Breaking News

Ramprahar Team

घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात मोठी कपात

मुंबई ः प्रतिनिधी आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसच्या दरात घट झाल्याने देशात घरगुती विनाअनुदानित गॅसच्या दरात 62.50 रुपयांनी कपात झाली आहे. वर्षाला 12 अनुदानित सिलिंडर्सचा कोटा संपल्यानंतर ग्राहकांना हा विनाअनुदानित गॅस घ्यावा लागतो, मात्र ज्या ग्राहकांचा हा कोटा शिल्लक आहे अशांनाही याचा फायदा मिळणार आहे. त्यामुळे या नव्या दरांमुळे 14.2 किलोच्या अनुदानित …

Read More »

रेशनकार्डधारकांना ’अच्छे दिन’

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था रेशनकार्डधारकांना मोदी सरकारने मोठा दिलासा दिला आहे. उत्तराखंडातील रेशनकार्ड लाभार्थ्यांना रस्त्यावर असलेल्या सरकारी दुकानातून रेशन घेता येणार आहे. याअंतर्गत राज्य सरकार राष्ट्रीय खाद्य सुरक्षा अ‍ॅक्ट (एनएफएसए)अंतर्गत रेशनकार्ड पोर्टेबिलिटी सुविधा देण्याच्या तयारीत आहे. या व्यवस्थेअंतर्गत उत्तराखंडमधील 23 लाख लाभार्थ्यांना कोणत्याही सरकारी दुकानातून धान्य घेता येणार आहे. त्यासाठी …

Read More »

दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना दिलासा

परीक्षा फी माफ; शिक्षणमंत्री आशिष शेलार यांची माहिती मुंबई ः प्रतिनिधी दुष्काळी भागातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची संपूर्ण परीक्षा फी माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यामध्ये प्रात्यक्षिक, गुणपत्रिका व प्रमाणपत्र शुल्कासह संपूर्ण फी माफ होणार आहे. ही फी ठढॠडमार्फत थेट विद्यार्थ्यांच्या किंवा पालकांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावी, असा …

Read More »

‘जगन्नाथ पाटील यांचे कार्य समाजासाठी मार्गदर्शक’

ठाणे ः प्रतिनिधी राज्याचे माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांचे कार्य समाजासाठी मार्गदर्शक आहे. दिलेले काम कुठल्याही परिस्थितीत करायचे हे त्यांचे तत्त्व आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (दि. 1) डोंबिवली येथे जगन्नाथ पाटील यांच्या अमृतमहोत्सवी सत्कार समारंभीप्रसंगी बोलताना केले. या कार्यक्रमास सार्वजनिक बांधकाममंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ …

Read More »

कुलभूषण प्रकरणाची पुनरावृत्ती?

नवी दिल्ली ः कुलभूषण जाधव प्रकरणानंतर पाकिस्तानने पुन्हा एकदा भारतावर खोटा आरोप करीत एका कथित भारतीय गुप्तहेराला ताब्यात घेतल्याचा दावा केला आहे. पाकच्या एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार या गुप्तहेराला पाकच्या पंजाब प्रांतातील डेरा गाजी खान जिल्ह्यातून पकडण्यात आले. लाहोरपासून 400 किमी अंतरावरील हे ठिकाण आहे. राजू लक्ष्मण असे या कथित …

Read More »

इको सेन्सेटिव्ह झोनच्या कायद्यात बदल करणार

पर्यावरणमंत्र्यांचे आश्वासन; साहसी खेळांनाही देणार प्रोत्साहन कर्जत ः बातमीदार सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने 2003मध्ये केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने माथेरान परिसर पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील जाहीर केला. त्यामुळे माथेरानवर आलेले निर्बंध दूर करण्यासाठी माथेरान नगरपालिका प्रयत्न करीत होती. त्यानंतर खासदार श्रीरंग बारणे यांनी या प्रश्नावर गेली तीन वर्षे सातत्याने आवाज उठविला. गुरुवारी (दि. 1) नवी …

Read More »

जलपुनर्भरण, विकेंद्रित जलव्यवस्थापन काळाची गरज

कोकणात दरवर्षी पडणार्‍या पावसाचा विचार केल्यास संपूर्ण राज्याला वर्षभर पाणीपुरवठा करता येईल एवढा पाऊस एकट्या कोकणात पडतो. रायगड जिल्ह्यात सरासरी 3142.64 मिमी पाऊस पडतो. पाणीपुरवठा योजना राबविल्या जातात. त्यावर करोडो रुपये खर्च केले जातात. तरीही जानेवारी महिन्यापासूनच गाव, वाड्या, वस्त्यांवर पाणी समस्या निर्माण होते. पाणीटंचाईग्रस्त गावांची संख्या कमी होण्याऐवजी दरवर्षी …

Read More »

दुराग्रहाचा अतिरेक

आपले आपण घरी शिजवून खाणे हा अधिक उत्तम पर्याय नव्हे का? किंवा किमानपक्षी थोडी पायपीट करून शुद्ध शाकाहारी हॉटेलापर्यंत तरी जावे. आपला आग्रह जगासमोर ‘अतिरेकी दुराग्रहा’च्या रूपात मांडण्याचा खटाटोप कशासाठी? केवढेसे ते क्षणभंगुर मानवी जीवन, विश्वाच्या या अवघ्या पसार्‍यात आपले अस्तित्व केवढे ठिपक्याएवढे असे सांगणारा आपली महान धर्मसंस्कृती. आपल्या आध्यात्मिक …

Read More »

मांसाहारावर ताव मारून गटारी साजरी

अलिबाग : प्रतिनिधी श्रावण मासाची पूर्वसंध्या म्हणजे दीप अमावस्या. तिचा अपभ्रंश गटारी अमावस्या म्हणून झाला. तिखटावर म्हणजेच मांसाहारावर ताव मारून बुधवारी (दि. 31) सर्वत्र गटारी साजरी झाली. अर्थात मानवी जिभेचे चोचले पुरविण्यासाठी शेकडो बकरे आणि कोंबड्यांचा बळी गेला. गुरुवारी दुपारपर्यंत अमावस्या असल्याने बुधवार हा हक्काचा मांसाहाराचा वार ठरला. त्यामुळे मटणाच्या …

Read More »

दंगलींपेक्षा रस्ते अपघातात अधिक मृत्यू ः गडकरी

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था गटांमधील हाणामारी, दंगल किंवा नक्षलवादी-दहशतवादी हल्ल्यांपेक्षा रस्ते अपघातात मृत्युमुखी पडणार्‍यांची संख्या अधिक आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी (दि. 31) राज्यसभेत दिली. मोटार वाहन कायदा दुरुस्ती विधेयाकवरील चर्चेदरम्यान ते बोलत होते. देशभरात रस्ते अपघातात मृत्युमुखी पडणार्‍यांची संख्या मोठी आहे. दरवर्षी सुमारे 1.5 लाख …

Read More »