Breaking News

Ramprahar Team

खालापूरच्या सुरक्षेसाठी आता ‘तिसरा डोळा’

पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांच्या हस्ते सीसीटीव्ही संचाचे लोकार्पण खोपोली, खालापूर : प्रतिनिधी पूर्वी गुन्हेगारीवर वचक ठेवण्यासाठी खबर्‍यांचे जाळे असायचे. आता बदलत्या काळाप्रमाणे सीसीटीव्ही तंत्रज्ञान पोलीस विभागाकरिता अतिशय उपयुक्त ठरत असून, खालापूर येथे लोकसहभागातून सीसीटीव्ही संचाचे लोकार्पण करताना अतिशय आनंद होत आहे, अशी भावना रायगडचे पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी …

Read More »

वृक्ष लागवड मोहिमेवर कोरोनाचा परिणाम

रोपांच्या संख्येत घट; यंदाचा लक्ष्यांक घसरला अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे यंदाच्या पावसाळ्यात वृक्ष लागवड मोहीम हाती घेतली जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायत हद्दीत किमान 200 झाडे लावण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. या उपक्रमाकरिता जिल्ह्यातील विविध रोपवाटिकांमध्ये रोपे उपलब्ध करून देण्यात आली आहेत, मात्र यंदा कोरोनामुळे नवीन …

Read More »

अवकाळी पावसाचा पाणीटंचाईग्रस्त भागाला आधार

कर्जत तालुक्यातील दरवर्षी जाणवणारी पाणीटंचाई लक्षात घेऊन या वर्षी संभाव्य पाणीटंचाई निवारण आराखडा तयार करण्यात आला होता, मात्र या वर्षी उन्हाळ्यात अनेकदा अवेळी पाऊस आला आणि या अवेळी पावसाने मार्च महिन्यात तळ गाठणार्‍या विहिरींत पाणी साचून राहत होते. दरम्यान, त्यामुळे कर्जत तालुक्यातील 19 गावे आणि 57 वाड्या पाणीटंचाईग्रस्त होत्या, मात्र …

Read More »

दुसरी लाट ओसरतेय…

वैश्विक महामारी कोरोनाचा देशात झालेला उद्रेक क्षमताना दिसत आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असून मृत्यूदरही घटत आहे. सलग दुसर्‍या वर्षी आलेले कोविड-19 विषाणूचे संकट हळूहळू सरत असल्याने जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले आहे. आगामी काळात यात अधिक सुधारणा होण्याची चिन्हे आहेत. कोरोना या तीन अक्षरी शब्दाने जगात होत्याचे नव्हते …

Read More »

शुभेच्छा देण्यासाठी निवासस्थानी येऊ नका -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा 2 जून रोजी 70वा वाढदिवस आहे. सध्या सुरू असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक व हितचिंतकांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी निवासस्थानी येऊ नये, असे आवाहन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले आहे. कोरोनामुळे सर्व व्यवहार ठप्प होऊन जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक …

Read More »

लोकसभा निवडणुकीतील ‘दिबां’च्या विजयाने काँग्रेसचा बालेकिल्ला ढासळला!

प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. यानिमित्ताने ‘दिबां’च्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारी मालिका… आणीबाणीच्या काळात अनेक गोष्टींवर सरकारने निर्बंध घातले. स्वातंत्र्याचा संकोच करण्यात आला. वृत्तपत्रांवर …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त गरजूंना मदतीचा ओघ कायम

पनवेल ः रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गरीब, गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने रविवारी (दि. 30) केवाळे, चिखले, वाजे ग्रामपंचायत, मोहो, सांगडे, कामोठे गुरुद्वारा, चिंचपाडावाडी, कोल्ही (कोपर), दापोली, कुंडेवहाळ, कोळखे, नांदगाव, तळोजा फेज-1, भानघर, जांभिवली, उसर्ली (रिटघर) आदी गावांत जीवनावश्यक …

Read More »

माजी आमदार सुरेश लाड यांच्या समर्थकांकडून आमदार महेंद्र थोरवे यांचा जाहीर निषेध

कर्जतमध्ये शिवसेना-राष्ट्रवादीमधील वाद वाढला कर्जत ः बातमीदार  रायगड जिल्ह्यात महाविकास आघाडीत बिघाडी झाली आहे. जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे तसेच कर्जतचे माजी आमदार सुरेश लाड यांच्यावर शिवसेनेचे विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांनी केलेले आरोप आणि अर्वाच्च भाषेतील वक्तव्याबद्दल कर्जत तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने शनिवारी (दि. 29) निषेध करण्यात आला. कर्जत …

Read More »

न्यायासाठी अरविंद म्हात्रे यांना राजकारणविरहित साथ मिळेल

राजेंद्र पाटील यांनी केले जाहीर पनवेल ः रामप्रहर वृत्त कर्नाळा बँक प्रशासनाने कर्ज देताना वडिलांची फसवणूक केली, असा आरोप करण्याबरोबरच कर्नाळा बँक प्रशासनाने केलेल्या या गैरव्यवहारप्रकरणी बँकेवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शेकापचे नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी केली आहे. या संदर्भात म्हात्रे यांना आवश्यक असेल तर कर्नाळा बँक ठेवीदार संघर्ष …

Read More »

स्थानिक स्वराज्य संस्थेतील अतिरिक्त ओबीसी आरक्षण रद्दच राज्य सरकारला ‘सर्वोच्च’ झटका

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था ग्रामपंचायत, जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थेतील अतिरिक्त ओबीसी आरक्षण रद्द करण्याचा उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत राज्य सरकारने दाखल केलेली फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. त्यामुळे मराठा आरक्षणावरून आधीच अडचणीत आलेल्या ‘मविआ’ला दुसरा झटका बसला आहे. याआधी जि. प. कायद्यातील कलम 12 सर्वोच्च न्यायालयाने रद्द …

Read More »