Breaking News

Ramprahar News Team

मुरूड तालुका कोरोनामुक्तीच्या मार्गावर; तहसीलदार गमन गावित यांचा दावा

मुरूड : प्रतिनिधी कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने केलेल्या उपाययोजनांना येथील जनतेने चांगला प्रतिसाद दिल्याने मुरूड तालुका कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर असून कोरोनामुक्त होणारा हा राज्यातील पहिला तालुका ठरणार आहे, असा दावा तहसीलदार गमन गावित यांनी केला. ते रविवारी (दि. 18)  प्रसारमाध्यमांशी बोलत होते. मुरूड तालुक्यात आतापर्यंत 431 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण …

Read More »

नवरात्रोत्सवावर कोरोनाचे सावट; नागोठण्यातील श्री जोगेश्वरी माता मंदिरात नियमांचे पालन

नागोठणे : प्रतिनिधी येथील ग्रामदैवत श्री जोगेश्वरी माता, भैरवनाथ महाराज, व्याघ्रेश्वर मंदिरातील नवरात्र उत्सवाला शनिवारपासून प्रारंभ करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वर्षी शासनाचे सर्व नियम पाळूनच मंदिरात नवरात्र साजरा करण्यात येत असल्याचे उत्सव समिती अध्यक्ष बाळासाहेब टके, उपाध्यक्ष विनायक गोळे आणि पदाधिकार्‍यांनी स्पष्ट केले. या उत्सवात दरवर्षी घेण्यात येणारे कीर्तन, …

Read More »

‘शेतकर्‍यांना तत्काळ नुकसानभरपाई द्यावी’

माणगाव : प्रतिनिधी परतीच्या पावसाने भातपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, शेतकरी राजा पुरता हवालदिल झाला आहे. माणगाव तालुक्यातही भातपीक भिजून शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना राज्य शासनाने तत्काळ थेट मदत द्यावी, अशी मागणी माणगाव तालुका भाजप अध्यक्ष संजयआप्पा ढवळे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे केली …

Read More »

परतीच्या पावसाने शेतीचे नुकसान; पंचनाम्याची प्रतीक्षा; सुधागडातील बळीराजा हवालदिल

पाली : रामप्रहर वृत्त परतीच्या वादळी पावसामुळे सुधागड तालुक्यातील भातशेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. कापणीसाठी तयार झालेले भाताचे पीक मातीमोल झाले, मात्र मागणी करूनही या नुकसानीचे अजूनही पंचनामे केले गेले नसल्याचा आरोप तालुक्यातील शेतकर्‍यांनी केला आहे. सुधागड तालुक्यात या वर्षी मोठ्या प्रमाणात भाताची लागवड करण्यात आली होती. समाधानकारक पाऊस झाल्याने …

Read More »

गडचिरोलीत पाच नक्षलवाद्यांचा खात्मा

गडचिरोली : प्रतिनिधी गडचिरोली येथील धानोरा अंतर्गत येणार्‍या पोलीस मदत केंद्र ग्यारापती हद्दीतील कोसमी-किसनेली जंगल परिसरात रविवारी (दि. 18) झालेच्या चकमकीत पाच नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलीस दलाच्या सी-60 जवानांना यश आले. मृतांमध्ये तीन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. जवानांनी नक्षलवाद्यांचा कॅम्प उद्ध्वस्त केला असून, घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही ताब्यात …

Read More »

रायगड जिल्ह्यात 175 नवे पॉझिटिव्ह; एकाचा मृत्यू; 281 रुग्णांची कोरोनावर मात

पनवेल ः रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक घट होताना पहावयास मिळत असून, रविवारी (दि. 18) नव्या 175 रुग्णांची आणि एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली, तर दिवसभरात 281 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 108 व ग्रामीण 25) तालुक्यातील 133, अलिबाग 11, उरण व …

Read More »

सगळी जबाबदारी केंद्राची, मग तुम्ही काय करणार?; चंद्रकांत पाटील यांचा राज्य सरकारला सवाल

सांगली : प्रतिनिधी राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली आहे. सगळी जबाबदारी केंद्र सरकारकडे, मग तुम्ही काय करणार, असा खोचक सवाल पाटील यांनी केला आहे तसेच मदत करण्याची पहिली जबाबदारी राज्य सरकारची आहे, असे स्पष्ट करीत तातडीने ती जाहीर करावी, अशी …

Read More »

शेकाप, काँग्रेसला गळती; ओवळे आणि पागोटेतील कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्त उरण विधानसभा मतदारसंघातील ओवळे आणि पागोटे येथील शेतकरी कामगार पक्ष व काँग्रेसच्या ग्रामपंचायत सदस्यांसह अनेक कार्यकर्त्यांनी रविवारी (दि. 18) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि उरणचे आमदार महेश बालदी यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. पनवेल शहरातील मार्केट यार्ड येथील श्री. रामशेठ ठाकूर …

Read More »

‘फेब्रुवारी 2021पर्यंत देशातील कोरोना आटोक्यात’

नवी दिल्ली : भारतातील कोरोनाच्या साथीचा आलेख आता हळूहळू ढासळण्यास सुरुवात होईल आणि कोरोनाचे संकट फेब्रुवारी 2021पर्यंत आटोक्यात येईल, असा दावा सरकारने स्थापन केलेल्या वैज्ञानिकांच्या समितीने केला आहे. देशात कोरोनाच्या केसेस एक कोटी सहा लाखांपेक्षा जास्त वाढणार नाहीत, असेही या समितीने म्हटले आहे. सध्याच्या घडीला भारतात कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 75 …

Read More »

रायगड जिल्ह्यात 230 नवे पॉझिटिव्ह; सात रुग्णांचा मृत्यू

पनवेल ः रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा जोर दिवसेंदिवसत ओसरत असून, गुरुवारी (दि. 15) नव्या 230 रुग्णांची आणि सात रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली, तर दिवसभरात 376 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 140 व ग्रामीण 38) तालुक्यातील 178, रोहा 11, उरण व अलिबाग प्रत्येकी आठ, खालापूर …

Read More »