Breaking News

Ramprahar Reporters

रामकी कंपनीच्या प्रकल्पामुळे प्रदूषण

आमदार प्रशांत ठाकूर यांनी नगरसेवकांसह केली पाहणी पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल महापालिका हद्दीतील सिद्धी करवले गावासह आजुबाजूच्या परिसरात रामकी कंपनीच्या इंडस्ट्रीयल हझार्ड्स वेस्टवर प्रक्रिया करणार्‍या प्रकल्पामुळे हवेचे आणि पाण्याचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे. या प्रदुषणामुळे परिसरातीन नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपचे उत्तर रायगड जिल्हा …

Read More »

नियोजनशून्य कारभारामुळे जनतेला त्रास : आठवले

मुंबई ः प्रतिनिधीमहाविकास आघाडी सरकारच्या नियोजनशून्य कारभारामुळे लसीकरणासाठी जनतेला नाहक त्रास भोगावा लागत आहे. राज्य सरकारच्या गलथानपणामुळे कोरोना लसीचे पाच लाख डोस वाया गेले आहेत. त्यास जबाबदार कोण, असा सवाल करीत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आघाडी सरकारवर टीका केली आहे.राज्य सरकारने केंद्र सरकारवर आरोप करून राजकारण करू नये. महाराष्ट्रात …

Read More »

केंद्र सरकारकडे बोट दाखवून स्वत:चे अपयश झाकण्याचा प्रयत्न : राणे

मुंबई ः प्रतिनिधीकेंद्राकडे बोट दाखवून आपले अपयश झाकायचे काम राज्य सरकार करीत आहे, अशी टीका खासदार नारायण राणे यांनी शुक्रवारी (दि. 9) पत्रकार परिषदेत केली. जेवढे दिवस आहेत तेवढे दिवस जनतेचे शोषण करण्याचा एककलमी कार्यक्रम या सरकारचा सुरू आहे. सर्व ठिकाणी भ्रष्टाचार सुरू आहे, असा आरोपही त्यांनी या वेळी केला.नारायण …

Read More »

राज्यात संपूर्ण लॉकडाऊनची तयारी?

मुख्यमंत्र्यांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक मुंबई ः प्रतिनिधीमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शनिवारी (दि. 10) दुपारी सर्वपक्षीय बैठक होणार आहे. या बैठकीत कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत चर्चा होणार आहे. त्याचप्रमाणे राज्यात पुढील आठवड्यात संपूर्ण लॉकडाऊन लावण्यासंदर्भात मुख्यमंत्री चाचपणी करण्याची शक्यता आहे.राज्यात संपूर्ण लॉकडाऊनची तयारी करण्याच्या हालचालींना वेग आला …

Read More »

शुक्रवारपासून आयपीएलचा रनसंग्राम

मुंबई-बंगळुरू संघांमध्ये सलामीची लढत चेन्नई ः वृत्तसंस्थाजगातील सर्वाधिक लोकप्रिय स्पर्धा आयपीएलच्या 14व्या हंगामाला शुक्रवार (दि. 9)पासून प्रारंभ होत आहे. स्पर्धेतील सलामीची लढत गतविजेते मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात रंगणार आहे. या स्पर्धेसाठी भारतासह जगभरातील क्रिकेट चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.  साखळी फेरीत प्रत्येक संघ चार मैदानावर सामने खेळतील. …

Read More »

…तर राज्य केंद्राच्याच ताब्यात द्या -चंद्रकांत पाटील

मुंबई ः प्रतिनिधीप्रत्येक गोष्टीसाठी केंद्र सरकारलाच जबाबदर धरले जाणार असेल तर मग राज्य हे केंद्राच्या ताब्यात देऊन टाकावे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.सचिन वाझे ‘वसुली’ सरकारच्या इतके जवळ होते की त्यांनी अधिवेशनात कित्येक तास त्यावर वाया घालवले. नऊ वेळेला विधानसभा स्थगित करावी …

Read More »

पनवेल महापालिका हद्दीत सुसज्ज जम्बो कोविड सेंटर उभारा

आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणीवजा सूचना पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका हद्दीत कोविड रुग्णांची दररोजची वाढती संख्या लक्षात घेता कोविड रुग्णांवर तातडीने उपचार होण्याच्या दृष्टीने सुसज्ज जम्बो कोविड सेंटर उभारण्याबाबत भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांना निवेदनाद्वारे मागणीवजा सूचना केली आहे.या …

Read More »

महाराष्ट्राच्या अब्रूची लक्तरे निघाली

वाझेंच्या लेटरबॉम्बवरून केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांचा राज्य सरकारवर निशाणा नवी दिल्ली ः वृत्तसंस्थानिलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या पत्रावरून केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. ही महाविकास आघाडी नसून महावसूली आघाडी आहे. यांचा किमान समान कार्यक्रम म्हणजे पोलिसांकरवी पैसा गोळा करा, लुटा हाच आहे. महाराष्ट्राच्या अब्रूची …

Read More »

केंद्रीय पथकाकडून महाराष्ट्रात कोरोना परिस्थितीचा आढावा

अमरावती : कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या आरोग्य पथकाने गुरुवारी (दि. 8) सुपर स्पेशालिटी रुग्णालयस्थित जिल्हा कोविड रुग्णालयाची पाहणी केली. दिल्लीच्या एम्स रुग्णालयाचे तज्ज्ञ डॉ. अमितेश गुप्ता व डॉ. संजय राय यांचा या पथकात समावेश होता. कोरोना साथीवर नियंत्रणासाठी सर्व नागरिकांकडून नियमांचे पालन होणे आवश्यक आहे. तसे न झाल्यास तिसर्‍या …

Read More »

टी-20 वर्ल्डकपबाबत आयसीसीचा बॅकअप प्लान

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतातील आयोजनावर प्रश्नचिन्ह दुबई ः वृत्तसंस्थाभारतात यंदाच्या वर्षाच्या शेवटाला आंतरराष्ट्रीय टी-20 वर्ल्डकप स्पर्धेचे आयोजन होणार आहे, पण देशात सातत्याने वाढत्या कोरोना रुग्णांच्या परिस्थितीमुळे स्पर्धेच्या भारतातील आयोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण होताना दिसत आहे. त्यात आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) वतीने करण्यात आलेले विधान भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) चिंता वाढवणारे …

Read More »