Breaking News

Ramprahar Team

ईको गाडीचालकाचा प्रामाणिकपणा सोन्याचे ब्रेसलेट केले परत

उरण : वार्ताहर चिरनेर-गव्हाणफाटा या  मार्गावर प्रवासी वाहतूक करणार्‍या ईको गाडीचालकास आपल्या गाडीत सापडलेला सोन्याचा ब्रेसलेट दोन दिवसांनी प्रवाशाला परत दिल्याने बाळकृष्ण मोकल या प्रामाणिक ईको गाडीचालकाचे अभिनंदन होत आहे. चिरनेर गावातील बाळकृष्ण मोकल हा गरीब तरुण आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी चिरनेर-गव्हाणफाटा या मार्गावर  प्रवाशी वाहतूक करणारी ईको गाडी चालवत आहे. …

Read More »

वार्षिक स्नेहसंमेलन व क्रीडा महोत्सवाचे आयोजन

पनवेल : रामप्रहर वृत्त       गव्हाण येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज.आ.भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन कला व क्रीडा महोत्सव 2019-2020चे आयोजन करण्यात आले आहे. कर्मवीर विद्याप्रबोधिनी संचलित अनिवासी गुरुकुल प्रकल्पांतर्गत हा कार्यक्रम माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (दि. 24) सायंकाळी 4 वाजता आयोजित केला आहे. या …

Read More »

पनवेल फेस्टिव्हलची धूम!

पनवेल : रामप्रहर वृत्त सलग 24 व्या वर्षी सामाजिक सेवेत कार्यरत असणार्‍या रोटरी क्लब ऑफ पनवेलच्या वतीने पनवेल फेस्टिव्हलचे आयोजन 20 ते 29 डिसेंबरपर्यंत सायंकाळी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत खांदा वसाहत येथील मैदानात केले आहे. या फेस्टिव्हलमध्ये विविध प्रकारचे स्टॉल्स, खवय्यांसाठी व्हेज-नॉनव्हेज स्टॉल्स, मुलांसाठी खेळण्यासाठी साधने आणि दररोज स्थानिक …

Read More »

आंब्याच्या उत्पादनक्षमतेसाठी कीटकनाशक व्यवस्थापनाची गरज

कृषी विज्ञान शास्त्रज्ञ आरेकर यांचे प्रतिपादन पनवेल : रामप्रहर वृत्त आंब्याची उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी कीटकनाशक फवारणीचे व्यवस्थापन गरजेचे आहे. याकरिता बागायतदार शेतकर्‍यांनी या फवारणीचे नियोजन केल्यास जास्तीत जास्त उत्पादन क्षमता वाढून त्याचा लाभ शेतकर्‍यांना होणार असल्याचे मत कृषी विज्ञान शास्त्रज्ञ जीवन आरेकर यांनी व्यक्त केले. शुक्रवारी (दि. 20) पळस्पे येथे …

Read More »

‘त्या’ बांगलादेशीप्रकरणी नवा खुलासा

पत्नीच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर स्वतःचे नाव टाकल्याचे उघड पनवेल : बातमीदार बोगस नाव धारण करून पनवेल तालुक्यात राहणारा इनामुल मुल्ला हा बांगलादेशी बनावट कागदपत्रामुळे चर्चेत आला होता. त्याच्याकडे सापडलेल्या शाळा सोडल्याचा दाखला हा जिल्हा परिषदेच्या शाळतून घेतला नसल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. पत्नीच्या दाखल्याची झेरोक्स काढून त्याच्यावर स्वतःचे नाव …

Read More »

राष्ट्रीय गोमंतक गोवा पुरस्कारांचे आज वितरण

शैलेश पालकर यांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार पोलादपूर : प्रतिनिधी हुतात्मा अपंग बहुउद्देशीय विकास कल्याणकारी संस्थेचा तृतीय राष्ट्रीय गोमंतक गोवा पुरस्कार वितरण सोहळा रविवारी (दि. 22) मडगाव डवरली येथील श्री स्वामी समर्थ मंदिर सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. त्यात पोलादपूर येथील ज्येष्ठ पत्रकार शैलेश पालकर यांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार देऊन सन्मानित …

Read More »

जिल्हा परिषदेसमोर प्राथमिक शिक्षकांचे धरणे आंदोलन; जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी

अलिबाग : प्रतिनिधी जुनी पेन्शन योजना, मयत डीसीपीएस धारकांच्या कुटुंबांना 10 लाखांची मदत मिळावी आणि इतर विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद संघटनेच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षकांनी शनिवारी (दि. 21) जिल्हा परिषदेच्या अलिबाग येथील कार्यालयासमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन केले. या वेळी जुनी पेन्शन योजना लागू करा, अशा घोषणा शिक्षकांनी देऊन …

Read More »

कर्जत रेल्वेस्थानक परिसर अतिक्रमणाच्या विळख्यात

कर्जत : बातमीदार येथील रेल्वेस्थानकाच्या फलाट तीनच्या बाहेर असलेला पादचारी पूल आणि तिकीट खिडकी परिसरात फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे  लोकल गाडी पकडण्यास आलेल्या प्रवाशांना त्रास होत असून, या अतिक्रमण करणार्‍यांना वेळीच आवरा, अशी सूचना कर्जत पॅसेंजर असोसिएशनने पोलीस आणि सुरक्षा यंत्रणेला केली आहे. प्रवाशांच्या मागणीनंतर कर्जत रेल्वे स्थानकाच्या भिसेगाव  …

Read More »

बेकायदा वाणिज्य वापरावर दंडात्मक कारवाईची गरज

खोपोली : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील चौक हद्दीतील काही हॉटेल, गोडाऊन आणि शोरूम चालक बिनशेती न करता जागेचा वाणिज्य वापरासाठी बिनधोक वापर करीत असून, त्यामुळे खालापूर तहसीलला लाखो रूपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागत आहे. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966प्रमाणे कलम 44प्रमाणे जागेचा वापर वाणिज्य कारणासाठी करायचा असेल तर बिनशेती करणे आवश्यक …

Read More »

मुरूडमध्ये दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा; नागरिक त्रस्त

मुरूड : प्रतिनिधी शहरातील नागरिकांना गेल्या पाच दिवसांपासून दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारींत वाढ झाली असून, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. मुरूड शहराची लोकसंख्या 12 हजारांच्या आसपास असून या वाढत्या लोकसंख्येला नगर परिषदेतर्फे आंबोली धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो. गेल्या पाच दिवसांपासून या धरणातून दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा करण्यात येत असल्याने …

Read More »