Breaking News

देश-विदेश

These are all news about national-international

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार क्रीडा सवलत गुण

नागपूर ः प्रतिनिधी कोरोनामुळे उद्भवलेल्या असामान्य परिस्थितीमुळे 2020-21 या शैक्षणिक वर्षात दहावी आणि बारावीची परीक्षा देणार्‍या खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडा सवलत गुण देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यासाठी दहावीच्या विद्यार्थ्यांची इयत्ता आठवी व नववीतील, तर बारावीच्या विद्यार्थ्यांची अकरावीत असताना क्रीडा स्पर्धेतील सहभागाविषयीची कामगिरी लक्षात घेतली जाणार आहे. शालेय शिक्षण व …

Read More »

स्थानिक स्वराज्य संस्थेतील अतिरिक्त ओबीसी आरक्षण रद्दच राज्य सरकारला ‘सर्वोच्च’ झटका

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था ग्रामपंचायत, जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थेतील अतिरिक्त ओबीसी आरक्षण रद्द करण्याचा उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत राज्य सरकारने दाखल केलेली फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. त्यामुळे मराठा आरक्षणावरून आधीच अडचणीत आलेल्या ‘मविआ’ला दुसरा झटका बसला आहे. याआधी जि. प. कायद्यातील कलम 12 सर्वोच्च न्यायालयाने रद्द …

Read More »

देशात 30 जूनपर्यंत निर्बंध कायम

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था देशातील कोरोनाची दुसरी लाट ओसरण्यास सुरुवात झाली आहे. तरीही रुग्णसंख्या मोठी आहे. त्यामुळे देशात सध्या सुरू असलेले निर्बंध 30 जूनपर्यंत कायम राहतील, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.केंद्रीय आरोग्य सचिव लव अगरवाल यांनी ही माहिती दिली. गेल्या महिन्यात म्हणजे 25 एप्रिल रोजी केंद्रीय आरोग्य …

Read More »

राहुल गांधींची पीसी टूलकिटचाच भाग; केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांचा आरोप

नवी दिल्ली : वृत्तसंस्था राहुल गांधींची आजची पत्रकार परिषद (पीसी) ही टूलकिटच्या स्क्रिप्टनुसार झाली असल्याचा गंभीर आरोप केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला आहे. प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषद घेत राहुल गांधींनी सरकावर केलेल्या आरोपाचे आणि टीकेचे खंडन केले आहे. जेव्हा पंतप्रधान देशाच्या जनतेसोबत कोरोनाचा सामना करत आहेत, तेव्हा सरकारला …

Read More »

1 जूननंतर दुकाने उघडू द्या; व्यापार्‍यांची मागणी; मुख्यमंत्र्यांना पत्र

पुणे : प्रतिनिधी लॉकडॉऊनमुळे सगळेच व्यवसाय बंद पडल्यामुळे व्यावसायिकांची आर्थिक हानी झाली आहे. त्यामुळे 1 जूननंतर लॉकडॉऊन न वाढविता दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी पुणे व्यापारी महासंघाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. गुढीपाडवा, अक्षयतृतीया, ईद आदी सण लॉकडॉऊनमध्ये गेल्याने गेल्या दोन महिन्यांपासून …

Read More »

बारावीची परीक्षा ः केंद्राने मागविल्या राज्यांकडून सूचना

नवी दिल्ली : केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशांक यांनी रविवारी (दि. 23) राज्यांसोबत व्हर्च्युएल बैठक घेतली. यात केंद्र सरकारने बारावी बोर्डाच्या परीक्षेसंबंधी राज्यांसमोर दोन पर्याय ठेवले आहेत. केवळ महत्त्वाच्या विषयांची परीक्षा घेणे किंवा परीक्षेची पद्धत बदलणे असे दोन पर्याय केंद्र सरकारकडून सूचवण्यात आले आहेत. याशिवाय शिक्षणमंत्र्यांनी कोरोनाच्या परिस्थितीनुसार राज्याला निर्णय …

Read More »

काँग्रेस देशाचा अपमान करतेय!

’भारतीय व्हेरियंट’वरून भाजप नेते प्रकाश जावडेकर आक्रमक नवी दिल्ली : वृत्तसंस्था मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते कमलनाथ यांनी कोरोनाच्या व्हेरियंटवरून केलेल्या एका विधानावरुन केंद्रीय मंत्री प्रकाश आणि भाजप नेते प्रकाश जावडेकर यांनी टीका केली आहे. काँग्रेसने भारताचा अपमान केल्याचा आरोप त्यांनी केला. काँग्रेस नेते कमलनाथ यांनी नुकतेच म्हटले …

Read More »

‘कोवॅक्सिन‘ला डब्ल्युएचओची मान्यता नाही

मंजुरी मिळेपर्यंत लसधारकांना विदेश प्रवासात अडचण नवी दिल्ली : वृत्तसंस्था जगात अनेक देशांमध्ये आता लॉकडाऊन हळूहळू उठवला जातोय, पण आंतरराष्ट्रीय प्रवाशांना परवानगी देताना डब्ल्युएचओ मान्यताप्राप्त लस हा महत्त्वाचा घटक बनलाय. त्याचमुळे भारतात कोवॅक्सिन ही भारत बायोटेकची लस घेतलेल्यांना मात्र पुढच्या काही दिवसांसाठी तरी अडचण जाणवणार आहे. देशाबाहेर प्रवास करू इच्छिणारे …

Read More »

देशात ‘स्पुटनिक व्ही’ची ऑगस्टपासून निर्मिती

नवी दिल्ली : भारतात लसीकरणाच्या मोहिमेत आता रशियाच्या स्पुटनिक व्ही लसीचा समावेश झाला आहे. नागरिक लवकरच ही लस दिली जाणार आहे. या वर्षी ऑगस्ट महिन्यापासून देशात ‘स्पुटनिक व्ही’चे उत्पादन सुरू होणार आहे, अशी माहिती  रशियामधील भारताचे राजदूत डीबी व्यंकटेश वर्मा यांनी दिली. ते म्हणाले, मे महिन्याच्या अखेरपर्यंत भारताला स्पुटनिक व्हीच्या …

Read More »

कोरोना 100 वर्षांतील सर्वांत मोठे संकट : मोदी

नवी दिल्ली ः वृत्तसंस्थापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (दि. 20)  कोरोनासंदर्भात देशातील वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या 54 जिल्हाधिकार्‍यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला. या वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे हेही उपस्थित होते. कोरोनाची साथ गेल्या 100 वर्षांतील सर्वांत मोठे संकट आहे. कोरोनाने आव्हाने आणखी वाढवलीत. तुम्ही जिल्ह्यातील सर्वांत मोठे योद्धे …

Read More »