अहमदाबाद : वृत्तसंस्थाभारत आणि इंग्लंडदरम्यान तिसरा कसोटी सामना अहमदाबादमधील मोटेरा येथे असलेल्या सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियममध्ये बुधवार (दि. 24)पासून खेळवला जाणार आहे. हे जगातील सर्वांत मोठे क्रिकेटचे स्टेडियम असून, सध्या चर्चेत आहे.या स्टेडियमवर यापूर्वीही सामने खेळवण्यात आले आहेत, परंतु गुजरात क्रिकेट असोसिएशनने या स्टेडियमला आता नवा लूक दिला आहे. या …
Read More »तिसर्या कसोटीसाठी भारताची विशेष रणनीती
अहमदाबाद : वृत्तसंस्थामोटेरा येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमवर गुलाबी चेंडूने प्रकाशझोतात खेळवण्यात येणार्या इंग्लंडविरुद्धच्या तिसर्या कसोटीसाठी भारतीय संघ तीन वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळे जसप्रीत बुमराचे पुनरागमन निश्चित असून, फिरकीपटू कुलदीप यादवला संघातील स्थान गमवावे लागू शकते.तिसरी कसोटी गुलाबी चेंडूने खेळवण्यात येणार असून अहमदाबादची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना पोषक …
Read More »प्राथमिक शिक्षकांच्या क्रिकेट स्पर्धेत कोंढवी पळचिल संघ विजेता
पोलादपूर : प्रतिनिधीमहाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग (जिल्हा परिषद, नगर परिषद व महापालिका क्षेत्र) या नोंदणीकृत संघटनेतर्फे यंदा प्राथमिक शिक्षकांसाठी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. अंतिम सामन्यामध्ये कोंढवी पळचिल केंद्र संघाने कापडे देवळे केंद्र संघावर मात करीत विजेतेपद पटकाविले.छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवानिमित्त दरवर्षी विविध गुणदर्शन सोहळा आयोजित …
Read More »ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या जेतेपदावर जोकोव्हिचचेपुन्हा एकदा वर्चस्व
मेलबर्न : वृत्तसंस्थाजागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचने रशियाच्या डॅनिल मेदवेदेवचा सरळ तीन सेटमध्ये सहज धुव्वा उडवून ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या जेतेपदावर पुन्हा एकदा वर्चस्व प्रस्थापित केले. जोकोव्हिचचे हे कारकिर्दीतील 18वे, तर ऑस्ट्रेलियन स्पर्धेचे नववे जेतेपद ठरले.33 वर्षीय जोकोव्हिचने आपल्या दमदार सर्व्हिस, तसेच जोरदार फटक्यांनिशी मेदवेदेवचे आव्हान परतवून लावले. …
Read More »शिवकार्य ट्रेकर्सकडून सोंडाई गडावर श्रमदान
मोहोपाडा : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील शिवकार्य ट्रेकर्सच्या वतीने स्वच्छता व श्रमदान उपक्रमांतर्गत कर्जत तालुक्यातील सोंडेवाडी येथील सोंडाई गडाची श्रमदानातून स्वच्छता करण्यात आली. शिवजयंतीचे औचित्य साधून सोंडाई गडावर सूचना फलक, स्वच्छता व श्रमदान उपक्रम राबविण्यात आला. शिवकार्यचे संस्थापक रोहिदास राघो ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली व शिवकार्य मधील महेश दुर्गे, आकाश गोडीवले, किरण …
Read More »शासकीय योजनांच्या प्रमाणपत्र, कार्डाचे वाटप
नगरसेविका संजना कदम यांचा उपक्रम; आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती पनवेल : वार्ताहर पनवेल महानगरपालिका नगरसेविका संजना कदम यांच्या माध्यमातून विविध सरकारी योजनांचा शिबिराद्वारे महात्मा ज्योतिबा फुले आरोग्यदायी योजना, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना, प्रधानमंत्री ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियान डिजिटल लिटरसी, त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक कार्ड, पॅनकार्ड, …
Read More »नवी मुंबईतील शिवसेना, राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांचा भाजपमध्ये प्रवेश
नवी मुंबई : प्रतिनिधी आपल्या समर्थकांसह शिवसेना उप विभाग प्रमुख मनोज शिंदे, शाखा प्रमुख सागर शिंगाडे, माजी उपविभाग प्रमुख शंकर पाटील, आनंद पवार, उपविभाग संघटक मीनाताई पाटील, अखलाक शेख यांच्यासह राष्ट्रवादीचे राहुल कश्यप या नवी मुंबईतील पदाधिकार्यांनी नवी मुंबई भाजप निवडणूक प्रभारी आमदार आशिष शेलार आणि गणेश नाईक यांच्या उपस्थितीत …
Read More »पटोलेंची गुंडागर्दी चालू देणार नाही
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा इशारा नवी मुंबई : प्रतिनिधी अमिताभ बच्चन व अक्षय कुमार यांचे शुटिंग बंद पाडू, असे वक्तव्य करणारे काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांची गुंडागर्दी महाराष्ट्रात चालू देणार नाही. त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो. अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार या दोघांना आमचा पाठींबा असून रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते …
Read More »अमरावतीमध्ये लॉकडाऊन; लग्न, सामाजिक-राजकीय कार्यक्रमांवर निर्बंध
अमरावती : प्रतिनिधी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अमरावती जिल्ह्यात प्रचंड प्रमाणात वाढल्याने रविवारी (दि. 21) एका दिवसाचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. त्याला नागरिकांनी प्रतिसाद दिला. अशातच अमरावती व अचलपूरमध्ये पुढील आठवडाभरासाठी लॉकडाऊन करण्यात येत असल्याची घोषणा जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. सोमवारी (दि. 22) रात्री 8 …
Read More »रोह्याच्या कुंडलिका नदीत बुडून दोन तरुणांचा मृत्यू
धाटाव : प्रतिनिधी मुंबईहून रोह्यातील बाहे गावी आपल्या मित्राकडे आलेल्या दोन तरुणांचा कुंडलिका नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मुंबईहून 25जण शनिवारी (दि. 20) बाहे गावी सहलीसाठी आले होते. त्यापैकी काही तरुणांना पोहोण्याचा मोह आवरला नाही, मात्र पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने अजिंक्य जयराम …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper