Breaking News

Ramprahar Reporters

‘मातोश्री’वर बसून मुख्यमंत्र्याना सर्वसामान्यांचा त्रास कसा कळणार?

चंद्रकांत पाटलांचा यांचा टोला पुणे ः प्रतिनिधीराज्य शासन सर्वसामान्यांना एक रुपयांचेही पॅकेज देणार नाही़, मात्र कोरोना नियंत्रणाच्या नावाखाली राज्य शासन जर लॉकडाऊन लागू करणार असेल, तर त्याला आमचा कडवा विरोध असेल, अशी भूमिका भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी मांडली आहे. तसेच ‘मातोश्री’वर बसून लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्यांना होणारा त्रास कसा कळणार, …

Read More »

भारताचे स्टार खेळाडू मुंबई इंडियन्स संघात दाखल

मुंबई ः प्रतिनिधीइंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारताने 2-1 असा विजय संपादन केल्यानंतर आता सर्वांना आयपीएलच्या 14व्या हंगामाचे वेध लागले आहेत. 9 एप्रिल ते 30 मेदरम्यान आयपीएलचे सामने रंगणार आहेत. त्यामुळे भारतीय संघातील सर्व खेळाडू आपापल्या फ्रेंचायझीकडे निघाले आहेत. सोमवारी कृणाल पांड्या, हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव हे खेळाडूही मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात …

Read More »

राष्ट्रीय पिंच्याक सिल्याट स्पर्धेत महाराष्ट्रातील खेळाडूंची सुवर्ण कामगिरी

पाली ः प्रतिनिधीइंडियन पिंच्याक सिल्याट फेडरेशनतर्फे इंडोर स्पोर्ट्स स्टेडियम, पोलो ग्राऊंड, श्रीनगर काश्मीर येथे पार पडलेल्या सीनियर राष्ट्रीय पिंच्याक सिल्याट स्पर्धेत महाराष्ट्रातील खेळाडूंनी रेगू इव्हेंटमध्ये चमकदार कामगिरी केली. पालीतील अनुज सरनाईक तसेच विशाल मोरे, ओमकार अभंग यांनी स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले.      तसेच स्टँडिंग (फाइट) या इव्हेंटमध्ये अंशुल कांबळे व …

Read More »

टीम इंडियाने उधळला विजयाचा रंग

तिसर्‍या वन डेत इंग्लंडचा धुव्वा; मालिकाही घातली खिशात पुणे ः प्रतिनिधी भारतीय संघाने रविवारी इंग्लंडविरुद्ध झालेल्या तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात दमदार विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघाने मालिका 2-1 अशी जिंकली आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडच्या संघापुढे 330 धावांचे आव्हान ठेवले होते, पण ठरावीक फरकाने इंग्लंडचे फलंदाज बाद होत गेले आणि …

Read More »

रश्मी शुक्लांच्या अहवालामुळे ठाकरे सरकारची तंतरली : भातखळकर

मुंबई ः प्रतिनिधीआयपीएस अधिकारी रश्मी शुक्लांच्या फोन टॅपिंगसंदर्भातील अहवालावरून सध्या सत्ताधारी व विरोधकांत जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकार व राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. रश्मी शुक्लांच्या अहवालामुळे ठाकरे सरकारची चांगलीच तंतरली आहे. खंडणीखोरीचे बिंग फुटले आहे. अहवालात काहीच नाही, असे सरकारचे म्हणणे …

Read More »

पंतप्रधान मोदींची जशोरेश्वरी मंदिरास भेट

इश्वरीपूर ः वृत्तसंस्था बांगलादेश दौर्‍यावर असणार्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (दि. 27) 51 शक्तिपीठांपैकी एक असणार्‍या इश्वरीपूर येथील प्राचीन जशोरेश्वरी काली मंदिराला भेट दिली. नियोजित दौर्‍यानुसार मोदी सकाळी 11 वाजेच्या सुमारास मंदिरात पोहचले. मोदींच्या हस्ते देवीची पूजा करण्यात आली. यानंतर माध्यमांशी बोलताना मोदींनी आपण देवीकडे संपूर्ण मानवजातीला कोरोनापासून मुक्ती द्यावी, …

Read More »

पनवेलमधील रेस्टॉरंट्स, बारसाठी नवे निर्बंध

पनवेल ः प्रतिनिधीकोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पनवेलमधील रेस्टॉरंट्स, कॅफे, कॅन्टीन, डायनिंग हॉल, बारवर नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार शुक्रवार, शनिवार, रविवार व शासकीय सुटीच्या दिवशी येथे सायंकाळी 7 वाजल्यानंतर केवळ पार्सल सेवा सुरू राहणार आहे. याबाबतचे निर्देश मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांनी शुक्रवारी (दि. 26) दिले आहेत.महापालिका हद्दीत …

Read More »

रासायनिक कंपनीतील तीन कामगारांचा मृत्यू

अंबरनाथ ः प्रतिनिधीरासायनिक कंपनीच्या भूमिगत टाकीत सफाईसाठी उतरलेल्या तीन कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि. 27) सकाळी अंबरनाथ पश्चिमेला असलेल्या इंडस्ट्रीयल ईस्टर केमिकल कंपनीमध्ये घडली. या दुर्दैवी घटनेमुळे अंबरनाथ परिसर पुरता हादरून गेला होता. टाकीत असणार्‍या गॅसमुळे कामगारांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अंबरनाथ पश्चिमेच्या आयटीआयजवळील कंपनीत ही भीषण घटना …

Read More »

भाजप खारघर मंडल शक्ती केंद्रप्रमुखांच्या बैठकीत ठाकरे सरकारवर हल्लाबोल

पनवेल ः रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष खारघर मंडलच्या शक्ती केंद्रप्रमुखांची बैठक शुक्रवारी (दि. 26) भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकात पाटील आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. या वेळी प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भ्रष्ट कारभारावरून ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. या वेळी त्यांनी शक्ती केंद्रप्रमुखांना मार्गदर्शनही केले.भारतीय जनता …

Read More »

अखेर ठाकरे सरकारला सुबुद्धी सुचली

देवेंद्र फडणवीसांचा टोला मुंबई ः प्रतिनिधीराज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. संसर्ग रोखण्यासाठी राज्यभरात रविवारपासून रात्रीची जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्याचबरोबर कोरोना चाचण्यांची संख्याही वाढवण्यात येत आहे. राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष भाजप कोरोना नियंत्रणासाठी चाचण्यांच्या संख्येवर भर देण्यावर आधीपासूनच आग्रही होता, मात्र वारंवार सांगूनही न ऐकणार्‍या महाविकास आघाडी …

Read More »