Breaking News

Ramprahar Team

पनवेल परिसरामध्ये चोरीच्या घटनांमध्ये वाढ

पनवेल : वार्ताहर पनवेल परिसरातील खारघर, कळंबोली, कामोठे, जुने पनवेल, नवीन पनवेल, पनवेल रेल्वे स्थानक या परिसरात दिवसेंदिवस चोरीच्या घटना वाढत आहेत. खारघर वसाहतीत चोरीच्या घटना जास्त प्रमाणात घडत आहेत. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे व चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस स्टेशनमध्ये दररोज चोरीच्या घटनांची नोंद होत असते. यामध्ये खारघर …

Read More »

उरण नगर परिषदेतर्फे सायकल रॅली, वृक्षारोपण

उरण : वार्ताहर उरण नगरपरिषद कार्यालयासमोर नगराध्यक्षा सायली सविन म्हात्रे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. नगरपरिषदेच्या वतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्त साधून सायकल रॅली, नगरपालिकेचे विमला तलाव येथे वृक्षारोपण व विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उरण शहरात माझी वसुंधरा अभियान अंतर्गत शहरात स्वच्छते विषयी नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी या अनुषंगाने सायकल …

Read More »

‘शांतीवन’मध्ये महिला स्वच्छता दूतांचा सन्मान

पनवेल : प्रतिनिधी नवीन पनवेलमधील सेक्टर 15 मधील शांतीवन असोशिएशनने प्रजासत्ताकदिनी कोरोना काळात सेवा देणार्‍या महिला स्वच्छता दूताचा सन्मान साडीचोळी, श्रीफळ, रोख रक्कम व सन्मान पत्र देऊन केला. कोरोना काळात नवीन पनवेल येथील शांतीवन असोसिएशनच्या स्वच्छता कर्मचारी गंगुबाई पाईकराव यांनी दिलेल्या अखंड स्वच्छता सेवेमुळे येथील रहिवाशी भारावुन गेले होते. त्यांनी …

Read More »

पनवेल, उरणमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध उपक्रम

सावळे गावातील रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद पनवेल : रामप्रहर वृत्त प्रजासत्ताक दिनाचे औचित्त साधून पिल्लई एचओसी कॉलेज ऑफ इंजिनीरिंग अ‍ॅण्ड टेकनॉलॉजिच्या एनएसएस शाखेच्या वतीने सावळे गावामध्ये रक्तदान शिबिर आयोजित केले होते. या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या रक्तदान शिबिरास एनएसएस शाखा प्रमुख रेखा धवन, डॉ. अविनाश गाताडे, पवार, सावळे …

Read More »

‘सुदर्शन‘मध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात

धाटाव : प्रतिनिधी धाटाव एमआयडीसीतील सुदर्शन कंपनीमध्ये मंगळवारी (दि. 26) प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कंपनीचे इंजिनीरिंग विभागाचे व्हाईस प्रेसिडेंट विवेक गर्ग यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कंपनीच्या सुरक्षारक्षकांडून संचलन करण्यात आले. विवेक गर्ग यांनी सर्व कर्मचारी, कामगारांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. सुदर्शननगर या कंपनीच्या कर्मचारी वसाहतीमध्येही ध्वजारोहण समारंभ …

Read More »

प्रजासत्ताक दिन चिरायू होवो!

कर्जत : प्रतिनिधी प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्जत तालुक्यात मंगळवारी ध्वजारोहण करण्यात आले. मात्र या सोहळ्याच्या निमित्ताने दरवर्षी होत असलेले विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम या वेळी कोरोना संकटामुळे रद्द करण्यात आले होते.  तालुक्यातील सर्व प्राथमिक शाळा, विद्यालये, महाविद्यालये, शासकीय कार्यालयांमध्ये ध्वजारोहण करण्यात आले. कर्जत तालुका पंचायत समिती कार्यालयाच्या प्रांगणत  सभापती सुषमा ठाकरे यांनी …

Read More »

काजू प्रक्रिया उद्योगांचे पुनरूज्जीवन करणे आवश्यक

सात वर्षांपूर्वी सरकारने कोकणासह राज्याला तसेच देशाला परकीय चलन मोठया प्रमाणात उपलब्ध करून देणार्‍या आंबा आणि काजू या पिकांपासून विविध उत्पादन तयार करण्याच्या उद्योगांना संरक्षण देण्यासाठी दापोलीतील कृषी विद्यापिठामध्ये आंबा, काजू बोर्डाचे कार्यालय सुरू केले. मात्र, हे कार्यालय सुरू होण्यापूर्वीच रत्नागिरीमध्ये स्थलांतरित करण्यात आले. हा आंबा काजू बोर्ड सक्रीय होण्यापूर्वीच …

Read More »

खालापुरात गांजा विकणारे चौघे अटकेत

आरोपीमध्ये एक नायजेरियन खोपोली : प्रतिनिधी खालापूर तालुक्यात दोन ठिकाणी गांजाची विक्री करणार्‍या चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीत एका नायजेरियन इसमाचा समावेश असल्याने आंतराराष्ट्रीय टोळी सक्रिय असल्याचा संशय आहे. रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोहपाडा गावाच्या मच्छिमार्केटच्या गल्लीजवळ निखिल अरूण शिंदे (वय 24, रा. दहिवली, ता.कर्जत) हा अंमली पदार्थ विक्रीसाठी …

Read More »

दीपाली लोणकर यांना न्याय मिळवून देणार -चित्राताई वाघ

खोपोली : प्रतिनिधी      कोप्रान कंपनीमधील दीपाली लोणकर यांना कोणतीही पूर्वसूचना न देता कामावरून तडकाफडकी कमी केले आहे. न्याय मिळावा म्हणून त्यांनी खालापूर तहसील कार्यालयासमोर रविवारपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. या प्रकरणी पोलीस अधीक्षक व कामगार आयुक्तांची चर्चा केली असून, लवकर दीपालीला न्याय मिळवून देऊ, असे प्रतिपादन भाजप महिला मोर्चाच्या …

Read More »

अस्वस्थ प्रजासत्ताक दिन

शेतकर्‍यांच्या समस्या अग्रक्रमाने सोडवण्याबाबत खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आग्रही असतात. म्हणूनच शेतकरी नेत्यांसोबत केंद्रीय कृषी मंत्र्यांनी दहापेक्षा जास्त वेळा सकारात्मक चर्चा केली. ज्या तीन कृषी कायद्यांबद्दल शेतकर्‍यांमध्ये नाराजी आहे, ते कायदे दीड वर्ष स्थगित ठेवण्याचीही तयारी दर्शवली. शेतकरी नेत्यांनी खरे तर आंदोलन आटोपते घ्यावे. तेच त्यांच्या हिताचे आहे. शेतकर्‍यांचा उद्रेक …

Read More »