Breaking News

Ramprahar News Team

कर्जतचा कायापालट करण्यासाठी प्रयत्नशील

शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे आश्वासन कर्जत ः प्रतिनिधी कर्जत तालुक्यात आमदार महेंद्र थोरवे यांनी विकासाची गंगा आणली आहे. कर्जतचा कायापालट करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. काम करणार्‍यांवरच टीका होते. ती झालीही पाहिजे कारण त्यामधूनच आपण आपल्या चुका दुरूस्त करून पुढे यशस्वी वाटचाल करू शकतो, असे प्रतिपादन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर …

Read More »

करोटी ग्रामस्थांचा भाजपात प्रवेश

आमदार रविशेठ पाटील यांनी केले स्वागत पेण ः प्रतिनिधी अनेक वर्षांपासून करोटी ग्रामपंचायतीतील गावांचा विकास खुटला असल्याने येथील काही ग्रामस्थांनी आपल्या विभागाचा विकास साधण्यासाठी एकत्र येऊन रविवारी (दि. 6) आमदार रविशेठ पाटील यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून गावढोशी येथील विक्रम मोरे यांच्या प्रयत्नाने भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. करोटी विभाग मोहिली …

Read More »

रायगड जिल्ह्यातील 76 तलावांचे संवर्धन

सरोवर संवर्धन अभियानांतर्गत राजिप करणार सुशोभिकरण अलिबाग ः प्रतिनिधी पर्यावरण संतुलन व जैवविविधतेत तलाव, सरोवर व जलाशयांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे त्यांचे जतन करण्यासाठी शासनाने सरोवर संवर्धन अभियान सुरू केले आहे. या अभियानांतर्गत रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यातील 76 तलावांमधील गाळ काढणे, सुशोभिकरण करणे, बळकटीकरण किंवा पुनर्जिवित करणे अशी कामे …

Read More »

रायगड जिल्ह्यात शेती क्षेत्र कमी होतेय!

विविध प्रकल्प, रस्ते यासाठी संपादित केलेल्या जमिनी, शेतीकडे तरुण पिढीने फिरवलेली पाठ, मागील सरकारमुळे रखडलेले सिंचन प्रकल्प, प्रत्यक्ष सिंचनावर आधारित पीकवाढीकडे झालेले दुर्लक्ष अशा अऩेक कारणांमुळे पिकांखालील क्षेत्र कमी होत आहे. त्यामुळे भूगोलाच्या पुस्तकात रायगड जिल्ह्याची भाताचे कोठार अशी ओळख आता इतिहासजमा होण्याची भीती निर्माण झाली आहे. जिल्ह्यामध्ये पावसाचे प्रमाण …

Read More »

कल्याणकारी कौल

आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना मदतीचा हात देण्याची गरज आहे हे ओळखून मोदी सरकारने 2019मध्ये 103वी घटनादुरुस्ती केली आणि आर्थिक दुर्बलांसाठी सरकारी नोकर्‍या तसेच शैक्षणिक प्रवेशांमध्ये 10 टक्क्यांपर्यंत आरक्षण ठेवण्याची तरतूद केली. हा ऐतिहासिक निर्णय होता आणि असे धाडस या आधी कुठल्याच सरकारने दाखवले नव्हते, परंतु या घटनादुरुस्तीस सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. …

Read More »

माणगावात आवळी भोजनाची अनोखी परंपरा

माणगाव ः प्रतिनिधी भारतीय संस्कृतीत अनेक प्रथा परंपरा रूढ आहेत. कार्तिक महिन्यात दीपावलीनंतर कार्तिक शुक्ल नवमी ते कार्तिक पौर्णिमा या काळात आवळी भोजनाची खास परंपरा रूढ असून या परंपरेचे आजही ग्रामीण शहरी भागात पालन केले जाते. सध्या या प्रथेचा कालावधी सुरू असून अनेक ठिकाणी आवळी भोजनाचा आनंद घेतला जात आहे. …

Read More »

वाकण-पाली-खोपोली राज्यमहामार्गावर एमएसआरडीसीकडून रिफ्लेक्टर व पांढरे पट्टे

सुधागड ः रामप्रहर वृत्त वाकण पाली खोपोली राज्य महामार्ग 548 (अ) रुंदीकरणाचे बहुतांश काम मार्गी लागले आहे, मात्र नवीन रस्त्याला दोन्ही बाजूने पांढरे पट्टे तसेच रिफ्लेक्टर नसल्याने हा रस्ता असुरक्षित झाला होता. याबाबत वृत्त प्रसिद्ध होताच, एमएसआरडीसी प्रशासनाने या मार्गावर दोन्ही बाजूला पांढरे पट्टे मारण्यास सुरुवात केली आहे. पांढरे पट्टे …

Read More »

मुरूड आगारातील गाड्या रस्त्यातच होतायेत बंद; प्रवासी हैराण

मुरूड ः प्रतिनिधी     मुरूड आगाराला गेल्या अनेक वर्षांपासून नवीन गाड्या उपलब्ध न झाल्याने जुन्या गाड्यांवरच कारभार सुरू आहे, मात्र जुन्या गाड्या आता सातत्याने बंद पडू लागल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. सोमवारी (दि. 7) मुरूड-मुंबई गाडी (क्र. एमएच 14 बीटी 3058) नांदगाव येथील स्टेट बँकेजवळ बंद पडली. त्यामुळे प्रवाशांना …

Read More »

ज्या जनतेने आमदार केले त्यांच्याशी प्रामाणिक

आमदार शहाजीबापू पाटील यांचे रेवदंड्यात प्रतिपादन रेवदंडा ः प्रतिनिधी ज्या जनतेने आमदार केले, त्यांच्याशी प्रामाणिक असल्याचे प्रतिपादन आमदार शहाजी बापू पाटील यांनी रेवदंडा येथील बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या पक्षप्रवेश सोहळ्या वेळी उपस्थितांना संबोधिताना केले. रेवदंडा येथील नानानानी पार्क येथे संभाजी बिग्रेडचे माजी जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल मोरे यांनी त्यांच्या समर्थकांसह बाळासाहेबांची शिवसेना पक्षात …

Read More »

पथविक्रेत्यांना जागा देण्याचे धोरण असताना त्यांच्यावरील कारवाई अयोग्य

माजी उपमहापौर सीताताई पाटील यांचा पालिका प्रशासनावर आक्षेप पनवेल : वार्ताहर खांदा वसाहतीमध्ये राष्ट्रीय फेरीवाला धोरण राबवले गेलेले नाही. त्याचबरोबर पथविक्रेत्यांना पर्यायी जागासुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. असे असताना त्यांच्यावर महापालिकेकडून कारवाई करण्यात येत आहे. यावर माजी उपमहापौर सीताताई पाटील यांनी आक्षेप घेतला आहे. अगोदर पुनर्वसन आणि पर्यायी जागा …

Read More »