Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

लोकनेते रामशेठ ठाकूर : मानवतेच्या वाटेवरील दीपस्तंभ

डॉ. संजय कांबळेप्राचार्य, सौ. एम. आर. जगताप महिला महाविद्यालय, जि. सातारा. मानवी समूहाच्या अथांग सागरामध्ये अशी काही मोजकीच नररत्ने असतात की जी सर्वसामान्य जनतेला आपल्या हृदयाच्या कप्प्यात साठवून ठेवावीत असे वाटते. त्यापैकी एक व्यक्तिमत्त्व म्हणजे तुम्हा आम्हा सर्वांचे आदरणीय लोकनेते रामशेठ ठाकूरसाहेब होय. एखाद्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व समजावून घ्यायचे असेल तर …

Read More »

शेतकरी आंदोलनात स्वतःचे रक्त सांडणारे ‘दिबा’

प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. यानिमित्ताने ‘दिबां’च्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारी मालिका…अंतुले सरकारकडून शेतकर्‍यांनी केलेल्या अपेक्षा काही दिवसांतच फोल ठरल्या. कारण शरद पवार मुख्यमंत्री …

Read More »

राज्यातील वीज कामगारांना फ्रंटलाइन वर्करचा दर्जा द्या

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पनवेल ः रामप्रहर वृत्तराज्यामधील वीज कामगार, वीज अभियंते, अधिकारी व कंत्राटी कामगार यांना फ्रंटलाइन वर्करचा दर्जा द्यावा, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. या संदर्भात त्यांनी निवेदन दिले आहे.आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या …

Read More »

शुभेच्छा देण्यासाठी निवासस्थानी येऊ नका -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा 2 जून रोजी 70वा वाढदिवस आहे. सध्या सुरू असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक व हितचिंतकांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी निवासस्थानी येऊ नये, असे आवाहन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले आहे. कोरोनामुळे सर्व व्यवहार ठप्प होऊन जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक …

Read More »

नित्यनव्याचा ध्यास घेतलेला शिक्षणमहर्षि

पत्रकारितेत 50 वर्षे सक्रिय असल्याने मानवी स्वभावांचे अनेक नमुने जवळून बघायला मिळाले. बहुतेककरून जास्त माणसं ‘उथळ पाण्याला खळखळाट फार’ याच वर्गवारीतील अधिक आढळतात. तथाकथित समाजसेवकांमध्ये तर समाजसेवेच्या नावाखाली लोकांच्या तोंडचे तूप आपल्या पोळीवर ओढून कसे घेता येईल हेच बघणारे जास्त भेटतात. स्वत:च्या तोंडचा घास समोरच्या भुकेल्याला देणारा एखादाच! त्यातही असे …

Read More »

रयतेचा आधारवड

महात्मा ज्योतिबा फुले व राजर्षी शाहू महाराजांचे बहुजन समाजाच्या उद्धाराचे कार्य आपल्या खांद्यावर घेऊन कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केशवराव बागडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित सत्यशोधक समाजाच्या परिषदेमध्ये रयत शिक्षण संस्थेची मुहूर्तमेढ रोवली व दिनांक 4 ऑक्टोबर 1919 रोजी विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर रयत शिक्षण संस्थेची स्थापना झाली. कर्मवीर अण्णांनी आपल्या अफाट कर्तृत्वाने बहुजन …

Read More »

आभाळाएवढा माणूस

महाराष्ट्राच्या सामाजिक, शैक्षणिक, राजकीय औद्योगिक इतिहासात ज्या थोर व महात्मीय व्यक्तींनी आपल्या कर्तृत्वाने नवी दिशा दिली, त्या व्यक्तींमध्ये मा. लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे नाव फार महत्त्वाचे आहे. आशिया खंडात नावाजलेल्या व शैक्षणिक क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा येथून ‘कमवा व शिका’ योजनेतून शिक्षण पूर्ण करणारे …

Read More »

इंदिरा लाटेतही ‘दिबा’ पाचव्यांदा आमदार म्हणून निवडून आले!

प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. यानिमित्ताने ‘दिबां’च्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारी मालिका…1980 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत इंदिरा गांधी यांनी काँग्रेस पक्षाच्या प्रचाराचा धडाका इतका …

Read More »

झाडे लावा, वसुंधरा वाचवा!

सभागृह नेते परेश ठाकूर यांचे आवाहन पनवेल ः रामप्रहर वृत्त5 जून या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पनवेल येथील कोशिश फाऊंडेशनच्या वतीने वृक्षारोपण मोहिमचे आयोजन करण्यात आले आहे. याद्वारे पाच हजार झाडे लावण्याचा संकल्प असून नागरिकांनीही या मोहिमेत सहभाग घ्यावा, असे आवाहन पनवेल महापालिका सभागृह नेते तथा कोशिश फाऊंडेशनचे अध्यक्ष परेश ठाकूर …

Read More »

आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक

मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा पनवेल : रामप्रहर वृत्त राज्य सरकारच्या निष्क्रिय कारभारामुळे मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे मराठा समाजाने राज्य सरकारला पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे. येत्या 6 जून म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनापूर्वी समाजाच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर किल्ले रायगडावरून …

Read More »