Breaking News

Ramprahar Reporters

भाजपचे अविनाश कोळी यांना मातृशोक

पनवेल : रामप्रहर वृत्तभाजपचे रायगड जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी यांच्या मातोश्री शालिनी महादेव कोळी यांचे सोमवारी (दि. 8) अल्पशा आजाराने निधन झाले. त्या 73 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती महादेव कोळी, तीन विवाहित मुले सुभाष, अविनाश, नंदू, विवाहित मुलगी सुषमा, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. शालिनी कोळी …

Read More »

चक्रीवादळामुळे रायगडातील तब्बल 1905 गावे बाधित

अलिबाग : प्रतिनिधीनिसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यातील 1905 गावे बाधित झाली असून, एक लाख 75 हजार घरांचे नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. 41 जनावरेही बळी पडली. त्याचप्रमाणे विजेचे हजारो खांब कोलमडून पडले. पाणीपुरवठा योजना बंद पडल्या आहेत. या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न रायगडकर करीत आहेत.निसर्ग चक्रीवादळाचा …

Read More »

पंतप्रधान मोदी जे बोलतात ते करून दाखवतात : अमित शाह

नवी दिल्ली : वृत्तसंस्थास्थलांतरित मजूर हे आपल्या देशाचा पाया आहेत. प्रवासी मजुरांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बरेच काम केले आहे हे प्रवासी मजुरांचा अपमान करतात त्यांना माहीत नाही. पंतप्रधान मोदी जे बोलतात ते करून दाखवतात याची विरोधकांना कल्पना नाही, असे मत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केले. शाह यांनी …

Read More »

राज्यात कोरोनाचे रॅकेट

पॉझिटिव्ह रुग्णाला निगेटिव्ह ठरविण्यासाठी दलाल सक्रिय विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांचा गौप्यस्फोट औरंगाबाद : प्रतिनिधीकोरोनाच्या पॉझिटिव्ह रुग्णाला निगेटिव्ह करून देणारी दलालांचे रॅकेट राज्यात सक्रिय आहेत. भिवंडीत काही सामाजिक कार्यकर्त्यांनी हा महाभयंकर प्रकार नुकताच उघडकीस आणला आहे, असा धक्कादायक गौप्यस्फोट विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. राज्य सरकारने याची …

Read More »

हाच का तुमचा माणुसकी धर्म?

भाजपकडून शिवसेनेच्या संजय राऊतांवर पलटवार मुंबई : प्रतिनिधीराज्यात कोरोना संकटकाळात स्थलांतरित मजुरांसाठी अभिनेता सोनू सूद करीत असलेल्या कामावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी शंका उपस्थित केली. काही राजकीय मंडळी सोनू सूदचा मुखवटा वापरून ठाकरे सरकार अपयशी ठरल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप राऊत यांनी केला आहे. राऊत यांच्या या …

Read More »

नुकसानग्रस्त वारदोली, बेलवली परिसराची आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून पाहणी

ग्रामस्थांशी साधला संवाद; शासकीय मदत मिळवून देण्याची ग्वाही पनवेल ः प्रतिनिधी  निसर्ग चक्रीवादळाने जिल्ह्यात मोठी हानी झाली. याचा मोठा फटका पनवेललाही बसला. या पार्श्वभूमीवर भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष कार्यक्षम आमदार प्रशांत ठाकूर यांनी शनिवारी (दि. 6) वारदोली, बेलवली परिसरातील वाड्या-वस्त्यांना भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांना दिलासा दिला. या वेळी …

Read More »

जागरूक आमदार प्रशांत ठाकूर यांच्या जनहित याचिकेला नागरिकांचा पाठिंबा

पनवेल : रामप्रहर वृत्तकोरोना वैश्विक महामारीच्या अनुषंगाने पनवेल व आजूबाजूच्या परिसरातून मुंबई, नवी मुंबई येथे अत्यावश्यक सेवेसाठी जाणार्‍या कर्मचार्‍यांची अर्थात कोरोना योद्ध्यांची कामाच्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात राहण्याची व्यवस्था करण्यात यावी, यासाठी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेला पनवेल परिसरातील अनेक नागरिकांनी आपला …

Read More »

रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात

महाड ः प्रतिनिधीरायगड किल्ल्यावर शनिवारी (दि. 6) 347वा शिवराज्याभिषेक सोहळा मंत्रोच्चार आणि शंखानादाच्या गजरात दिमाखात साजरा करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात आल्याने या ठिकाणी मोजक्याच लोकांची उपस्थिती होती, मात्र असले तरी हा सोहळा अत्यंत थाटात पार पडला.अखिल भारतीय शिवराज्याभिषेक उत्सव समिती दुर्गराज रायगड यांच्या वतीने या …

Read More »

वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी आमदार महेश बालदी यांचा पाठपुरावा

मोहोपाडा ः प्रतिनिधीनिसर्ग चक्रीवादळाने खालापूर, चौक, मोहोपाडा, रसायनी येथील बर्‍याच ठिकाणी विद्युत खांबांवर झाडे पडून वीजपुरवठा खंडित झाला. या वेळी आमदार महेश बालदी यांनी त्वरित मोहोपाडा येथील जनसंपर्क कार्यालयात एमएसईडीसीएल(मोहपाडा)चे कार्यकारी अभियंता मनोज जगताप, सहाय्यक अभियंता किशोर पाटील यांच्या समवेत शनिवारी तातडीची बैठक घेऊन परिसरात खंडित झालेला वीजपुरवठा लवकर पूर्ववत …

Read More »

रायगडसाठी 100 कोटींची मदत तोकडी ः देवेंद्र फडणवीस

मुंबई ः प्रतिनिधीनिसर्ग चक्रीवादळात प्रचंड नुकसान झालेल्या रायगड जिल्ह्यासाठी 100 कोटी रुपयांची मदत तोकडी ठरेल, असे मत माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी (दि. 6) व्यक्त केले आहे. निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसलेल्या नागरिकांना राज्य सरकारने मोठी मदत करावी. तातडीने रोख रक्कम नागरिकांना मिळाली पाहिजे, अशी मागणीही विरोधी …

Read More »