Breaking News

Ramprahar Reporters

मंत्री आव्हाडांकडून नियम मोडून मंदिरात आरती

गुन्हा मात्र फक्त कार्यकर्त्यांवर नाशिक ः प्रतिनिधीराज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड हे रविवारी खासगी दौर्‍यानिमित्त नाशिकमध्ये आले होते. या वेळी त्यांनी आनंदवली येथील नवश्या गणपती मंदिरात हजेरी लावून आरती केली. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा भंग केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे यामध्ये मंत्री आव्हाड यांना वगळून मंदिरात …

Read More »

पाणी शिरून नुकसान झाल्याने डुंगी ग्रामस्थ आक्रमक

आंदोलन करण्याचा इशारा पनवेल ः रामप्रहर वृत्तमुसळधार पावसामुळे पनवेल तालुक्यातील डुंगी गावात पाणी शिरून ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या समस्येला सिडको प्रशासन जबाबदार असल्याने डुंगी ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी निधी चौधरी, तहसीलदार, सिडको आणि पोलीस अधिकारी यांच्यासोबत माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर तसेच इतर …

Read More »

लोकल सेवा सुरू करा

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची राज्य सरकारकडे मागणीअन्यथा भाजपच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा मुंबई ः प्रतिनिधीकोरोनाची दुसरी लाट ओसरत असून राज्यात सर्वच जिल्ह्यांतील व्यवहार हळूहळू पूर्वपदावर येत आहेत. दुकाने, खासगी कार्यालये तसेच इतर सुविधा खुल्या झाल्या असल्या तरी उपनगरीय लोकल सेवा मात्र सर्वसामान्य नागरिकांसाठी अद्याप बंद आहे, परंतु कोरोनाचे दोन …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांचा आज सेवाभावी वाढदिवस

मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा बुधवारी (दि. 22) वाढदिवस आहे. सलग दुसर्‍या दिवशी कोरोनामुळे राज्यातील लोक संकटांना तोंड देत आहेत. त्यामुळे फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त योगदान द्यायचे आहे त्यांनी सेवाकार्यात द्यावे, असे आवाहन भाजपतर्फे करण्यात आले आहे. फडणवीसांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला भाजपचे प्रदेश प्रवक्ते माधव …

Read More »

पटोलेंचा पुन्हा स्वबळाचा नारा

राहुल गांधींच्या भेटीनंतर प्रदेशाध्यक्षांची घोषणा नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाआगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्ष स्वबळावरच निवडणुका लढवेल, अशी घोषणा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. विशेष म्हणजे पटोले मंगळवारी(दि. 20) दिल्लीत होते आणि त्यांनी काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या भेटीनंतर ही घोषणा केली. राहुल गांधी यांच्यासोबत …

Read More »

आषाढी एकादशीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मराठीत शुभेच्छा

पंढरपुरात मुुख्यमंत्र्यांकडून महापुजा नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाआषाढी एकादशीनिमित्त मंगळवारी (दि. 20) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीत शुभेच्छा दिल्या. सर्वांना चांगले आरोग्य लाभू दे, अशी विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.वारी हा महाराष्ट्राचा महान ठेवा असून पंढरपूरला पायी जाण्याची परंपरा शतकानुशतके सुरू आहे, मात्र कोरोनामुळे यंदा राज्य शासनाने वारीवर निर्बंध …

Read More »

पेणच्या गणेशमूर्तिकारांना फटका

कार्यशाळांमध्ये पाणी शिरून लाखोंचे नुकसान पेण : प्रतिनिधीगेल्या तीन दिवसांपासून सातत्याने पडणार्‍या मुसळधार पावसामुळे सोमवारी पेण तालुक्यात पूर येऊन नदी व खाडी किनारी असणार्‍या गावांत पाणी घुसले. या पुराचा फटका पेण शहर व परिसरातील नदीकाठच्या गणेशमूर्ती कार्यशाळांना मोठ्या प्रमाणात बसून, तयार मूर्तींचे नुकसान झाले आहे.पेण शहरासह तालुक्यातील हमरापूर, जोहे, दादर, …

Read More »

पनवेल मनपाच्या महासभेत विविध विषयांना मंजुरी

पनवेल ः प्रतिनिधीपनवेल महापालिकेची सर्वसाधारण सभा मंगळवारी (दि. 20) आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली. या वेळी विविध विषयांना मंजुरी देण्यात आली. या सभेला आयुक्त गणेश देशमुख, उपमहापौर जगदिश गायकवाड आदी उपस्थित होते.कोविड-19 या संसर्गजन्य रोगाने बाधित रुग्णांवर उपचारासाठी पनवेल …

Read More »

पेगॅसस हे भारताला बदनाम करण्याचे षडयंत्र

देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा मुंबई ः प्रतिनिधीपेगॅसस या फोन हॅकिंग सॉफ्टवेअरच्या माध्यमातून जगभरातील हजारो लोकांवर पाळत ठेवली जात आहे, असा दावा काही मोठ्या मिडिया हाऊसेसने केला. यात भारतातील राजकीय नेते, पत्रकार आणि कार्यकर्त्यांचेही फोन टॅपिंग झाल्याचा दावा करण्यात आला. केंद्र सरकारने तत्काळ हा दावा फेटाळून लावला, पण विरोधकांनी यावरून संसदेत …

Read More »

टीम इंडियाची दणदणीत सलामी

श्रीलंकेवर सात गडी राखून विजय कोलंबो ः वृत्तसंस्थाकर्णधार शिखर धवन (95 चेंडूंत नाबाद 86 धावा), पदार्पणवीर इशान किशन (42 चेंडूंत 59) आणि सलामीवीर पृथ्वी शॉ (24 चेंडूंत 43) या त्रिकुटाने केलेल्या दमदार फलंदाजीच्या बळावर भारताने पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात श्रीलंकेला तब्बल सात गडी आणि 80 चेंडू राखून सहज पराभूत केले.श्रीलंकेने …

Read More »