जनसुनावणीत शेतकरी आक्रमक अलिबाग : प्रतिनिधी अलिबाग तालुक्यातील शहाबाज-शहापूर येथे येऊ घातलेल्या अदानी प्रकल्पाची जनसुनावणी सोमवारी (दि. 18) प्रचंड गदारोळामध्ये पार पडली. या सुनावणीत शेतकरी आक्रमक झाले होते. शेतकर्यांनी या सुनावणीमध्ये अदानी प्रकल्पाला आपला तीव्र विरोध दर्शविला. अदानी प्रकल्पाची जनसुनावणी ही पांडवादेवी येथील जयमंगल सभागृहात घेण्यात आली. जनसुनावणीसाठी अध्यक्ष म्हणून …
Read More »Monthly Archives: April 2022
अलिबागच्या पांढर्या कांद्याची निर्यात नाही
अलिबाग : प्रतिनिधी भौगोलिक मानांकन प्राप्त झाल्यामुळे अलिबागच्या पांढर्या कांद्याच्या निर्यातीसाठी प्रयत्न सुरु झाले होते. मात्र यावर्षी उत्पादन कमी असल्याने अलिबागच्या पांढर्या कांद्याची निर्यात होऊ शकली नाही. रायगड जिल्ह्यात खरीप हंगामात भात पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड होत असते मात्र रब्बी हंगामात सिंचन क्षेत्र वगळता फारशी पिकं घेतली जात नाहीत. रायगड …
Read More »कोमसाप तळा शाखेचा वर्धापनदिन उत्साहात
माणगाव : प्रतिनिधी कोकण मराठी साहित्य परिषद (कोमसाप)तळा शाखेचा सातवा वर्धापनदिन सोमवारी (दि. 18) इंदापूर येथील एस. एस. निकम इंग्लिश स्कूलमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी मान्यवर कविंनी आपल्या कविता सादर केल्या.. कोमसापचे तळा शाखा अध्यक्ष हेमंत बारटक्के यांनी प्रास्ताविकात मागील सात वर्षात राबविलेल्या उपक्रमांचा आढावा घेतला. आणि कवी …
Read More »खालापूर शहरातील मुख्य रस्त्याची दुरावस्था
खोपोली : प्रतिनिधी शहरातील मुख्य रस्त्याच्या झालेल्या दुरावस्थेमुळे पायी चालणेदेखील अवघड बनले असून, या प्रश्नावर सर्व राजकीय पक्ष मूग गिळून असल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी सुस्त झाले आहेत. खालापूर शहरातून जाणारा मुख्य रस्ता जुना मुंबई-पुणे महामार्ग आणि वणवे-निंबोडे मार्गे सावरोली-खारपाडा राज्यमार्गाला जोडला गेला आहे. खालापूर शिरवलीवाडी ते वणवे गाव या …
Read More »कालव्याला पाणी सोडा, अन्यथा आंदोलन अमित घाग यांचा इशारा
रोहा पाटबंधारे विभागाच्या कारभाराविरोधात भाजप आक्रमक धाटाव : प्रतिनिधी कोलाड ते भुवनेश्वर आणि कोलाड ते पडम या डाव्या, उजव्या कालव्यांना त्वरीत पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने रोहा पाटबंधारे विभागाकडे सोमवारी (दि. 18) निवेदनाद्वारे करण्यात आली. शेती आणि पिण्यासाठी या दोन्ही कालव्यांना तातडीने पाणी सोडले नाही तर …
Read More »पुस्तक प्रकाशन, ग्रंथव्यवहार आणि तंत्रज्ञान
एक काळ होता की जेव्हा लेखकाचं पुस्तक छापलं जाणं हा परदेशगमनाच्या योगापेक्षाही अवघड योग होता. कितीही उत्तम लिखाण असो लेखकाला ’नाव’ नसेल तर प्रकाशक त्याला उभा करीत नसत. पुस्तक प्रकाशित करणे आणि वाचकांपर्यंत पोहचवणे ही त्या काळी प्रकाशकाची शंभर टक्के मक्तेदारी होती. एखादा नवोदित लेखक हस्तलिखित दाखवायला आला की प्रकाशक …
Read More »डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त रसायनीत मिरवणूक
मोहोपाडा ः प्रतिनिधी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती रसायनी परिसरात ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष आशिष जाधव यांनी रविवारी (दि. 16) मिरवणुकीचे आयोजन केले होते. या मिरवणुकीत विविध सामाजिक संघटनांसह मोठ्या संख्येने भीमसैनिक सहभागी झाले होते. सेबी रोड येथून मिरवणुकीची सुरुवात झाली. डॉ. बाबासाहेब …
Read More »एक्सेप्शनल अचिव्हमेंट अॅवॉर्डने तिघांचा सन्मान
मोहोपाडा ः प्रतिनिधी संगीत, आरोग्य आणि अध्यात्म अशा त्रिवेणी संगमात काम करणारे डॉ. संतोष बोराडे, प्रितिश चौधरी व नरेंद्र भोईर या तिघांना एक्सेप्शनल अचिव्हमेंट अॅवॉर्ड 2022ने सन्मानित करण्यात आले. रत्नधाव फाउंडेशन आयोजित दुबई येथील इंटरनेट सिटी येथे हा पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. रत्नधाव फाउंडेशन, महालँड ग्रुप्स आणि सफिर कॉर्पोरेट …
Read More »न्हावा गावदेवीची भव्य यात्रा मोठ्या जल्लोषात
उरण ः रामप्रहर वृत्त महाराष्ट्राला तिर्थक्षेत्रांची विशेष परंपरा लाभलेली आहे. या परंपरेनुसार विविध ठिकाणी जागृत देवस्थाने आहेत. त्यापैकी जेएनपीटी बंदर व घारापुरी (एलिफंटा लेणी) यांच्यामधील न्हावा नावाचे गाव आहे. न्हावा गावामधील मंदिर महाराष्ट्रात सुप्रसिद्ध आहे. या गावातील गावदेवीची यात्रा 17 व 18 एप्रिलदरम्यान मोठ्या उत्साहात पार पडली. कोरोनानंतर प्रथमच धूमधडाक्यात …
Read More »उकाडा वाढल्याने वीजवापरही वाढला
पनवेल ः रामप्रहर वृत्त महावितरणच्या पनवेल विभागात वाढत्या तापमानामुळे विजेच्या मागणीत तब्बल 48 लाख युनिटची वाढ झाली आहे. फेब्रुवारीनंतर गारवा संपताच, वाढलेल्या उकाड्यामुळे हा वीज वापर वाढल्याचा अंदाज आहे. पनवेल विभागात उरण, पनवेल शहर, खारघर, कळंबोली आणि भिंगारी उपविभागात एकूण चार लाख 50 हजार वीजग्राहक आहेत. सुमारे 900 कारखाने असलेली …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper