Breaking News

महत्वाच्या बातम्या

लोकसभा निवडणुकीचा बिगूल लवकरच वाजणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : आगामी लोकसभा निवडणुकीची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोग लवकरच करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. देशातील या महत्त्वपूर्ण निवडणुकीचा बिगूल कधी वाजणार याचीच चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे. राजकीय पक्षदेखील निवडणुकीच्या तयारीला लागलेत. सर्वांच्या प्रतीक्षेला पुढील आठवड्यात पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाकडून यंदा लोकसभा निवडणूक …

Read More »

महिला बचत गटांसाठी अस्मिता बाजार योजना

मुंबई : प्रतिनिधी : ग्रामीण भागातील महिला बचत गटांना त्यांच्या उत्पादनांची आता अस्मिता अ‍ॅपच्या माध्यमातून ऑनलाईन विक्री करता येणार आहे. याशिवाय खाद्यपदार्थ, लहान मुलांना लागणार्‍या आवश्यक वस्तू, सौंदर्यप्रसाधने, घरगुती उपयोगी वस्तू, पशू खाद्य आदी साहित्याचीही या अ‍ॅपच्या सहाय्याने बचत गटांना रिटेलर म्हणून विक्री करता येणार आहे. जागतिक महिला दिनी राज्याच्या …

Read More »

महापालिकेने कोणालाही अभय दिलेले नाही

पनवेल : प्रतिनिधी गाढी नदीच्या किनार्‍याजवळ भिंगारीसमोर राष्ट्रीय महामार्गावरील पुलाचे आणि सर्व्हिस रस्त्याचे काम सुरू असून, त्या ठिकाणी कामाला लागणारे साहित्य आणि कामगारांना तात्पुरती बसण्यासाठी सोय म्हणून असलेले गाळे रस्त्याचे काम पूर्ण झाल्यावर पाडून टाकण्यात येणार आहेत. पनवेल महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने रस्त्याचे काम रखडून लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी हे …

Read More »

महाराष्ट्रातील सहा कर्तृत्ववान महिलांना नारीशक्ती पुरस्कार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 8) जागतिक महिला दिनी महाराष्ट्रातील सहा कर्तृत्ववान महिलांना प्रतिष्ठित नारीशक्ती पुरस्काराने गौरविण्यात आले. केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयाच्या वतीने राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या देशभरातील 44 माहिलांना नारीशक्ती पुरस्काराने …

Read More »

झारखंडमध्ये भीषण अपघात; एकाच कुटुंबातील 10 जण ठार

रांची : वृत्तसंस्था : झारखंडची राजधानी रांचीजवळ राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात एका कुटुंबातील 10 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. रांचीजवळच्या कुजू घाटात डम्पर आणि इनोव्हा कार यांच्यात हा अपघात झाला. रांचीच्या हटिया येथील रेल्वे कॉलनीमध्ये राहणारे सिंह कुटुंबीय बिहारच्या भोजपूर येथील एका मौजीबंधन कार्यक्रमाहून येत होते. या वेळी कुजू …

Read More »

भाजप-शिवसेना युतीचे उमेदवारी अर्ज दाखल

चिपळे, कर्नाळा ग्रामपंचायत निवडणुकीत झंजावात पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील चिपळे आणि कर्नाळा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीच्या उमेदवारांनी आपले अर्ज शनिवारी (दि. 9) तहसील कार्यालयात दाखल केले. या वेळी भाजप अध्यक्ष अरुणशेठ भगत उपस्थित होते. या दोन्ही ठिकाणी युतीला अनुकूल वातावरण दिसत आहे.  चिपळे ग्रामपंचायतीच्या …

Read More »

कंत्राटी कर्मचार्यांना वेतनप्राप्तीची हमी

मुंबई : प्रतिनिधी : कंत्राटी कर्मचार्‍यांना कंत्राटदारांसमवेत केलेल्या करारानुसार आणि विविध कामगार कायद्यानुसार वेतन प्रदान करण्यासंदर्भात समान कार्यपद्धती लागू करण्याबाबत राज्य शासन सकारात्मक होते. या संदर्भात  उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने 22 फेब्रुवारी 2019 रोजी परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकानुसार कंत्राटी कर्मचार्‍यांना कंत्राटदारांमार्फत वेतन अदा करताना समान कार्यपद्धती अवलंबिण्यात …

Read More »

सातार्यात काँग्रेसला मोठा धक्का

मदन भोसले यांचा भाजपमध्ये प्रवेश सहा तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या किसन वीर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व माजी आमदार मदन भोसले यांनी हजारो कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शनिवारी (दि. 9) भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे जिल्ह्याच्या काँग्रेसवर मोठा वज्राघात झाला आहे. मदन भोसले यांचा भाजपमध्ये प्रवेश झाल्यामुळे वाई, खंडाळा, महाबळेश्वर …

Read More »

रायगडातील विधानसभांच्या जागांवर कोणतीही तडजोड नाही

काँग्रेस नेते माणिकराव जगतापांचा आघाडीला इशारा अलिबाग : प्रतिनिधी रायगडातील काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांना मदत करेल, पण पुढे जाऊन रायगडातील विधानसभांच्या जागांवर मात्र काँग्रेस कोणतीही तडजोड करणार नाही. आमच्या जागा आम्ही लढवणारच, अशी रोखठोक भूमिका काँग्रेसचे रायगड जिल्हा अध्यक्ष माणिकराव जगताप यांनी मांडली आहे. त्याच वेळी रायगड लोकसभेच्या जागेवर आजही आमचा …

Read More »

एक्स्प्रेस वेवर अपघातात चौघे ठार

खालापूर, खोपोली : प्रतिनिधी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर बोरघाटातील ढेकू गावच्या हद्दीत फुडमॉलजवळ भरधाव वेगात असलेली कार समोरून जाणार्‍या ट्रकच्या मागे घुसल्याने कारमधील चार जण ठार झाले असून, दोघे गंभीर आहेत. हा अपघात शनिवारी (दि. 9) दुपारी सव्वादोनच्या सुमारास घडला. पुण्याकडून इर्टिका कार (एमएच 14-एफजी 205)ने सहा प्रवासी मुंबईकडे जाण्यास निघाले …

Read More »