Breaking News

Ramprahar Team

मच्छीमारांना भरपाई मिळून देण्यासाठी भाजप प्रयत्नशील

नवी मुंबई : प्रतिनिधी 2020 पासून कोकणपट्टीमधील सहा जिल्ह्यांत मत्स्यव्यवसाय करणार्‍या मच्छीमारांवर मोठी आर्थिक संकटे आली आहेत. त्यांना पुन्हा एकदा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी नवी मुंबईमधील विधानपरिषद आमदार रमेश पाटील व त्यांचे सुपुत्र भाजप राज्य मच्छीमार सेलचे प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. चेतन पाटील प्रयत्न करीत आहेत. शासनाबरोबर बैठका, निवेदनाबरोबरच प्रशासन संबंधित विभागाचे मत्स्यविकास …

Read More »

सलूनवाल्यांनी मांडली विरोधी पक्षनेत्यांकडे व्यथा

माणगाव ः प्रतिनिधी तौक्ते चक्रीवादळाचा कोकणाला जबरदस्त तडाखा बसला. या वादळग्रस्त भागाची पाहणी करताना रायगड जिल्ह्याच्या दौर्‍यावर असताना बुधवारी (दि. 19) सायंकाळी राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर माणगाव येथे आले होते. त्या वेळी येथील सलून व्यावसायिकांनी आपली व्यथा त्यांच्यापुढे …

Read More »

महाड शहरातील प्रवेशाचे मार्ग रोखले; पोलिसांची कारवाई

महाड ः प्रतिनिधी महाड शहरातील वाढती गर्दी कमी करण्यासाठी बुधवारी (दि. 19) अखेर पोलिसांनी विनाकारण फिरणार्‍यांना शहरात येणारे तीन मार्ग पूर्णपणे बंद केले. यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होणार असून, पोलीस प्रशासनाकडून हा एकच उपाय असल्याचे सांगण्यात येत आहे. महाड तालुक्यातील कोरोना वाढीचा दर हा इतर तालुक्यांच्या तुलनेने जास्त आहे. महाड …

Read More »

महाड तालुक्यात चक्रीवादळामुळे 451 घरांचे, 30 गोठ्यांचे नुकसान

18 जिल्हा परिषद शाळांचीदेखील हानी महाड ः प्रतिनिधी गतवर्षी निसर्ग चक्रीवादळातून सावरणार्‍या कोकणातील नागरिकांना या वर्षी पुन्हा एकदा तोक्ते चक्रीवादळाने तडाखा दिला आहे. महाड तालुक्यात आतापर्यंत झालेल्या पंचानाम्यातून जवळपास 451 घरांचे नुकसान झाले आहे. घरांबरोबरच इतर खासगी मालमत्ता आणि शासकीय मालमत्तेचेदेखील मोठे नुकसान झाले आहे. महाड तालुक्यात तोक्ते चक्रीवादळ थेट …

Read More »

मोर्बा येथील बाजारपेठ पाच दिवस राहणार बंद

वाढत्या कोरोनामुळे ग्रामस्थांनी घेतला स्वयंस्फूर्तीने निर्णय माणगाव ः प्रतिनिधी संपूर्ण जगात हाहाकार उडविणार्‍या कोरोना महामारीने सारेजण मानसिक तणावाखाली आहेत.रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात 250हून अधिक रुग्ण अ‍ॅक्टिव्ह असून, तालुक्यातील मोर्बा गावात या महामारीने धुमाकूळ घातला आहे. या महामारीचा वाढता प्रादुर्भाव पाहून मोर्बा ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने आणखी पाच दिवस बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात …

Read More »

माणगाव सिद्धिनगर विकासकामांपासून दुर्लक्षित

भाजप महिला मोर्चा तालुकाध्यक्ष सत्वेंचा आक्षेप माणगाव : प्रतिनिधी माणगाव नगरपंचायत हद्दीतील सिद्धिनगरचा भाग विकास कामांपासून पूर्णपणे दुर्लक्षित असल्याचा आक्षेप या भागातील रहिवाशी तथा भाजप महिला मोर्चा माणगाव तालुकाध्यक्ष शर्मिला सत्वे यांनी घेऊन भागातील व्यथा प्रसार माध्यमांसमोर बोलून दाखविल्या. सत्वे यांनी सांगितले की, गेल्या पाच वर्षांत नगरपंचायतीतील सत्ताधार्‍यांनी या भागाकडे …

Read More »

खरीप हंगामात एक लाख 40 हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवडीचे नियोजन

अलिबाग : प्रतिनिधी यंदाच्या खरीप हंगामात रायगड जिल्ह्यात एक लाख 40 हजार 31 हेक्टर क्षेत्रावर भात लागवड करण्याचे, तसेच उत्पादकता हेक्टरी 2993  किलोग्रॅम करण्याचे नियोजन कृषि विभागाने केले आहे. रायगड जिल्ह्यात एक लाख 74 हजार 483 एवढे भात लागवडीचे क्षेत्र आहे. यंदा एक लाख चार हजार 31 हेक्टरवर भातलावणी करण्यात …

Read More »

कशेडी घाटातील भुयारी मार्ग : मोठा प्रोजेक्ट अपारदर्शकतेत!

बिरबल आणि अकबराच्या कथेतील लाडू या प्रसंगामध्ये अकबराचा मेव्हणा आणि बिरबलाला वेगवेगळया बंद खोलीत डांबून त्यांच्यासमोर रोज शंभर बुंदीचे लाडू ठेऊन ते भुकेवर कसे नियंत्रण ठेवतात, हे पाहण्याची पैज लागली होती. अकबराच्या मेव्हण्याला भुक अनावर झाल्याने त्याने काही लाडू फस्त केल्याचे रोज दिसून येत असे तर बिरबलाच्या खोलीतून शंभर लाडू …

Read More »

दौर्यांचे राजकारण

भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी क्षणाचाही वेळ वाया न दवडता कोकण दौर्‍याला सुरुवात केली. तौक्ते चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत असून राज्य सरकारने वादळग्रस्तांना तातडीने आर्थिक साह्य करावे, अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे. फडणवीस हे स्वत: उत्तम प्रशासक आहेत. आपत्ती …

Read More »

बांधकाम साहित्याची दुकाने सायंकाळपर्यंत खुली ठेवा

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर नगरसेविका दर्शना भोईर यांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तोक्ते चक्रीवादळामुळे पनवेल महापालिका हद्दीतील अनेक नागरिकांच्या घरांचे नुकसान झालेले आहे. त्यामुळे त्यांच्या घरांची कामे करण्याकरीता आवश्यक असलेली बांधकाम साहित्याची दुकाने सायंकाळी 5 वाजेपर्यंत खुली ठेवण्यात यावी, अशी मागणी भाजप नगरसेविका दर्शना भोईर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मनपा …

Read More »