पहिल्या वन डेत न्यूझीलंडची विजयी सलामी हॅमिल्टन : वृत्तसंस्थाएकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने उभारलेला 347 धावांचा डोंगर न्यूझीलंडच्या संघाने सहा गड्यांच्या मोबदल्यात सर केला. रॉस टेलरची झुंजार शतकी खेळी आणि हेन्री निकोल्स, टॉम लॅथम यांच्या अर्धशतकांच्या बळावर न्यूझीलंडने चार गडी व 1.5 षटके राखून हा सामना जिंकला. नाणेफेक जिंकून प्रथम …
Read More »रामशेठ ठाकूर महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा गुणगौरव
खारघर : रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचा पारितोषिक वितरण सोहळा सोमवारी (दि. 3) उत्साहात झाला. संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यात गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.या सोहळ्याला संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, …
Read More »राज्याच्या गुंतवणुकीस धोका
मुख्यमंत्र्यांच्या हतबलतेवर भाजपची टीका मुंबई : प्रतिनिधीराज्याची आर्थिक परिस्थिती हे मोठे आव्हान असून पैशाचे सोंग करता येत नाही, अशी हतबलता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारच्या मुलाखतीत व्यक्त केल्यामुळे राज्याच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे. याचा विपरित परिणाम राज्यात नवी गुंतवणूक येण्यावर आणि रोजगार निर्मितीवर होणार आहे, अशी टीका भाजपचे प्रदेश …
Read More »कशेडी घाटात पुन्हा केमिकल सोडले पोलादपूर पोलिसांकडून दोघांना अटक
पोलादपूर : प्रतिनिधी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत टँकरमधील केमिकल सोडण्याची तिसरी घटना सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली, मात्र या वेळी गस्त घालणार्या पोलादपूर पोलिसांनी टँकरमधील दोघांना घटनास्थळी पकडले. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांचा आधीच्या दोन घटनांशी संबंध आहे का याची चौकशी पोलादपूर पोलीस करीत आहेत.महामार्गावरील पार्ले आणि पार्लेवाडी गावानजीक 28 …
Read More »नवी मुंबई विमानतळबाधित प्रकल्पग्रस्तांची निदर्शने
वाघिवली ग्रामस्थांचा मुख्यमंत्र्यांविरोधात संताप पनवेल : वार्ताहरमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आश्वासन देऊनही मागण्यांची पूर्तता न झाल्याने पनवेलजवळील वाघिवली ग्रामस्थांनी मंगळवारी (दि. 4) रस्त्यावर उतरून निदर्शने केली. या वेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांची धरपकड केल्याने प्रकल्पग्रस्तांनी राज्य सरकारविरोधात संताप व्यक्त केला. वाघिवली गावातील मच्छिमारांना योग्य पॅकेज द्यावे, तसेच घरांच्या मोबदल्यात तीनपट जागा देण्याची …
Read More »तिथीचा हट्ट सोडा, 19 फेब्रुवारी शिवजयंतीची तारीख घोषित करा!
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना राष्ट्रवादीचे साकडे मुंबई : प्रतिनिधीतिथीचा हट्ट सोडून 19 फेब्रुवारी शिवजयंतीची तारीख जाहीर केली जावी, असे आवाहन राज्यातील सत्तेत भागीदार असणार्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना करण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे सरचिटणीस अमोल मिटकरी यांनी याबाबत ट्विट केले आहे. यामुळे महाविकास आघाडीत पेच निर्माण होण्याची …
Read More »‘सीएए’विरोधातील आंदोलनांमागे कारस्थान
पंतप्रधानांची आप, काँग्रेसवर सडकून टीका नवी दिल्ली : वृत्तसंस्था‘सीएए’विरोधात सीलमपूर, जामिया, शाहीन बागमध्ये आंदोलने सुरू आहेत. ही आंदोलने योगायोग नाही, तर तो एक प्रयोग आहे. यामागे राजकारणाचे असे डिझाईन आहे, जे राष्ट्राच्या सौहार्दाला बाधा आणत आहे. कायद्याला केवळ विरोध असता तर सरकारच्या आश्वासनानंतर तो संपला असता, पण आप आणि काँग्रेसची …
Read More »झोपेचे सोंग घेतलेल्यांना जागे करता येत नाही
मुंबई ः प्रतिनिधीझोपलेल्याला जागे करता येते, मात्र झोपेचे सोंग घेतलेल्यांना जागे करता येत नाही, असे म्हणत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. सीएएच्या मुद्द्यावरुन जी भूमिका शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने घेतली, त्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीला खडे बोल …
Read More »पोलादपूर-खेडदरम्यान महाकाय भुयारी मार्ग
पोलादपूर ः प्रतिनिधीसार्वजनिक बांधकाम विभागाच्या राष्ट्रीय महामार्ग विभागाने मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66वरील कशेडी घाटाला पर्याय म्हणून पोलादपूरमधील भोगाव ते खेड तालुक्यातील खवटीपर्यंत भुयारी मार्ग खोदण्याचे काम सुरू केले आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील हा सर्वांत मोठ्या लांबीचा भुयारी मार्ग असणार आहे.मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटाला पर्यायी मार्ग म्हणून पोलादपूरमधील भोगाव …
Read More »रायगडात पर्यटनवृद्धीसाठी अधिक सेवासुविधांची गरज
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे प्रतिपादन अलिबाग ः जिमाका रायगड जिल्ह्यात पर्यटनवृद्धीच्या अनेक संधी आहेत, मात्र पर्यटनवाढीसाठी अधिक सेवासुविधा निर्माण करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. रायगड जिल्ह्याच्या नियोजन भवन येथे सोमवारी (दि. 3) राज्य व केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनांचा आढावा राज्यपालांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते.या बैठकीस …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper