Breaking News

Ramprahar Team

नवी मुंबईत फोफावतोय मलेरिया, डेंग्यू

महापालिकेचे प्रतिबंधात्मक उपाययोजनांकडे लक्ष नवी मुंबई : रामप्रहर वृत्त गेल्या आठवड्याभरापासून पावसाने काही प्रमाणात उघडीप घेतली असून साचलेल्या पाण्यात डास अंडी घालत असल्याने हा काळ डास उत्पत्तीच्या दृष्टीने जोखमीचा आहे, हे लक्षात घेऊन डास उत्पत्ती स्थानांचा शोध घेणे व ती नष्ट करणे या मोहिमा अधिक काळजीपूर्वक राबविण्याचे निर्देश नवी मुंबई …

Read More »

विस्ताराची काळजी कोणाला?

भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीचे नवे सरकार सत्तेवर आल्यास 29 दिवस उलटले तरी मंत्रिमंडळ विस्तार होत नाही याची सर्वाधिक काळजी महाविकास आघाडीच्या नेत्यांना लागली आहे असे दिसते. परंतु हाताच्या बोटावर मोजण्याइतके मंत्री कारभार करत असल्याची उदाहरणे अन्य राज्यांमध्येही कमी नाहीत. मुद्दा मंत्रिमंडळाच्या आकाराचा नसतो तर सत्ताधार्‍यांच्या कार्यक्षमतेचा असतो. शिवसेनेत …

Read More »

पालीत भव्य हिंदू जनजागृती रॅली

तहसीलदारांना मागणीचे निवेदन पाली : प्रतिनिधी समस्त सुधागडमधील हिंदू बांधवांच्या वतीने  शुक्रवारी (दि. 29) पालीमध्ये हिंदू जनजागृती रॅली काढण्यात आली होती. या वेळी भारत माता की जय, वंदे मातरम, जय शिवाजी जय भवानी या घोषणांनी पाली शहर दणाणून निघाले. या रॅलीत सुधागडसह पेण, रोहा तालुक्यातील हिंदू बांधव, विशेषतः युवक मोठ्या …

Read More »

मुंबई-पुणे महामार्गावर मिनीबस घसरली

खालापूर : प्रतिनिधी मुंबई-पुणे जुन्या महामार्गावरील खालापूरजवळ हॉटेल रिंकीसमोर गोरेगाव मुंबई येथून लोणावळा येथे वर्षा सहलीसाठी जाणारी मिनीबस घसरून पलटी झाली. शुक्रवारी (दि. 29) संध्याकाळी झालेल्या या  अपघातात मिनीबसमधील बारा प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात  उपचार करण्यात आले. वर्षा सहलीसाठी पर्यटकांना घेऊन मिनीबस गोरेगाव मुंबई येथून …

Read More »

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत पतसंस्थांच्या वसुली अधिकार्यांचे आदर्शमध्ये प्रशिक्षण शिबिर

अलिबाग : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडेरेशन, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था-रायगड आणि आदर्श नागरी सहकारी पतसंस्था-अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने अलिबाग येथे बुधवारी (दि. 27 ) जिल्ह्यातील पतसंस्थांमधील वसुली अधिकार्‍यांचे  प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत अलिबागमधील  आदर्श भवनामघ्ये बुधवारी घेण्यात आलेल्या या  प्रशिक्षण शिबिरात रायगड जिल्ह्यातील …

Read More »

उल्हास नदीवरील दहिवली पुलाला भगदाड

कर्जत : बातमीदार तालुक्यातील उल्हास नदीवरील दहिवली-मालेगाव पुलावर गुरुवारी (दि. 28) रात्री मोठे भगदाड पडले असून, त्यामुळे पुलावरून मोठी गाडी जाण्यास अडथळे येत आहेत. या खड्ड्यात झाडाच्या फांद्या तोडून उभ्या केल्या आहेत. नेरळ-कळंब राज्यमार्गावरील दहिवली-मालेगाव येथे उल्हास नदीवर 1970च्या दशकात हा पूल बांधण्यात आला. कमी उंचीच्या आणि 150 मीटर लांब …

Read More »

आषाणे धबधबा ठरतोय गर्दीचे केंद्र

कर्जत : बातमीदार तालुक्यातील भिवपुरी रोड रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या आषाणे येथील धबधबा पर्यटकांचे आकर्षण बनला आहे. हा धबधबा पावसाळ्यातील चार महिन्यात लाखो पर्यटकांना आपल्याकडे खेचून घेण्यात यशस्वी ठरतो. त्याबरोबरच हा धबधबा अनेकांच्या उदरनिर्वाहाचे साधनही ठरला आहे. कर्जत-कल्याण रस्त्यावर आषाणे गावाच्यामागील बाजूस असलेल्या डोंगरावरून उडणारे पाण्याचे तुषार  झेलण्यासाठी पर्यटक वर्षा सहलीच्या …

Read More »

नेरळमध्ये 101वे नेत्रचिकित्सा शिबिर

लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट व कांदळगावकर दाम्पत्याचा उपक्रम कर्जत : बातमीदार पनवेल येथील लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट आणि नेरळ येथील नितीन कांदळगावकर, नम्रता कांदळगावकर यांच्या संयुक्त विद्यमाने नेरळ येथील जेनी टूलीप शाळेत नुकताच 101वे नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात 80रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली, त्यापैकी मोतीबिंदू दोष आढळल्याने …

Read More »

कारगिल युद्धातील जवानांनी खोपोलीत दिला रोमहर्षक आठवणींना उजाळा

खोपोली : प्रतिनिधी माजी सैनिक सेवा संघटना-खोपोली आणि सैनिक फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कारगील विजय दिनानिमित्त येथील माध्यमिक शाळेत आयोजित केलेल्या कार्यक्रमात भारतीय स्थलसेना, वायुसेना व नौसेना दलातील माजी सैनिकांनी भारत-पाक युद्धातील साहसी, थरार अनुभव व्यक्त केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी अमर जवान ज्योत प्रज्वलित करून शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. पूर्व वायुसेना …

Read More »

जि.प. आरक्षणात प्रस्थापितांना धक्का

अलिबाग : प्रतिनिधी आगामी निवडणुकांकरिता रायगड जिल्हा परिषदेच्या जागांसाठी गुरुवारी (दि. 28)आरक्षण सोडत काढण्यात आली. या सोडतीत अनेक दिग्गजांना धक्का बसला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी अनेकांनी पूर्वतयारी केली होती, परंतु आरक्षणामुळे त्यांच्या पदरी नाराजी पडली आहे. अनेकांचे मतदार संघ राखीव झाल्याने त्यांना पर्यायी मतदार संघ शोधावा लागणार आहे. जिल्हा परिषदेचे …

Read More »