Breaking News

Monthly Archives: September 2022

रायगडात 77 हजार 246 गोवंश पशुधनाचे लसीकरण

अलिबाग ः प्रतिनिधी लम्पी स्किन या पशुधनाच्या विषाणूजन्य संसर्गिय आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी रायगड जिल्ह्यात विविध उपाययोजना राबविण्यात येत असून, प्रतिबंधक लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत 77 हजार 246 गोवंश पशूधनाचे लसीकरण करण्यात आले असल्याची माहिती, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर विद्यालयामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

कामोठे ः रामप्रहर वृत्त शिक्षण क्षेत्राला नवी दिशा देणारे शिक्षण महर्षी पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची 135व्या जयंत्तीनिमित्त संस्थेच्या सर्व शाळा व महाविद्यालयांमध्ये कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्याअंतर्गत कामोठे येथील रयत शिक्षण संस्थेच्या लोकनेते रामशेठ ठाकूर विद्यालयामध्ये कर्मवीर डॉ. भाऊराव पाटील यांच्या जयंत्तीचा कार्यक्रम मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य माजी …

Read More »

नवरात्रीचा प्रसाद

अस्तित्वाची लढाई लढणार्‍या उद्धव ठाकरे गटाला सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी न्यायाचा झणझणीत डोस पाजला. शिवसेना नेमकी कोणाची, आमदारांच्या अपात्रतेचा प्रश्न, निवडणूक चिन्ह कोणाकडे जाणार असे काही प्रश्न उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयाच्या दारात नेले. वास्तविक यातील बरेचसे निर्णय निवडणूक आयोगाच्या अखत्यारीत येतात हे माहीत असूनही निवडणूक आयोगाच्या संबंधित कार्यवाहीला स्थगिती देण्याची …

Read More »

खालापूर बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी अ‍ॅड. सिद्धेश जितेकर

खोपोली : प्रतिनिधी खालापूर बार असोसिएशनच्या मंगळवारी (दि. 27) झालेल्या सर्वसाधारण सभेत अ‍ॅड. सिद्धेश जितेकर यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी अ‍ॅड.सागर चौगुले व सचिवपदी अ‍ॅड. अनघा कानिटकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.या सर्वसाधारण सभेला खालापूर बार असोसिएशनचे सर्व सदस्य उपस्थित होते. त्यांनी नवनिर्वाचीत पदाधिकार्‍यांचे अभिनंदन केले. आपल्या अध्यक्षपदाच्या …

Read More »

उतेखोल शाळेचे विद्यार्थी रमले वाचन जागरात

माणगाव : प्रतिनिधी नवरात्र उत्सवात सर्वत्र नृत्य, गाणी व विविध पारंपरिक संस्कृतीचा जागर होत असताना उतेखोल (ता. माणगात) गावातील प्राथमिक शाळेचे विद्यार्थी माणगावातील ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालयात वाचन उपक्रमात रमले आहेत. ज्ञानरचनावादी शिक्षण देणार्‍या या शाळेत विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत विकसित होण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात.  विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी, विविध पुस्तकांची ओळख …

Read More »

कर्जत एसटी आगार आपल्या दारी!; शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना दिले मासिक पास

कर्जत : प्रतिनिधी दोन वर्षांनंतर सुरू झालेल्या नेरळ-कळंब एसटी बसमुळे त्या परिसरातील विद्यार्थ्यांची चांगली सोय झाली आहे. बारावीपर्यंत शिकणार्‍या विद्यार्थिनींना अहिल्याबाई होळकर योजनेतून एसटी तर्फे मोफत पास दिले जातात. तसेच विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात पास दिले जातात. हे पास कर्जत आगारात येऊन काढणे खर्चिक व वेळेचा अपव्यय होणारे असल्याने आगार व्यवस्थापकांनी …

Read More »

पाली तर्फे कोतवाल खलाटी ग्रामपंचायत बिनविरोध

कर्जत : बातमीदार थेट सरपंचपदासाठी एक आणि सदस्य पदाच्या सात जागांसाठी सात उमेदवारी अर्ज दाखल  झाल्याने कर्जत तालुक्यातील पाली तर्फे कोतवाल खलाटी ही  ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे. जानेवारी 2020मध्ये पाली तर्फे कोतवाल खलाटी ही ग्रामपंचायत अस्तित्वात आली. या ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक 13 ऑक्टोबर रोजी होत आहे. मात्र स्वतंत्रसैनिक वि. रा. …

Read More »

लेखी आश्वासन द्या; अन्यथा जनआंदोलन करण्याचा कोलाड पाटबंधारे विभागाला ग्रामस्थांचा इशारा

धाटाव : प्रतिनिधी आंबेवाडी किल्ला ते निवी विभाग कालव्याला डिसेंबर महिन्यात पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन द्यावे, अन्यथा जनआंदोलन करण्याचा इशारा रोहा तालुक्यातील वाशी, लांढर, बोरघर, तळाघर, निवी हद्दीतील ग्रामस्थांनी रोह्याचे तहसीलदार व कोलाड पाटबंधारे विभागाला बुधवारी (दि. 28) निवेदनाद्वारे दिला. देखभाल, दुरुस्तीच्या नावाखाली कोलाड पाटबंधारे विभागाच्या आंबेवाडी किल्ला ते निवी …

Read More »

माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानांतर्गत लोहोपमध्ये शिबिर

खालापूर : प्रतिनिधी माता सुरक्षित तर घर सुरक्षित या अभियानांतर्गत सोमवारी (दि. 26) खालापूर तालुक्यातील लोहोप प्राथमिक आरोग्य केंद्रात महिला आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात 27 किशोरवयीन मुली, 49 गरोदर माता  तसेच 22 स्तनदा माता यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. खालापूर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रसाद रोकडे, वैद्यकीय …

Read More »

खोपोलीत करिअर मार्गदर्शन शिबिर

खोपोली : प्रतिनिधी रणगाडे, अग्नीबाण, पाच हजार किमीपर्यंत मारा करणारी मिसाईल तसेच अत्याधुनिक आयुधे भारताने बनवली आहेत व बाहेरील देश त्यांची आपल्याकडे मागणी करीत आहेत, त्यामुळे आत्मनिर्भर भारत हे स्वप्न पूर्ण झाले आहे, असे प्रतिपादन शास्त्रज्ञ काशिनाथ देवधर यांनी खोपोलीत केले.रोटरी क्लब आणि विज्ञान भारती या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने खोपोली …

Read More »