Breaking News

महत्वाच्या बातम्या

मतदार नोंदणीसाठी आजपासून विशेष मोहीम

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त मतदार नोंदणी झाली नाही अशा सर्व नागरिकांना मतदार नोंदणीसाठी आणखी संधी मिळावी म्हणून शनिवारी (दि 2) व रविवारी (दि. 3) या दिवशी नोंदणी करता येईल, अशी माहिती विभागीय महसूल आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांनी शुक्रवारी (दि. 1) पत्रकार परिषदेत दिली. मतदार नोंदणीसाठी विशेष मोहिमेबाबत आज …

Read More »

सामाजिक कार्य हेच खरे राजकारण -महाजन

पनवेल : प्रतिनिधी सामाजिक कार्य हेच खरे राजकारण, निवडणुकीपुरते भांडा, नंतर विकास साधा, असे लोकसभा सभापती सुमित्राताई महाजन यांनी नुकतेच धुळे येथे शिक्षण महर्षी स्व. बापूसाहेब विसपुते यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण  प्रसंगी बोलताना सांगितले. आदर्श शैक्षणिक समूहाचे शिक्षण महर्षी स्व. बापूसाहेब विसपुते यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण रविवार 24 फेब्रुवारी रोजी …

Read More »

गव्हाण विद्यालयात मोबाईल जागरूकतेचे मार्गदर्शन

गव्हाण : रामप्रहर वृत्त गव्हाण येथील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेज इयत्ता 11वीच्या विद्यार्थ्यांना मोबाईल जागरूकतेविषयी मार्गदर्शन करण्यात आले. प्रास्ताविक ज्युनिअर कॉलेज विभागाचे आर. ए. खेडकर यांनी केले. महात्मा फुले महाविद्यालयातील मानसशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख श्री. परीट सर यांनी मोबाईलविषयी जागृती, मोबाईलचा वापर कसा करावा, …

Read More »

विस्तारित गावठाण सर्वेक्षण होणार

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश नवी मुंबई : प्रतिनिधी गेल्या अनेक वर्षापासूनचा विस्तारित गावठाणातील सिटी सर्वेक्षणाचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागला आहे. येत्या मंगळवारपासून बेलापूर गावातून विस्तारित गावठाणातील सिटी सर्वेक्षणास सुरुवात होणार आहे. सदर सिटी सर्वेक्षण सिडको व जिल्हाधिकारी कार्यालयातून नियुक्त केलेल्या पी. एन. शिदोरे सिव्हिल इंजिनियर्स इंडिया प्रायव्हेट लि. …

Read More »

उरणची बंदरे, खाडी किनारे असुरक्षित

जेएनपीटी : प्रतिनिधी उरण तालुक्याला समुद्र किनारे व खाड्यांचे वरदान असून या विभागात मत्स्य उद्योगामार्फत जनतेला उपजीविकेचे साधन निर्माण होत असताना सध्या हे खाडी किनारे, बंदरे स्मगलर्स व चोरट्या व्यापार्‍यांचे केंद्रबिंदू ठरू लागल्याने उरणचे खाडी किनारे, बंदरे सध्या असुरक्षित झाल्याचे दिसून येत आहे.तरी देशाच्या सुरक्षिततेच्या दुष्टीने या बंदराची, किनारपट्टीची सुरक्षा …

Read More »

ग्रा. पं. निवडणूक निकाल – प्रस्थापितांना धक्काच

रायगड जिल्ह्यात नुकत्याच 90 ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकीत प्रस्थापितांना धक्के बसले आहेत. 50 वर्षे सत्ता असलेल्या ग्रामपंचायती सत्ताधार्‍यांच्या हातून गेल्या आहेत. या निवडणुकीत एक एक बात स्पष्ट झाली, ती म्हणजे राष्ट्रवादी आणि शेकापच्या आघाडीसोबत जाण्यास रायगड जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ते तयार नाहीत. त्यांनी शिवसेनेला सहकार्य केले आहे. हेच चित्र लोकसभा …

Read More »

महाराष्ट्र बँकेच्या कशेळे शाखेला टाळे

कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यांच्या आदिवासी भागाला जोडणार्‍या कशेळे येथील बँक ऑफ महाराष्ट्र या एकमेव राष्ट्रीयकृत बँकेत इंटरनेट सुविधा मिळत नाहीत. या इंटरनेट घोळामुळे गेल्या महिनाभर वैतागलेल्या खातेदारांनी केलेल्या मागणीनुसार गुरुवारी (दि. 28) महाराष्ट्र बँकेच्या कशेळे शाखेला टाळे ठोकण्यात आले. बँक ऑफ महाराष्ट्रच्या कशेळे येथील शाखेत गेले कित्येक दिवस इंटरनेट …

Read More »

‘आरईएक्स‘ च्या माध्यमातून युवकांना दिशा देण्यासाठी एक चांगले व्यासपीठ -आमदार निरंजन डावखरे

रोहे ः प्रतिनिधी ‘आरईएक्स 2 के 19‘ या प्रदर्शनात विद्यार्थ्यानी चांगल्या कलाकृती मांडल्यामुळे त्यांना व्यासपिठ मिळाले आहे. त्यामुळे हे प्रदर्शन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दिशा देण्यासाठी चांगले व्यासपिठ ठरले असल्याचे मत आमदार निरंजन डावखरे यांनी येथे व्यक्त केले.  रायगड जिल्हा भाजप युवा मोर्चा आणि सुराज्य सामाजिक प्रतिष्ठाण यांच्या संयुक्त विद्यमाने रोह्यातील डॉ. …

Read More »

वरेडीच्या उपसरपंचपदी भाजपच्या जयश्री वाघमारे

पेण : प्रतिनिधी तालुक्यातील वरेडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी शुक्रवारी (दि. 1) भाजपच्या  जयश्री गजानन वाघमारे विराजमान झाल्या. उपसरपंच निवडीसाठी घेण्यात आलेल्या वरेडी ग्रामपंचायतीच्या विशेष सभेला ग्रामपंचायत सदस्य परशुराम पाटील, गजानन वाघमारे, श्वेता म्हात्रे, सारिका पाटील, प्रमिला पाटील आदि उपस्थित होते. वरेडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदावर भाजपचा झेंडा फडकविण्यासाठी रायगड जि.प.चे माजी …

Read More »

असंघटीत कामगार पेन्शन योजना रायगडात 50 हजारांचे उद्दिष्ट

अलिबाग : प्रतिनिधी मासिक 15 हजारांपेक्षा कमी उत्पन्न असणार्‍या सर्व असंघटीत कामगारांना पेन्शन योजना राबविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. रायगड जिल्ह्यात त्यासाठी 50 हजार कामगाराची नोंदणी करण्याचे उद्दिष्ट आम्ही ठेवले आहे. योजनेंतर्गत 5 मार्चपूर्वी आम्ही 22 हजार कामगारांची नोंदणी करणार आहोत, अशी माहिती रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी …

Read More »