Breaking News

महत्वाच्या बातम्या

कळंबोली वसाहतीतील रस्ता डांबरीकरणाला मुहूर्त सापडला

कळंबोली ः राम्रपहर वृत्त कळंबोलीतील एलआयजी भागात पिण्याचे पाणी मुबलक प्रमाणात मिळावे यासाठी कळंबोली सिडको प्रशासनाने गत वर्षीच्या मे महिन्यात मोठया जलवाहिनीचे काम केले, मात्र त्यासाठी खोदून ठेवलेला भला मोठा रस्ता पूर्ववत करण्यासाठी तब्बल एक वर्षाने सिडको प्रशासनाला मुहूर्त सापडला. हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू झाल्याने नागरिकांनी …

Read More »

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत अडीच कोटी घरे पूर्ण

भाजपचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांची माहिती नवी मुंबई ः बातमीदार गोरगरीबांचे मालकीच्या घराचे स्वप्न साकार करण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आतापर्यंत 3.10 कोटी पक्की घरे देशभर बांधण्यात आली आहेत. या योजनेसाठी 3 लाख कोटीहून अधिक अर्थसहाय्य वितरीत करण्यात आले आहे, अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र …

Read More »

पनवेलमध्ये कर्करोगावर अद्यावत उपचार

मुंबई ऑन्कोकेअर सेंटरचे अभिनेत्री, निर्माती डॉ. निशिगंधा वाड यांच्या हस्ते उद्घाटन पनवेल ः वार्ताहर कर्करोगावर आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अद्ययावत उपचार करणार्‍या मुंबई ऑन्कोकेअर सेंटरच्या पनवेलमधील खांदा वसाहत येथील शाखेचे उद्घाटन रविवारी (दि. 17) रोजी सेंटरचे अभिनेत्री, निर्माती डॉ. निशिगंधा वाड तसेच टाटा मेमोरियल हॉस्पिटल नवी मुंबईचे संचालक डॉ. सुदीप गुप्ता …

Read More »

पनवेल मनपातर्फे स्वच्छता पंधरवडा उत्साहात

पनवेल : प्रतिनिधी केंद्र शासन व महाराष्ट्र  आरोग्य सेवा व अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या आदेशान्वये पनवेल महानगरपालिका अंतर्गत असणार्‍या सर्व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये  1 एप्रिल ते 15 एप्रिलदरम्यान स्वच्छता पंधरवडा राबविण्यात आला. या वेळी महापालिकेच्या चारही प्रभागांमध्ये, महापालिकेच्या शाळांमध्ये विविध कार्यक्रम राबविण्यात आले. महापालिका हद्दीतील गावांमध्ये व झोपडपट्टी …

Read More »

शिवरायांचा विचार देशाला प्रेरक – केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया

महाड : प्रतिनिधी किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या 342व्या पुण्यतिथीनिमित्त शनिवारी (दि. 16) आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहून केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी शिवरायांना अभिवादन केले. या वेळी त्यांनी शिवरायांनी जातीपातीच्या आणि अंधश्रद्धेच्या पलीकडे जात अखंड भारताचे स्वप्न साकार केले. त्यामुळे बहुजन हिताय बहुजन सुखाय या त्यांच्या विचारातूनच देश पुढे …

Read More »

शेकाप, शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्त राज्यात सध्या महाविकास आघाडीचे सरकार आहे, मात्र या सरकारचे अस्तित्व दिसत नाही. हे सरकार कुचकामी आहे, अशी टीका केली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शुक्रवारी (दि. 15) केली. ते शेकाप, शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या भाजप पक्षप्रवेश कार्यक्रमात बोलत होते. महाविकास आघाडीच्या कुबड्या घेऊन चालणार्‍या शेतकरी …

Read More »

कर्जत नांगुर्ले मंदिरात श्री मारुतीरायाची प्राणप्रतिष्ठा

कर्जत : प्रतिनिधी तालुक्यातील नांगुर्ले गावात उभारलेल्या दुमजली मंदिरामध्ये जय हनुमान मंदिर ट्रस्टच्या वतीने श्री मारुतीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यानिमित्ताने चार दिवस धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. जय हनुमान मंदिर ट्रस्टच्या वतीने नांगुर्ले गावात चार वर्षांपासून मंदिर उभारणीचे काम करण्यात येत होते. सुमारे तीस लाख रुपये खर्च करून …

Read More »

वढाव येथील यात्रेत भक्तांचा उत्साह व्दिगुणित

पेण : प्रतिनिधी पेण तालुक्यातील वढाव गावाची बहिरीदेवाची यात्रा दोन वर्षानंतर या वर्षी मोठया उत्साहात साजरी झाली. या यात्रेत मुंबई, ठाणे, पुणे, कोकणातील भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. चैत्र पौर्णिमेच्या एक दिवस अगोदर वढाव गावातील बहिरीदेवाची यात्रा भरली होती. देव काठ्यांची स्पर्धा आणि छबिना (पालखी) सोबत आपल्या अंगावर काटेरी …

Read More »

आयुष्यमान भारत आरोग्यवर्धिनी उपक्रम

लोहोप आरोग्य केंद्रात वर्धापन दिनी विविध कार्यक्रम; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी साधला ऑनलाइन संवाद खालापूर : प्रतिनिधी आयुष्यमान भारत आरोग्यवर्धिनी या उपक्रमाच्या चौथा वर्धापनदिन खालापूर तालुक्यातील लोहोप प्राथमिक आरोग्य केंद्रात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांनी केले. यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडवैया यांनी आरोग्य …

Read More »

चार दिवस सुट्ट्यांमुळे मुरूडमध्ये पर्यटकांची गर्दी

मुरूड : प्रतिनिधी सलग चार दिवस सुट्टी पडल्याने पर्यटकांनी मुरूड येथे येणे पसंत केले आहे. मुंबई, ठाणे, कल्याण, पुणे, बोरिवली व विरार आदी ठिकाणाहून मोठ्या संख्येने पर्यटक मुरूडला आले आहेत. त्यामुळे काशीद व मुरूड येथील पर्यटन व्यसायावर अवलंबून असणारे दुकानदार, हॉटेल मालक, लॉजिंग, स्टॉलधारक, घोडेवाले, टी-सेंटर, शहाळी विक्रेते यांना चांगलाच …

Read More »