितीत कुणीही राजकारण करू नये. सर्वांनी एकत्र येऊन लोकांना मदत करायला हवी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना केले आहे. सांगलीतील पूरस्थिती, मदत आणि बचावकार्याचा आढावा घेतल्यानंतर शनिवारी (दि. 10) घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी शनिवारी सांगलीतील पूर परिस्थितीचा आढावा घेतला, तसेच …

Read More »