Breaking News

महत्वाच्या बातम्या

नेरळमधील चौकांना फलक आणि वाहनांचा गराडा

कर्जत : बातमीदार नेरळ गावाला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे आणि त्याचा प्रयत्य नेरळ गावातील विविध चौकांना देण्यात आलेल्या नावांवरून येतो. नेरळ ग्रामपंचायतीने त्या सर्व महापुरुष, हुतात्मे, संत यांची नावे या चौकांना दिली आहेत आणि त्याच नेरळ ग्रामपंचायतीला आता त्याचा विसर पडला आहे. दरम्यान, नेरळ गावातील बहुतेक चौकांना जाहिरात फलक आणि वाहनांचा …

Read More »

एसटी कर्मचार्यांच्या आंदोलनाला भ्रष्टाचार निर्मूलन समितीचा पाठिंबा

पाली : प्रतिनिधी एसटी महामंडळ बरखास्त करून राज्य सरकारमध्ये  विलिनीकरण करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी एसटी महामंडळाच्या कर्मचार्‍यांनी पुकारलेल्या संप व आंदोलनाला भ्रष्टाचार निर्मूलन समिती रायगड यांच्याकडून पाठिंबा देण्यात आला. तसेच सुधागड पालीचे तहसीलदार दिलीप रायन्नावर यांच्यामार्फत मुख्यमंत्री व परिवहन मंत्र्यांना पाठिंब्याचे निवेदन देण्यात आले. या वेळी रायगड जिल्हाध्यक्ष प्रशांत …

Read More »

मिनीट्रेनला खासगीकरणाचा धोका

मध्य रेल्वे आणि रेल्वे बोर्ड कडून नेरळ- माथेरान-नेरळ मिनीट्रेन या जागतिक वारसा मिळावा म्हणून 2012 पासून युनोस्कोचा वारसा मिळविण्याच्या तयारीत असलेल्या मिनीट्रेनला जागतिक वारसा मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. मात्र मिनीट्रेनची ओळख असलेल्या नेरळ-माथेरान-नेरळ मिनीट्रेन ची प्रवासी वाहतूक सुरूच नाही. दुसरीकडे जागतिक वारसा बनण्याच्या तयारीत असलेल्या मिनीट्रेनची इंजिने आज प्रवासी वाहतुकीसाठी …

Read More »

अशांत महाराष्ट्र

पुरोगामी म्हणून ओळखला जाणारा महाराष्ट्र सध्या अनेक कारणांनी धूमसतोय. आधीच राज्यात शेतकर्‍यांचे प्रश्न, एसटी कर्मचार्‍यांचा संप यावर मार्ग काढण्यात आघाडी सरकारला अपयश आल्याने अस्वस्थता पसरलेली असताना आता हिंसाचाराचा वणवा पेटलाय. निमित्त झाले ते त्रिपुरातील कथित घटनेचे. यावरून महाराष्ट्रातील अनेक शहरांत मोर्चे निघाले आणि जे व्हायला नको होते तेच झाले. देशाच्या …

Read More »

गडचिरोलीत तब्बल 26 नक्षलवाद्यांचा खात्मा

गडचिरोली ः जिल्ह्यातील ग्यारापट्टीच्या जंगलात शनिवारी (दि. 13) झालेल्या चकमकीत महाराष्ट्र पोलिसांच्या सी-60 युनिटकडून 26 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला. या चकमकीत तीन जवान जखमी झाले आहेत. गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी ही माहिती दिली. जखमी जवानांना उपचारासाठी तत्काळ हेलिकॉप्टरद्वारे नागपूरला हलविण्यात आले आहे. कारवाईत ठार झालेल्या नक्षलवाद्यांची ओळख अद्याप …

Read More »

माथेरानमधील रोजगाराचे प्रश्न घेऊन भाजपचे शिष्टमंडळ राजधानी दिल्लीत

कर्जत ः बातमीदार माथेरान शहर आणि परिसराच्या विकासासाठी महत्त्वाचे प्रश्न घेऊन माथेरानमधील भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक दिल्लीत केंद्रीय मंत्र्यांच्या भेटीसाठी गेले होते. त्यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री, तसेच केंद्रीय भूपृष्ठमंत्री यांची भेट घेऊन माथेरानमधील रोजगाराचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्याची मागणी केली. भाजप नेते व जिल्ह्यातील उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी आणि …

Read More »

अण्णा हजारेंचा एसटी कर्मचार्‍यांच्या संपाला पाठिंबा

नगर ः वृत्तसंस्था राज्यात गेल्या 15 दिवसांपासून सुरू असलेल्या एसटी महामंडळातील कर्मचार्‍यांच्या संपाला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पाठिंबा दिला आहे. आपण प्रत्यक्ष संपात सहभागी होऊ शकत नसलो, तरी कर्मचार्‍यांच्या मागणीला आपला पाठिंबा असल्याचे अण्णांनी म्हटले. एसटी कर्मचार्‍यांच्या एका शिष्टमंडळाने राळेगणसिद्धी येथे जाऊन हजारे यांची भेट घेतली. त्या वेळी अण्णांनी …

Read More »

काँग्रेस नेत्याकडून पंतप्रधान मोदींचे कौतुक

बंगळुरू ः वृत्तसंस्था काँग्रेसचे अनेक नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करताना दिसत आहेत. पंतप्रधान मोदींचं कौतुक करणार्‍या काँग्रेस नेत्यांमध्ये आणखी एक नाव जोडले गेलेय ते म्हणजे कर्नाटकचे माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रमोद माधवराज यांचे. प्रमोद माधवराज यांनी पद्म पुरस्कारांबाबतचा ट्रेंड बदलल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे तोंडभरून कौतुक केले आहे. …

Read More »

शिक्षकांनी विद्यार्थ्यांमधील गती ओळखावी -कपिल पाटील; वसंत डावखरे स्मृती पुरस्काराचे वितरण

ठाणे ः प्रतिनिधी भारतरत्न सचिन तेंडुलकर, प्रसिद्ध धावपटू कविता राऊत यांची खेळातील गती शिक्षकांनी ओळखली होती. त्याच धर्तीवर शिक्षकांनी चांगला समाज घडवित असतानाच विद्यार्थ्यांमधील गती ओळखावी, असे आवाहन केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी शनिवारी (दि. 13) येथे केले. विधान परिषदेचे माजी उपसभापती दिवंगत वसंत डावखरे यांच्या स्मृत्यर्थ भाजप शिक्षक …

Read More »

अमरावतीत आज कडकडीत बंद; जमाव आक्रमक; पोलिसांचा लाठीचार्ज

अमरावती ः प्रतिनिधी राज्यात शुक्रवारी ठिकठिकाणी काढण्यात आलेल्या मोर्चांमधून हिंसाचार उसळल्याच्या निषेधार्थ अमरावतीत भाजपने शनिवारी (दि. 13) बंदची हाक दिली होती. या बंदला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या वेळी जनक्षोभ उसळून जमाव आक्रमक झाल्याचे दिसून आले. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज केला. त्रिपुरा राज्यात झालेल्या कथित अत्याचाराविरोधात अमरावतीत शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर 15 …

Read More »