नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रामधून सायन-पनवेल महामार्ग, जुना मुंबई-पुणे महामार्ग, मुंबई-गोवा महामार्ग, ठाणे-बेलापूरसह पामबीच रोड हे प्रमुख रस्ते आहेत. या मार्गांवर अपघातही मोठ्या प्रमाणात होत असतात. 2018 मध्ये आयुक्तालय क्षेत्रामध्ये तब्बल 1203 अपघात झाले आहेत. या अपघातांमध्ये 920 जण जखमी झाले असून, 258 जणांचा मृत्यू …
Read More »गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर धडक कारवाई
अहमदनगर ः प्रतिनिधी लोकसभा निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी पोलिसांनी जय्यत तयारी केली आहे़ जिल्ह्यातील 25 हजारांपेक्षा जास्त गुन्हेगारी प्रवृत्तींच्या लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार असून, यातील 9 हजार जणांना पोलिसांनी आतापर्यंत नोटीस पाठविली आहे़ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या 10 हजार जणांना निवडणूक काळात हद्दपार केले जाणार आहे़ पोलीस …
Read More »दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला मनपा आयुक्तांकडून नोटीस
पुणे ः प्रतिनिधी जमीन कराराचे उल्लंघन केल्याप्रकरणी पुण्याच्या आयुक्तांनी लता मंगेशकर फाऊंडेशन आणि दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला नोटीस बजावली आहे. कमीत कमी दरात वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचा करार दीनानथ मंगेशकर रुग्णालयाने मोडला असल्याची तक्रार रमेश धर्मावत यांनी दाखल केली आहे. काही वर्षांपूर्वी 99 एकर जमीन मंगेशकर फाऊंडेशनने सरकारकडून केवळ एक …
Read More »‘जवानांचे बलिदान देश विसरला नाही’
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांच्या शौर्याला देश कधी विसरणार नाही आणि विसरूही देणार नाही, असे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी म्हटले आहे. केंद्रीय रिझर्व्ह पोलीस बलाच्या (सीआरपीएफ) 80व्या वर्धापन दिनानिमित्त हरियाणातील गुरुग्राम येथे आयोजित कार्यक्रमात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या …
Read More »राज्यात काँग्रेसची वाट बिकट; जागावाटपाचा तिढा सोडवण्यात राज्य नेतृत्व अपयशी
मुंबई ः प्रतिनिधी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष प्रचाराला लागले आहेत. महाराष्ट्रातही शिवसेना-भाजपाने युती जाहीर करून दोन्ही पक्षांच्या संयुक्त कार्यकर्त्यांचे मेळावे घेण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार सुरू ठेवलंय, मात्र या सगळ्या राजकीय घडामोडीत विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने अद्यापही औपचारिकरित्या आघाडीची …
Read More »चवदारतळे सत्याग्रहनिमित्त भीमरत्न पुरस्कार जाहीर
महाड : प्रतिनिधी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 20 मार्च 1927 रोजी महाड चवदार तळ्याचा सत्याग्रह केला. या क्रांतिदिनाचा 92 वा स्मृतिदिन 20 मार्च रोजी साजरा होत आहे. कोकण रिपब्लिकन सामाजिक संस्थेच्या वतीने या वर्षापासून भीमरत्न पुरस्कार दिले जाणार आहेत. कोकण रिपब्लिकन सामाजिक संस्थेच्या वतीने पाच नामांकित आणि कर्तृत्ववान व्यक्तींना …
Read More »सोशल मीडियावरील प्रचाराला आचारसंहितेचे चटके चौकटी सांभाळून कार्यकर्त्यांची प्रचाराला सुरुवात
पेण : प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी-शेकाप आघाडी व शिवसेना-भाजप युती यामध्ये रायगड लोकसभा मतदारसंघात टक्कर होणार हे निश्चित झाले आहे. आघाडी-युतीच्या उमेदवारांनीही तयारी सुरू केली आहे. उमेदवारी अर्ज भरण्यास 28 मार्चपासून सुरुवात होत असली, तरी आघाडी व युतीच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर प्रचार सुरू …
Read More »लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची जागोजागी नाकाबंदी
अहमदनगर ः प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस विभागाच्या यंत्रणेकडून जिल्ह्याचा सीमा असलेल्या भागासह महत्त्वाच्या ठिकाणी चेकपोस्ट, नाकाबंदी करण्यात आली आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून नगर जिल्ह्याच्या हद्दीवर नाकाबंदी करण्यात आली आहे, तसेच चेकपोस्टही उभारण्यात आले आहेत. पोलिसांकडून वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. रविवारी शेवगाव-गेवराईच्या सरहद्दीवर महारटाकळी येथे …
Read More »काँग्रेसशी संबंध नाही -मायावती
नवी दिल्ली : वृत्तसंस्था आमचा आणि काँग्रेसचा काही संबंध नाही. समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांची आघाडी लढण्यास सक्षम आहे. काँग्रेसने सप-बसप आघाडीसोबत असल्याच्या अफवा पसरवू नये, असा इशारा बसपच्या सर्वेसर्वा मायावती यांनी दिला आहे. मायावती यांनी ट्विट करीत सांगितले की, काँग्रेसने सात जागा सप-बसप आघाडीसाठी सोडल्याचे सांगण्यात येत …
Read More »दिव्यांग मतदारांसाठी आता सरकारी वाहनांची व्यवस्था
नागपूर ः प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीत दिव्यांगांचे मतदान 100 टक्के व्हावे, या उद्देशाने निवडणूक आयोगाने मतदान केंद्रांवर दिव्यांगांसाठी विशेष सुविधा पुरविण्याचे निर्देश दिले आहेत. इतकेच नव्हे तर दिव्यांगांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी आणि घरी पोहचविण्यासाठी शासकीय वाहनाची व्यवस्थाही प्रत्येक मतदान केंद्रांवर राहील. नागपूर जिल्ह्यात एकूण सात हजार दिव्यांग मतदार असल्याचे निश्चित करण्यात …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper