जिकडे तिकडे पाणीच पाणीजनजीवन विस्कळीत; तीन जण बेपत्ता अलिबाग ः प्रतिनिधीसलग तीन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यात सोमवारी (दि. 19) पूरस्थिती निर्माण झाली होती. अनेक ठिकाणी पाणी शिरून परिसर जलमय झाल्याचे दिसून आले, तर काही ठिकाणी दरडी कोसळून घरांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात तीन जण बेपत्ता असून त्यांचा …
Read More »नेरळ-माथेरान घाटात दरड कोसळली
कर्जत : बातमीदार गेले दोन दिवस सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नेरळ-माथेरान घाटातील जुम्मापट्टी भागात सोमवारी (दि. 19) एक दरड कोसळली. त्यामुळे नेरळ-माथेरान घाटरस्ता वाहतुकीस बंद झाला होता, मात्र स्थानिक आणि टॅक्सी चालकांनी वाहने जातील एवढा रस्ता मोकळा केल्याने वाहतूक सुरू झाली. यावर्षीच्या पावसाळ्यात या घाटरस्त्यावर दरड कोसळण्याची ही दुसरी घटना …
Read More »पाली पुलावरील वाहतूक ठप्प; सुधागडात सतर्कतेचा इशारा
पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यात मुसळधार पावसाने सलग दोन दिवस हाहाकार उडविला आहे. तालुक्यातील नद्या, नाले, रहदारीचे रस्ते, पाण्याने तुडुंब भरले आहेत. जनजिवन विस्कळीत झाले आहे. शनिवारी रात्रीपासून रविवार व सोमवारी पावसाचा जोर कायम राहिल्याने पाली, जांभुळपाड्यासह सुधागड तालुक्यात सर्वत्र पाणीच पाणी झाले. आंबा नदीवरील पाली येथील पुलावरील वाहतूक ठप्प …
Read More »खालापूर तालुक्यात पावसाचे धूमशान
खोपोली : प्रतिनिधी खोपोलीसह खालापूर तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले असून, पर्जन्यराजाच्या तुफान फटकेबाजीने तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. सखल भागातील घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने अनेकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. शिळफाटा भागातील डीसी नगरमध्ये याही वर्षी पाणी तुंबल्याने खोपोली नगरपालिकेच्या नालेसफाईचे पितळ उघडे पडल्याची चर्चा होती. रविवारपासून पावसाची फटकेबाजी …
Read More »मुरूड तालुक्यात वरुणराजाचे थैमान; राजपुरीत चार घरांवर दरड कोसळली
मुरुड : प्रतिनिधी तालुक्यात मुसळधार पावसाने थैमान घातले असून, आठ दिवसात तब्ब्ल 1342 मिलीमीटर पाऊस कोसळला. आतापर्यंत मुरुड तालुक्यात एकूण 2563 मिलीमीटर पाऊस झाला असून त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुरूड-अलिबाग रस्त्यावरील काशीद पूल कोसळल्यामुळे मुरुडहून अलिबाग, पनवेल, मुंबईकडे जाणारी वाहतूक बंद आहे. या मुख्य रस्त्यावरील सर्व वाहतूक भालगाव व …
Read More »रायगडात मुसळधार पावसाने उडवली दाणादाण
पेणमध्ये अनेक ठिकाणी पाणी शिरले पेण : प्रतिनिधी मुसळधार पावसाने पेण तालुक्यात धुमाकूळ घातला असून, नदी व खाडीकिनारी असलेल्या ग्रामस्थांची झोप उडाली आहे. तालुक्यातील गावा गावात नदीचे पाणी शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गेल्या पाच दिवसांपासून पडत असलेल्या पावसाने रविवारी रौद्र रूप धारण केल्याने पेण तालुक्यातील बाळगंगा नदी तुडूंब …
Read More »दहावीच्या निकालात ‘सीकेटी’ची धवल यशाची परंपरा कायम
पनवेल ः रामप्रहर वृत्तदहावीत धवल यशाची परंपरा कायम राखत या वर्षीही जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालयाचा इंग्रजी माध्यमाचा निकाल 100 टक्के लागला आहे. या वर्षी जरी परीक्षा झाली नसली तरी इयत्ता नववीचा निकाल आणि दहावीच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे बोर्डाने हा निकाल जाहीर केला आहे. यंदाच्या …
Read More »बनावट पोलीस अधिकारी आणि चार साथीदार ताब्यात
महाडमधील घटना महाड ः प्रतिनिधीमहाड तालुका पोलिसांनी शनिवारी (दि. 18) संध्याकाळी किल्ले रायगडच्या पायथ्याशी पाचाड येथे नाकाबंदीदरम्यान एक वाहनातून आलेल्या व पोलीस खात्यात वरिष्ठ अधिकारी असल्याचे भासवणार्या बोगस पोलीस व त्याच्या चार साथीदारांसोबत ताब्यात घेतले.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर किल्ले रायगड येथे येणार्या पर्यटकांची चौकशी करण्यात येत आहे. रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गाव …
Read More »मुसळधार पावसाने रायगडला झोडपले
अनेक गावांत पाणी घुसले अलिबाग ः प्रतिनिधीमुसळधार पावसाने रविवारी (दि. 18) रायगड जिल्ह्याला झोडपून काढले. उत्तर रायगडमध्ये तर पावसाने धुमाकूळ घातला. अलिबाग तालुक्यातील खारेपाट विभागासह सारळ, म्हात्रोळी, रेवस, मिळखतखार, कार्ले आदी गावांमध्ये पाणी घुसले होते. दरम्यान, जिल्ह्यात सरासरी 118.29 मिमी पाऊस पडला. रोहा तालुक्यात सर्वाधिक 184 मिलिमीटर, तर त्या खालोखाल …
Read More »भाजप नेते लक्ष्मणशेठ म्हात्रे (पाटील) यांना पत्नीशोक
पनवेल ः रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मणशेठ म्हात्रे (पाटील) यांच्या पत्नी जनाबाई यांचे रविवारी (दि. 18) अल्पशा आजाराने निधन झाले. त्या 65 वर्षांच्या होत्या.जनाबाई म्हात्रे (पाटील) यांच्या पार्थिवावर पनवेल येथील अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. कै. जनाबाई यांच्या पश्चात पती लक्ष्मणशेठ म्हात्रे (पाटील), पुत्र अविनाश, शैलेश व …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper