Breaking News

महत्वाच्या बातम्या

भाजप पदाधिकारी धावले सर्वसामान्यांच्या मदतीला; देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनाला कर्जत भाजपची साथ

कडाव ः वार्ताहर देशातील व महाराष्ट्रासह इतर राज्यांतील कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन जारी केला आहे. त्यानंतर  अत्यावश्यक सेवासुविधा मात्र सुरू राहिल्या आहेत. सध्या राज्यातील गोरगरीब व ज्या मजुरांचा रोजंदारीवरच उदरनिर्वाह सुरू होता अशा सर्वसामान्यांच्या मदतीसाठी दानशूर हात पुढे यावेत, असे …

Read More »

कसोटीत संयम महत्त्वाचा

हल्लीच्या धावत्या युगात सर्वांना सर्वकाही झटपट होणे अपेक्षित असते. त्याला खेळही अपवाद राहिलेले नाहीत. दर्शकांना कमी वेळेत निकाल हवा असतो. त्यामुळे लीग प्रकाराला चांगलीच पसंती मिळाल्याचे दिसून आले आहे, पण पूर्वी कसोटी क्रिकेट लोकप्रिय होते. त्यात संयम महत्त्वाचा ठरत असे. आताही माणूस एका वेगळ्या कसोटीवर आहे ती म्हणजे जीवनाची… कोरोना …

Read More »

महाडच्या दासगाव आदिवासी वाडीतील 14 मुलांना विषबाधा; एरंडाची फळे खाल्ल्याने त्रास प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार

महाड : प्रतिनिधी रानात जाऊन एरंडाची फळे खाल्ल्याने महाड तालुक्यातील दासगाव आदिवासी वाडीतील 14 मुलांना विषबाधा झाली. या मुलांवर तातडीने दासगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले आहेत. सध्या कोरोनामुळे शाळांना सुटी देण्यात आल्याने महाडमधील दासगाव आदिवासी वाडीतील मुले शनिवारी (दि. 28) संध्याकाळी 3 वाजण्याच्या सुमारास शेजारील जंगलात फिरण्यास गेली …

Read More »

शिवभोजन थाळी आता पाच रुपयांत

मुंबई : प्रतिनिधी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील गोरगरीब, शेतकरी, मजूर व विद्यार्थीवर्ग उपाशी राहू नये यासाठी शासनाने केवळ पाच रुपयांमध्ये ग्राहकांना जेवण देण्याचा निर्णय घेतला आहे. विधानसभा आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांच्या गरीब, गरजूंची उपासमार होऊ नये यासाठी राज्य शासनाने उपाययोजना करावी, या मागणीला …

Read More »

पनवेल फाइट्स कोरोना ऑनलाइन चित्रकला स्पर्धा

पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेतून पनवेल फाइट्स कोरोना या ऑनलाइन चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेसाठी कोरोनाला पराभूत करण्याची आयडिया, घरातच धमाल मस्ती, कोरोनानंतर जीवन, बेघर/गरिबांच्या कोरोना समस्या असे चार विषय असून, काढलेल्या चित्राचा फोटो response@PrashantThakur.in किंवा 9920765765 …

Read More »

उरण नगर परिषदेतर्फे बेघरांची व्यवस्था

उरण : वार्ताहर कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी शासनाने सर्वत्र लॉकडाऊन केले असून, संचारबंदीही लागू केली आहे. अशा परिस्थितीत ज्यांची उपासमार होत आहे व ज्यांना राहायला घर नाही अशांना उरण नगर परिषदेच्या वतीने जेवण व निवार्‍याची व्यवस्था करण्यात आली आहे. रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या निर्देशानुसार उरण पालिकेने ही कार्यवाही …

Read More »

कर्जतमध्ये दारूविक्री; परमिट रूमवर कारवाई

कर्जत : प्रतिनिधी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शासनाने लॉकडाऊन केला असून, संचारबंदी लागू आहे, मात्र त्याचे उल्लंघन करून मद्याची विक्री करणार्‍या कर्जतमधील आशीर्वाद परमिट रूमवर पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिसांनी तेथे धाड टाकून 24 हजार 508 रुपयांचा ऐवज जप्त, तर पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कर्जत पोलीस …

Read More »

टेम्पोतून मजुरांची वाहतूक करण्याचा प्रयत्न फसला; पळस्पे फाटा येथे पोलिसांनी पकडले

पनवेल : वार्ताहर कोरोना व्हायरसचा प्रसार होऊ नये म्हणून शासनाने लॉकडाऊन केला असतानाही  दोन टेम्पोंतून मजुरांची वाहतूक करण्याचा प्रयत्न पोलिसांनी रविवारी (दि. 29) रात्री पळस्पे फाटा येथील नाकांबदी पॉइंटवर हाणून पाडला. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही वाहनचालकांवर गुन्हा दाखल केला आहे. लॉकडाऊन असूनही लोक खासगी, मालवाहू वाहनाने गावी जात आहेत. अशाच …

Read More »

मुंबईत आणखी एक बळी; 40 वर्षीय महिलेचा मृत्यू

मुंबई : प्रतिनिधी मुंबईत कोरोनाने आणखी एक बळी घेतला आहे. कोरोनाची लागण झालेल्या एका महिलेचा रविवारी (दि. 29) उपचारादरम्यान मृत्यू झाला. या महिलेला कोरोनासदृश लक्षण आढळून आल्यानंतर रुग्णालयात दाखल कऱण्यात आले होते. त्यानंतर कोरोना तपासणीत तिला संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे कोरोनामुळे मुंबईत मृत्यू झालेल्यांची संख्या आता सात झाली आहे. …

Read More »

कोरोनाची लक्ष्मणरेषा पाळा!; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे देशवासीयांना आवाहन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था कोरोनाशी लढाई म्हणजे जीवन-मरणाची लढाई आहे. कोरोनापासून वाचण्यासाठी लष्मणरेषा पाळावीच लागेल, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना लॉकडाऊनचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधानांनी रविवारी (दि. 29) मन की बात या आपल्या विशेष कार्यक्रमाद्वारे जनतेशी संवाद साधला. पंतप्रधान मोदींनी ’मन की बात’मध्ये सुरुवातीलाच देशवासीयांची माफी …

Read More »