Breaking News

Ramprahar News Team

नवी मुंबईत बाल मृत्यूदर आटोक्यात

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबईमध्ये कोरोनाबाधित बालकांचे मृत्युचे प्रमाण कमी करण्यात पालिकेला यश आले असून आतापर्यंत 10 वर्षांपर्यंतच्या वयोगटातील फक्त एकच बालकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांसाठी हे नक्कीच दिलासादायक वृत्त आहे. तसेच मनपाच्या रुग्णालयात जवळपास साडेतीनशे कोरोनाबाधित महिलांची सुरक्षितपणे प्रसूती करण्यात आली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने …

Read More »

‘सेवापुस्तक आपल्या दारी’; कर्जत शिक्षण विभागाचा उपक्रम

कर्जत : बातमीदार तालुक्यातील शिक्षण विभागाने सेवापुस्तक आपल्या दारी हा उपक्रम सुरू केला आहे. या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ कर्जतचे गटशिक्षणाधिकारी संतोष दौंड यांच्या उपस्थितीत करण्यात आला. सेवापुस्तक हा सरकारी कर्मचार्‍याचा आत्मा असतो.  सेवाकाळात व निवृत्त होताना या सेवापुस्तकास अनन्यसाधारण महत्त्व आहे. सेवापुस्तकातील नोंदीवरूनच कर्मचार्‍याचे निवृत्तीवेतन व इतर भत्ते ठरत असतात. …

Read More »

माथेरान आदिवासी वाड्यांच्या प्रश्नावर एकमत

कर्जत : बातमीदार तालुक्यातील माथेरानच्या डोंगरात वसलेल्या 12 आदिवासी वाड्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी आदिवासी कार्यकर्ते एकत्र आले आहेत. वन विभागाने पिढ्यान्पिढ्या वसलेल्या आदिवासी वाड्यांना जोडणारा रस्ता बनविणे, स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून देणे, खावटी कर्ज आणि धान्य प्रस्ताव यांना मान्यता देणे आणि मनरेगामधून कामे मंजूर करणे आदी कामे वन विभागाकडून करून …

Read More »

पोलादपुरात माकडांचा, तर तालुक्यात रानडुकरांचा हैदोस; श्वान निर्बिजीकरणानंतरही पिल्ले रस्त्यावर

पोलादपूर : प्रतिनिधी शहरामध्ये गेल्या काही वर्षांपासून माकडांचा उच्छाद वाढला असून, तालुक्यात भातपीक हाताशी येत असताना रानडुकरांच्या झुंडी वाढत आहेत. पोलादपूर नगरपंचायतीने मोकाट कुत्र्यांचे निर्बिजीकरण करून नियंत्रण ठेवल्यानंतरही शहरातील विविध रस्त्यांवर गेल्या आठवडाभरात कुत्रीची पिल्ले आढळून आल्याने निर्बिजीकरणाच्या खर्चाच्या फलश्रृतीबाबत शंका निर्माण झाली आहे. पोलादपूर शहरामध्ये 2006 पासून माकडांचा मुक्त …

Read More »

भांदरे नदीवरील पूल कोसळला; काळ प्रकल्प अधिकार्‍यांचे दुर्लक्ष

माणगाव : प्रतिनिधी काळ प्रकल्पाचा भांदरे चौकीजवळील व नदीवरील पूल कोसळल्याने गेल्या दोन महिन्यांपासून परिसरातील मळेगाव आदिवासीवाडी, हातकेळी, मुगवली, कविळवहाळ व भांदरे या गावांचा संपर्क तुटला असून, ग्रामस्थांचा शेतावर जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. पूल तुटल्याची माहिती सरपंचांनी सर्व संबंधित विभागांना दिली असूनही दोन महिने होत आले तरी काळ प्रकल्पाचे …

Read More »

खोपोलीत भाजपतर्फे मोफत चष्मेवाटप

खोपोली : प्रतिनिधी भारतीय जनता पक्ष खोपोली शहर मंडळाच्या वतीने सेवा सप्ताहाच्या निमित्ताने 14 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरपर्यंत स्वच्छता मोहीम,प्लास्टिक मुक्ती, आदी कार्यक्रम झाले. विविध कार्यक्रमापैकी सेवा सप्ताह कार्यक्रमांतर्गत नेत्रतपासणी करण्यात आली. बुधवारी गरजुंना चष्मे मोफत वाटपाचा कार्यक्रम खोपोली शहर मध्यवर्ती कार्यालयात मान्यवरांच्या हस्ते पार पडला. 75 नागरिकांची तज्ञ डॉक्टरांकडून …

Read More »

पनवेलमध्ये 319 नवे रुग्ण; सहा जणांचा मृत्यू; 276 रुग्णांची कोरोनावर मात

पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात बुधवारी (दि. 7) कोरोनाचे 319 नवीन रुग्ण आढळले असून सहा जणांचा मृत्यू झाला आहे, तर 276 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 273 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पाच जणांचा मृत्यू झाला आहे, तर 222 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी …

Read More »

उत्तम चालले आहे

या सरकारचे हे काय चालले आहे, असा प्रश्न भारतीय जनता पक्षाचा एकेकाळचा मित्रपक्ष म्हणवणार्‍या पक्षातर्फे विचारला जात आहे. खरे पाहता असा प्रश्नच कोणाला पडायला नको. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थ नेतृत्वाखाली संपूर्ण देश एकदिलाने वेगवेगळ्या आघाड्यांवर लढत आहे. शत्रूशी निकराने मुकाबला करत आहे आणि त्याच वेळी स्वत:चा सर्वंकष विकासदेखील साधत …

Read More »

शिरढोण येथील चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर

पनवेल : रामप्रहर वृत्त वन्यजीव सप्ताहाचे औचित्य साधून कर्नाळा पक्षी अभयारण्य व ग्रामपरिस्थितिकीय विकास समिती शिरढोण यांच्या संयुक्त विद्यमाने वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली खुली चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. कर्नाळा किल्ला परिसर व तेथील पशु व पक्षी, वन्यजीव आणि मानव संघर्ष, पशुपक्षी वाचवा, निसर्ग सजवा, मी पाहिलेला …

Read More »

राज्य सरकारच्या निर्णयाचा खारघर-तळोजा मंडलकडून निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त देशातील कृषिवल सुखी व्हावा, होणार्‍या आत्महत्या कमी व्हाव्यात व एक देश एक बाजारपेठ ही संकल्पना प्रत्यक्षात यावी म्हणून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी सुधारणा कायदे देशात लागू केले. शेतकर्‍यांच्या समस्येचे निराकरण करण्याच्या उद्देशाने हा कायदा पारित करण्यात आला. चांगल्या विधेयकाला विरोध करून राज्य सरकारने …

Read More »