Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

कर्जतचे चित्रकार सुनील परदेशींना ’सिग्नेचर मेंबर’ चा बहुमान

कर्जत : प्रतिनिधी कर्जत येथील चित्रकार सुनील परदेशी यांची न्यूयॉर्कमधील पेस्टल सोसायटी ऑफ अमेरिका या आंतरराष्ट्रीय कला-संस्थेकडून ’सिग्नेचर मेंबर’ म्हणून निवड करण्यात आली आहे. हा सन्मान मिळवणारे ते भारतातील दुसरे चित्रकार ठरले आहेत. पेस्टल सोसायटी ऑफ अमेरिका या संस्थेची स्थापना फ्लोरा बी गिफुनी यांनी 1972मध्ये केली. ही संस्था अमेरिकेतील सर्वात जुनी …

Read More »

आज ऑनलाइन रोजगार मेळाव्याचे आयोजन

इच्छुकांनी लाभ घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन अलिबाग : जिमाका स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्ताने रायगड जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत जिल्ह्यातील कुशल व अकुशल उमेदवारांसाठी गुरुवारी (दि. 30) सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत ऑनलाइन रोजगार मेळावा आयोजन करण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यातील ज्या उमेदवारांनी https://www.rojgar.mahaswayam.gov.in या कौशल्य …

Read More »

शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी जिल्ह्यात मिशन झिरो ड्रॉपआऊट

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील शाळाबाह्य, अनियमित आणि स्थलांतरित मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभागाकडून 5 ते 20 जुलै या कालावधीत मिशन झिरो ड्रॉपआऊट राबवले जाणार आहे. या अंतर्गत शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेऊन शाळांतील विद्यार्थ्यांची गळती शून्यावर आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण …

Read More »

निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी हताश

पोलादपुरात ऊन-पावसाचा खेळ कायम पोलादपूर : प्रतिनिधी तालुक्यात गेल्या दहा दिवसांपासून पाऊस एक-दोन दिवसाआड हजेरी लावत आहे. ऊन- पावसाच्या या खेळात भाताच्या रोपांवर विपरीत परिणाम होण्याची भीती निर्माण झाल्याने काही भागातील शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. निसर्गाच्या या लहरीपणामुळे भातशेतीचे नुकसान होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गेल्या 10-15 दिवसांपासून पोलादपूर तालुक्यात पावसाची …

Read More »

राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे डिझेल परतावा रखडला

लिओ कोलासो यांचा आरोप; मच्छीमार संघर्ष यात्रेचे मुरूडमध्ये जोरदार स्वागत मुरूड : प्रतिनिधी कोकण किनारपट्टीचे डिझेल परताव्याचे सुमारे 450 कोटी रुपये थकीत आहेत. राज्य सरकारच्या अशा नाकर्तेपणामुळे डिझेल परतावा रखडल्याचा आरोप महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष लिओ कोलासो यांनी मंगळवारी (दि. 28) मुरूड येथील जाहीर सभेत केला.मच्छीमारांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी …

Read More »

आमदार महेंद्र दळवी समर्थकांचे अलिबागमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन

अलिबाग : प्रतिनिधी मंत्री एकनाथ शिंदे गटातील शिवसेना बंडखोर आमदार महेंद्र दळवी यांच्या समर्थनार्थ मंगळवारी (दि. 28) अलिबागमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या मेळाव्याद्वारे आमदार दळवी यांच्या समर्थकांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. अलिबागमधील चेंढरे येथे झालेल्या या मेळाव्यात ‘गर्व से कहो हम हिंदू है’, ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा …

Read More »

उकरूळ गावात कृषी संजीवनी सप्ताह; शेतकर्‍यांचा प्रतिसाद

कर्जत : बातमीदार एसआरटी, चारसूत्री लागवड पद्धत तसेच ड्रमसिडरसारख्या नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेतकर्‍यांनी भात पिकाचे उत्पादन वाढवावे, असे आवाहन कर्जत तालुका कृषी अधिकारी शीतल शेवाळे यांनी उकरूळ येथे केले.  कृषी संजीवनी सप्ताहाचे निमिताने कर्जत तालुक्यातील उकरूळ ग्रामपंचायत आणि तालुका कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने गावातील मंदिरात शेतकर्‍यांसाठी प्रशिक्षण शिबिर …

Read More »

कर्जतमध्ये असंघटित कामगारांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर

कर्जत : बातमीदार राजर्षी शाहू महाराज जयंती दिनानिमित्त आधार असंघटीत जनरल कामगार युनियनच्या वतीने रविवारी (दि. 26) कर्जतमधील रायगड जिल्हा परिषदेच्या कन्या शाळेत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात नामवंत डॉक्टरांनी असंघटित कामगारांची आरोग्य तपासणी केली. राजर्षी शाहू महाराज जयंतीचे औचित्य साधून आधार असंघटीत जनरल कामगार …

Read More »

पोलादपुरातील रानबाजिरे धरणाची साठवण क्षमता वाढण्यासाठी बॅकवॉटर केले टप्प्याटप्प्याने रिकामे

वाळू वाहून गेल्याने अवैध उपसा करणार्‍यांची धांदल पोलादपूर : प्रतिनिधी तालुक्यातील रानबाजिरे धरण गेल्या वर्षी ओव्हरफ्लो होऊन वाहू लागले होते. या पार्श्वभूमीवर हे धरण उशिराने भरावे, यासाठी गेल्या महिन्यापासून धरणातील पाणी सावित्रीत सोडले जात आहे. त्यामुळे नदीपात्रातील  वाळू वाहून गेल्याने अवैध वाळू उपसा करणार्‍यांची धांदल उडाल्याचे दिसून येत आहे. पोलादपूर …

Read More »

जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून 10 गावांचा कायापालट करणार -आनंद राणे

कर्जत : प्रतिनिधी जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने येत्या तीन वर्षात राज्यातील दहा गावांचा कायापालट करण्यात येईल, अशी ग्वाही जीवनविद्या मिशनचे विश्वस्त आनंद राणे यांनी भिवपुरी (ता. कर्जत) येथे दिली. कर्जत तालुक्यातील वैजनाथ परिसरात असलेल्या सद्गुरू वामनराव पै यांच्या जीवनविद्या मिशनच्या वतीने भिवपुरी गावामध्ये ग्रामसमृध्दी अभियान राबविण्यात येणार आहे. …

Read More »