Breaking News

महत्वाच्या बातम्या

विराट कोहलीची डीआरएसवर पुन्हा नाराजी

मोहाली : वृत्तसंस्था मोहालीतील चौथ्या वनडेत अखेरच्या षटकांमध्ये तडाखेबंद फलंदाजी करून ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून देणार्‍या अ‍ॅश्टन टर्नरविरोधातील डीआरएस (डिस्प्ले रिव्ह्यू सिस्टिम) अपीलनंतर दिलेल्या निर्णयावर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. डीआरएसच्या कामगिरीत सातत्याचा अभाव दिसून येतो, असे त्याने म्हटले. भारताने 358 धावांचा डोंगर उभा केला, पण …

Read More »

ऑस्ट्रेलियाने रचला विक्रम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारताविरुद्धच्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने 5 गडी राखून विजय मिळवला. पीटर हँड्सकॉम्बचे शतक (117), ख्वाजाची संयमी खेळी (91) आणि टर्नरची तुफानी 84 धावांची खेळी याच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 359 धावांचे आव्हान 2 षटके राखून पार केले. या विजयासह ऑस्ट्रेलियाने पाच सामन्यांच्या मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली. त्याचबरोबर …

Read More »

पंतने संधी गमावली, कार्तिकला खेळवण्याची मागणी

मोहाली : वृत्तसंस्था अ‍ॅश्टन टर्नरची फटकेबाजी त्याचबरोबर पीटर हँड्सकॉम्ब आणि उस्मान ख्वाजा यांनी तिसर्‍या विकेटसाठी 192 धावांच्या दमदार भागीदारीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने चौथा वन डे सामना जिंकला. या सामन्यात यष्टिरक्षक रिषभ पंतचे गचाळ क्षेत्ररक्षण टीकेचे धनी ठरले. पंतने या सामन्यात सोप्या संधी गमावल्या. त्याच्या ढिसाळ कामगिरीमुळे दिनेश कार्तिकच्या समावेशाची मागणी जोर …

Read More »

प्रजनेशचा निकोलोजवर सनसनाटी विजय

इंडियन वेल्स : वृत्तसंस्था भारताच्या प्रजनेश गुणेश्वरने आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तमविजय नोंदवताना इंडियन वेल्स एटीपी मास्टर्स टेनिस स्पर्धेच्या दुसर्‍या फेरीत जागतिक क्रमवारीत 18व्या स्थानावर असलेल्या निकोलोज बासिलाशविलीचा पराभव केला. एकेरीच्या मुख्य फेरीत प्रथमच खेळत असलेल्या डावखुर्‍या प्रजनेशने 2 तास 32 मिनिटांत जॉर्जियाच्या खेळाडूचा 6-4, 6-7, 7-6ने पराभव केला. जागतिक क्रमवारीत 97व्या …

Read More »

स्मृतीची टी-20मध्ये तिसर्या स्थानी झेप

दुबई : वृत्तसंस्था भारताची सलामीवीर फलंदाज स्मृती मानधनाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) महिला ट्वेन्टी-20 क्रमवारीत तीन स्थानांनी झेप घेत कारकिर्दीत सर्वोत्तम तिसरे स्थान पटकाविले आहे. हरमनप्रीत कौरच्या अनुपस्थितीत इंग्लंडविरुद्ध टी-20 मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व मानधनाने केले. तीन सामन्यांत तिने 72 धावा केल्या. तिसर्‍या सामन्यात अर्धशतकही ठोकले होते. दुखापतीमुळे मालिकेत खेळू …

Read More »

कविंदर सिंगचा सुवर्ण‘पंच’

हेलसिंकी : वृत्तसंस्था भारताचा कविंदर सिंग बिष्ट (56 किलो) याने सुवर्णपदकाची कमाई करीत फिनलॅँडच्या हेलसिंकीमध्ये सुरू असलेल्या 38व्या जीबी बॉक्सिंग स्पर्धेत भारताचा तिरंगा फडकविला. तीन वेळचा आशियाई पदक विजेता थापा (60 किलो) याच्यासोबतच गोविंद साहनी (49 किलो), राष्ट्रकुल स्पर्धेत कांस्यपदक विजेत्या मोहम्मद हसमुद्दीन (56 किलो) व दिनेश डागर (69 किलो) …

Read More »

राज्यात तापमानाचा पारा वाढला; यवतमाळात सर्वाधिक तापमान

पुणे ः प्रतिनिधी राज्यात निवडणुका जाहीर झाल्यानंतर राजकीय वातावरण तापू लागले असतानाच आता वातावरणही तापू लागले आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे़  राज्यात सर्वांत जास्त कमाल तापमान यवतमाळ येथे 39 अंश सेल्सिअस, तर सर्वांत कमी किमान तापमान गोंदिया येथे 14 अंश सेल्सिअस नोंदविले …

Read More »

काळवीट शिकार प्रकरण; सैफ, तब्बू, सोनाली बेंद्रेला हायकोर्टाची नोटीस

जोधपूर ः वृत्तसंस्था राजस्थानमधील काळवीट शिकारप्रकरणी निर्दोष सुटलेले बॉलिवूड कलाकार सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, नीलम कोठारी, तब्बू आणि दुश्यंत सिंह या पाच जणांना जोधपूर हायकोर्टाने नोटीस पाठवली आहे. यापूर्वी जोधपूरच्या सत्र न्यायालयाने या पाच जणांना दोषमुक्त केले होते, सत्र न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात राजस्थान सरकारने जोधपूर हायकोर्टात धाव घेतली आहे. …

Read More »

इथिओपिया दृर्घटनेतील मृतांत भारतीय महिला अधिकारी

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था इथिओपिअन एअर लाइन्सच्या विमान अपघातात बळी पडलेल्या भारतीयांची संख्या चारवरून सहा इतकी झाली आहे. हे एकाच कुटुंबातील सदस्य आहेत. दरम्यान, या मृतांमध्ये पर्यावरण मंत्रालयातील संयुक्त राष्ट्रांच्या सल्लागार शीखा गर्ग यांचाही समावेश असल्याचे केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी स्पष्ट केले आहे. इथिओपियाची राजधानी अदिस अबाबाहून नैरोबीला जाणार्‍या …

Read More »

‘मी खोटी आश्वासने देत नाही’

नागपूर ः प्रतिनिधी मी खोटी आश्वासने देत नाही. प्रामाणिकपणा आणि पारदर्शकतेसारखी मूल्येच मोठ्या वाटचालीसाठी महत्त्वपूर्ण ठरतात, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. राजकारण हे सामाजिक-आर्थिक सुधारणांचे माध्यम असल्याचे ते म्हणाले. नागपूर येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. राजकारण हे एक प्रतिस्पर्धी क्षेत्र आहे. जिथे लोकांच्या आकांक्षेनुसार काम …

Read More »