उल्हास नदीवरील दहिवली, मालेगाव, पाषाणे पूल पाण्याखाली कर्जत : बातमीदार मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे उल्हास नदीला पूर आला आहे. बुधवार (दि. 13)सकाळपासून नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहे. नदीवरील दहिवली मालेगाव येथील पूल पाण्याखाली गेला आहे. तर पाषाणे पुलाला पाणी लागले आहे. दरम्यान, नदी काठच्या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली …
Read More »पोलादपुरातील कवींद्र परमानंदांचे समाधीस्थळ उपेक्षित
पोलादपूर शहरातील शिवकालीन स्वामी कवींद्र परमानंद यांच्या समाधीस्थळी दरवर्षी मकरसंक्रांतीचा वार्षिकोत्सव आणि गुढीपाडव्यानिमित्त गुढी उभारण्याचा उपक्रम अखंडीतपणे सुरू आहे. मात्र, येथे गेल्या काही वर्षांपूर्वी सुशोभिकरणाचे काम रखडले. गेल्या चार पाच महिन्यांपासून या परिसराकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. समाधीस्थळी बांधण्यात आलेल्या मठामध्ये परमानंदांच्या जीवनाचा अल्पपरिचय देणारा लेखही भिंतींच्या रंगसफेदीदरम्यान दिसेनासा झाला …
Read More »खारघरच्या रामशेठ ठाकूर महाविद्यालयात अॅड-मॅड शो स्पर्धा
खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघरमधील रामशेठ ठाकूर वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील वाणिज्य विभागाच्या वतीने अॅड-मॅड शो या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ही स्पर्धा बुधवारी (दि.13) सकाळी 10 ते 1 च्यादरम्यान आयोजित करण्यात आली. या स्पर्धेमधे महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन आपल्या विशिष्ट …
Read More »सानपाड्यात आरोग्यपर जनजागृती शिबिराचे आयोजन करा -पांडुरंग आमले
नवी मुंबई : बातमीदार सानपाडा नोड येथील प्रभाग 30मधील रहीवाशांच्या माहितीसाठी आरोग्यपर जनजागृती शिबिराचे आयोजन करण्याची लेखी मागणी भाजपचे युवा नेते पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे निवेदनातून केली आहे. प्रभाग 30 मध्ये सानपाडा कारशेड, सानपाडा नोडमधील सेक्टर 12,2,7, 8,9, 10 (काही भाग), सेक्टर 11 ,15, 16, 16 …
Read More »नवी मुंबईत पावसाचे थैमान
नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबईत मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. मंगळवारी रात्रीपासून पावसाचा जोर आणखी वाढला आहे. गेल्या 24 तासांत नवी मुंबईत सरासरी 84.68 मिमी पाऊस झाला. यामुळे एपीएमसी मसाला मार्केट आणि महापे एमएसआरडीसी ते इंदिरा नगर येथील सखल भागात पाणी साचले आहे. पाण्याचा निचरा करण्यासाठी महापालिका आपत्ती व्यवस्थापनच्या …
Read More »मराठी माणसाने उद्योजक बनण्याची तयारी ठेवावी
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे नवी मुंबईत आवाहन नवी मुंबई : बातमीदार मराठी माणसाने उद्योजक बनण्याची मानसिकता तयार केली पाहिजे, असे आवाहन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले. ते नवी मुंबईत मराठी उद्योजकता दिवसाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. ना. नारायण राणे म्हणाले, राजनाथ सिंग यांच्या फोननंतर उध्दव ठाकरे रागावले …
Read More »पनवेलमध्ये गुरुवारी ‘भेटला विठ्ठल माझा’; सुश्राव्य गाण्यांची सुरेल मैफिल
पनवेल : रामप्रहर वृत्त आषाढी एकादशी व गुरुपौर्णिमेनिमित्त भारतीय जनता पक्ष उत्तर रायगड सांस्कृतिक सेलच्या वतीने गुरुवारी (दि. 14) सायंकाळी 6.30 वाजता पनवेलमध्ये ’भेटला विठ्ठल माझा’ सुश्राव्य गाण्यांची सुरेल मैफिल आयोजित करण्यात आली आहे. पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात होणार्या या कार्यक्रमात मराठी इंडियन आयडॉल स्पर्धेचा विजेते …
Read More »श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाकडून नेरे भागातील विद्यार्थ्यांना वह्यांचे मोफत वाटप
पनवेल : रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने पनवेल तालुक्यातील नेरे भागातील विद्यार्थ्यांना वह्यांचे मोफत वाटप करण्यात आले. मंडळाच्या वतीने दरवर्षी विविध शैक्षणिक उपक्रम राबवून गरीब व गरजू विद्यार्थ्यांच्या नेहमीच मदतीचा हात देण्यात येतो. त्या अंतर्गत नेरे विभागात मंगळवारी (दि. 12) वह्यावाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. …
Read More »रायगड जिल्ह्यातील 16 धरणे पूर्ण भरली
अलिबाग : प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून पडत असलेल्या दमदार पावसामुळे रायगड जिल्ह्यात धरणामध्ये पाणीसाठी वाढू लागला आहे. लघुपाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत असलेल्या 28 प्रकल्पांपैकी 16 धरणे पूर्ण भरली आहेत. जून महिन्यात अनियमित पाऊस झाला असला तरी जुलै महिन्यात पावसाचे प्रमाण चांगले आहे. 12 जुलैपर्यंत 918 मिलीमिटर पावसांची नोंद झाली आहे. जुलै …
Read More »जि. प., पं. स. आरक्षण सोडत तूर्त स्थगित
अलिबाग : प्रतिनिधी अतिवृष्टीमुळे होणार्या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर विभागीय कोकण आयुक्त आणि रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, हिंगोली व अमरावती जिल्हाधिकारी यांनी जिल्हा परिषदा व त्या अंतर्गत पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणूक 2022करिता आरक्षण सोडतीसाठी जाहीर केलेला आरक्षण सोडत कार्यक्रम पुढे ढकलण्याबाबत विनंती शासनाला केली होती. या नुषंगाने शासनाने आरक्षण सोडत कार्यक्रम तसेच …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper