Breaking News

देश-विदेश

These are all news about national-international

पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन; भारताचे चोख प्रत्युत्तर

श्रीनगर : वृत्तसंस्थाजम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळ चार सेक्टर्समध्ये पाकिस्तानी सैन्याने गोळीबार केला. यात चार जवान शहीद झाले असून, तीन नागरिकांची मृत्यू झाला. भारताने दिलेल्या जोरदार उत्तरात दोन एसएसजी कमांडोसमवेत पाकिस्तानी लष्कराच्या सहा ते सात सैनिकांचा खात्मा करण्यात आला असून, 10 ते 12 पाकिस्तानी सैनिकही जखमी झाले आहेत.याशिवाय भारतीय लष्कराने पाकिस्तानचे बंकर्स, …

Read More »

आपत्तीग्रस्तांना केंद्राची मदत

महाराष्ट्रासह सहा राज्यांसाठी निधी मंजूर नवी दिल्ली : वृत्तसंस्थाकेंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीने चक्रीवादळ, पूर आणि भूस्खलनांमुळे प्रभावित देशातील राज्यांना निधी मंजूर केला आहे. या राज्यांमध्ये महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, ओडिशा, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि सिक्कीम या राज्यांचा समावेश आहे. या राज्यांना एकूण 4,381.88 कोटींचा निधी जाहीर करण्यात …

Read More »

‘आत्मनिर्भर 3.0’ ची घोषणा

केंद्राचे कर्मचार्‍यांना दिवाळी गिफ्ट नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाकोरोनाच्या संकटकाळात घसरलेल्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी मोदी सरकारने आणखी एक मदत पॅकेज जाहीर केले आहे. आत्मनिर्भर भारत 3.0 अंतर्गत रोजगार प्रोत्साहन योजना केंद्र सरकारकडून घोषित करण्यात आली आहे. यात ज्या संस्थेत एक हजारांपेक्षा कमी कर्मचारी आहेत, त्या ठिकाणी 12 टक्के ईपीएफओ व कंपन्यांचे ईपीएफओ …

Read More »

बिहारमध्ये भाजपची भरारी

गतवेळेच्या तुलनेत 21 जागा वाढल्या पाटणा : वृत्तसंस्थाबिहार विधानसभा निवडणुकीत भाजपप्रणित लोकशाही आघाडी (एनडीए)ने 125 जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळविले आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत भाजपने या निकालात भरारी घेतली आहे. भाजपला 2015मध्ये 53 जागा मिळाल्या होत्या. यंदा 74 जागी ‘कमळ’ फुलले आहे. तब्बल 21 जागा जास्त जिंकून भाजपने जबरदस्त यश …

Read More »

अखेर अर्णब गोस्वामी यांना जामीन मंजूर

नवी दिल्ली : वृत्तसंस्थावास्तुविशारद अन्वय नाईक यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले रिपब्लिक वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. सुप्रीम कोर्टाने गोस्वामी यांना अंतरिम जामीन मंजूर केला असून, इतर दोन आरोपींनाही जामीन देण्यात आला आहे. कोर्टाने तिघांचीही प्रत्येकी 50 हजारांच्या जातमुचलक्यावर तत्काळ सुटका करण्याचे …

Read More »

देशात मोदी लाट कायम

बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपची मुसंडीविविध राज्यांतील पोटनिवडणुकांमध्येही सरशी नवी दिल्ली : वृत्तसंस्थाअवघ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने जबरदस्त यश मिळविले आहे. मतदान आटोपल्यानंतर आलेल्या एक्झिट पोलमधून राज्यात सत्तापरिवर्तनाचा अंदाज वर्तवण्यात आला होता, मात्र मंगळवारी (दि. 10) मतमोजणीचे कल समोर येऊ लागल्यापासून भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी …

Read More »

‘कार्तिकी’साठी वारकरी आक्रमक; निवडणुकांवर बहिष्काराचा इशारा

पंढरपूर : प्रतिनिधी कोरोना संकटामुळे गेल्या 17 मार्चपासून कुलुपात बंद असलेल्या विठूरायाच्या मंदिराची दारे कार्तिकी यात्रेला उघडावीत आणि कमीत कमी निर्बंध घालून यंदा कार्तिकी यात्रा होऊ द्यावी, अशी मागणी रविवारी (दि. 8) वारकरी संप्रदायाच्या बैठकीत करण्यात आली. आषाढीप्रमाणे कार्तिकी यात्रेला पंढरपूर शहरात संचारबंदी लागू न करता मर्यादित वारकर्‍यांना कोरोनाचे नियम …

Read More »

अमेरिकेच्या नव्या राष्ट्राध्यक्ष, उपराष्ट्राध्यक्षांना पंतप्रधान मोदींकडून खास शुभेच्छा!

नवी दिल्ली : वृत्तसंस्था अमेरिका राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विद्यमान राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव करणारे डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडन आणि भारतीय वशांच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन करून खास शुभेच्छा दिल्या आहेत. जो बायडन यांचे अभिनंदन करताना पंतप्रधान मोदींनी ट्विटमध्ये म्हटले की, भव्य …

Read More »

पोलीस महासंचालक सुबोध जैस्वाल ठाकरे सरकारवर नाराज; केंद्राच्या सेवेत जाणार

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक (डीजीपी) सुबोध जैस्वाल हे राज्यातील ठाकरे सरकारवर नाराज आहेत. यामुळे त्यांनी पुन्हा केंद्राच्या सेवेत जाण्याचा निर्णय घेतला आहे. जैस्वाल यांनी या संदर्भात मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे विनंती केली होती. त्यांची ही विनंती मान्य करण्यात आली आहे. सप्टेंबर महिन्यात जवळपास 50 वरिष्ठ अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात …

Read More »

महाराष्ट्रात आणीबाणी 2.0; दिल्लीतील महाराष्ट्र सदनाबाहेर उद्धव ठाकरे-इंदिरा गांधींचे पोस्टर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेच्या कारवाईची तुलना भाजपकडून 1975च्या आणीबाणीशी केली जात आहे. त्यातच आता भाजपचे नेते तेजिंदरपाल सिंह बग्गा यांनी दिल्लीतील महाराष्ट्र सदनाबाहेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे पोस्टर लावत राज्यात आणीबाणी 2.0 लागल्याचे नमूद केले आहे. वास्तुविशारद अन्वय …

Read More »