खोपोली : प्रतिनिधी पावसाळा सुरू होताच वर्षा सहलीसाठी निघालेल्या दुचाकीस्वार पर्यटकांवर खालापूर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. कोरोना संसर्ग लाटेचा प्रभाव काहीसा ओसरू लागल्यानंतर नागरिक बेफिकीर झाल्याचे दिसत आहे. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी विनाकारण फिरणार्या दुचाकीस्वारांवर पोलीस दंडात्मक कारवाईदेखील करीत आहेत. पावसाळा सुरू झाल्याने मुंबई, नवी मुंबईचे तरुण मोठ्या प्रमाणात खोपोली, …
Read More »ओबीसींचे आरक्षण रद्द केल्याविरोधात खोपोलीतून राज्य शासनाला निवेदन
खोपोली : प्रतिनिधी ओबीसी समाजाची जनगणना करून स्थानिक स्वराज्य संस्थामधील ओबीसीचे आरक्षण पूर्ववत द्यावे तसेच मुख्यमंत्र्यांनी ओबीसी समाजाच्या निवेदनामधील मागण्या मंजूर कराव्यात अशा मागण्यांची दोन वेगवेगळी निवेदने खोपोली शहरातील समस्त ओबीसी समाजाच्या वतीने माजी नगराध्यक्ष दत्ताजीराव मसुरकर यांच्या उपस्थितीत खालापूर तहसीलदार इरेश चपल्लवार यांना देण्यात आली. माजी नगरसेवक राजेंद्र फक्के, …
Read More »सुधागडातील आदिवासींचे भाजीचे मळे उद्ध्वस्त, नुकसानभरपाईची मागणी
पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील आदिवासी बांधव नदीकिनारी जागा शोधून तेथे भाजीपाल्याचे मळे करून आपली उपजीविका करीत आहेत. त्यांनी फुलविलेल्या मळ्यांचे तौत्के चक्रीवादळात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी बाधीत आदिवासी बांधव करीत आहेत. सुधागड तालुक्यात मोठ्या प्रमाणात आदिवासी, कातकरी बांधव असून, ते काही ठिकाणी …
Read More »रायगडला पावसाने झोडपले आज अतिवृष्टीचा इशारा
अलिबाग ः प्रतिनिधीरायगड जिल्ह्यात बुधवारी (दि. 9) पावसाने दमदार हजेरी लावली. सकाळपासूनच पावसाच्या जोरदार सरी बरसत होत्या. त्यामुळे कामावर जाणार्या नागरिकांची त्रेधातिरपिट उडाल्याचे दिसून आले. जिल्ह्यात गेल्या 24 तासांत सरासरी 58.99 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने पुढील 48 तासांत रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.रायगड …
Read More »‘पोस्को’च्या सांडपाण्याने नैसर्गिक जलस्रोत दूषित
कडापे ग्रामपंचायतीचा आंदोलनाचा इशारा माणगाव : प्रतिनिधीपोस्को स्टील कंपनीतील केमिकल मिश्रीत सांडपाण्यामुळे परिसरातील नैसर्गिक जलस्त्रोत प्रदूषित होत आहेत. या दुषीत पाण्यामुळे कडापे (ता. माणगाव) सह अनेक ग्रामपंचायतीमधील ग्रामस्थांना विविध आजारांना तोंड द्यावे लागत आहे. पोस्को कंपनीने कडापे ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थांना शुध्द पाणीपुरवठा करावा, अन्यथा उग्र आंदोलन करण्याचा इशारा कडापे ग्रामपंचायतीचे …
Read More »लसीकरणाबाबत आदिवासी समाजात संभ्रम; खालापुरात प्रशासन, सामाजिक संघटनांकडून जनजागृती
खोपोली : प्रतिनिधी कोरोना प्रतिबंधक लसीबाबत खालापूर तालुक्यातील आदिवासी समाजात विविध प्रकारचे गैरसमज असून, लस घेण्यासाठी टाळाटाळ होत असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. जनजागृतीसाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत. कोरोनापासून बचावासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. मास्क, सामाजिक अंतर आणि लॉकडाऊनचे पर्याय यांनीसुद्धा कोरोना आटोक्यात येत नसल्याने आरोग्य यंत्रणेवर …
Read More »विनाकारण फिरणार्यांची अँटीजेन टेस्ट; सुधागडात आढळले सात कोरोना पॉझिटिव्ह
पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यात विनाकारण व विनामास्क फिरणार्यांची 63 जणांची सोमवारी (दि. 7) पाली, परळी व उन्हेरे फाट्यावर तालुका आरोग्य विभागाकडून अँटीजेन टेस्ट करण्यात आली. यामध्ये तब्बल सात जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत मढवी यांनी दिली. पालीमध्ये झालेल्या कारवाईत नगरपंचायत शिपाई प्रवीण थळे, …
Read More »रायगडात उद्यापासून अतिवृष्टीचा इशारा; दरडग्रस्त गावांमधील लोकांचे होणार स्थलांतर
अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात दोन दिवस (दि. 10 व 11) अतिवृष्टी होण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे समुद्रकिनार्यावरील 62 गावे, खाडीकिनार्यावरील 128 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यातील 20 दरडग्रस्त गावांमधील लोकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात येणार आहे. मुबईसह उत्तर कोकणमध्ये 10 व 11 जून रोजी अतिवृष्टी …
Read More »नियोजित डोलवी प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध; जमीन मोजणीसाठी आलेल्या अधिकार्यांना रोखले
पेण : प्रतिनिधी तालुक्यातील काराव-गडब, डोलवी, वडखळ, बोरी ग्रामपंचायत परिसरात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) डोलवी औद्योगिक वसाहत विकसित करीत आहे. त्यासाठी सोमवारी (दि. 7) एमआयडीसी आणि भूमिअभिलेख विभागाच्या अधिकार्यांनी भूसंपादन करण्याचा प्रयत्न केला. त्याला शेतकर्यांनी तीव्र विरोध केला. त्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते. डोलवी औद्योगिक वसाहतीसाठी एमआयडीसी …
Read More »विमानतळाला ‘दिबां’चे नाव देण्याच्या मागणीसाठी 10 जूनला
अलिबाग येथे मानवी साखळी अलिबाग ः प्रतिनिधीरायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यात उभारण्यात येणार्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवंगत लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे या मागणीसाठी 10 जून रोजी अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालय ते चरी अशी 10 किलोमीटर लांबीची मानवी साखळी करण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपचे दक्षिण जिल्हाध्यक्ष …
Read More »