Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

मुंबई-पुणे महामार्गावर कारला अपघात

पाच जण गंभीर जखमी खोपोली : प्रतिनिधी मुंबई-पुणे महामार्गावर माडप बोगद्याजवळ, पुणे दिशेच्या लेनवर पुढे जाणार्‍या टँकरला मागून सीलेरिया कारने जोरदार धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात कारमधील पाच जण जखमी झाले. जखमीत एका महिलेचा समावेश आहे. सर्व जखमींना लोकमान्य पुणे येथे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मुंबईहून पुणेकडे …

Read More »

सुधागड तहसील कार्यालयात महिलांना सुरक्षा व कायदेविषयक मार्गदर्शन

पाली : प्रतिनिधी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांच्या मार्गदर्शनाखाली पाली पोलिसांकडून महिलांना कायदेविषयक मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी नायब तहसीलदार वैशाली काकडे, महिला पोलीस कर्मचारी मनीषा लांगी, रेखा म्हात्रे, स्वप्नाली म्हात्रे या प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या. महिलांची सुरक्षा व सक्षमीकरणावर प्रत्येक विभागात भर दिला जातोय. महिला सुरक्षेसंदर्भात …

Read More »

धाटाव ग्रामस्थांचे ग्रामपंचायतीसमोर धरणे आंदोलन

धाटाव : प्रतिनिधी रोहा तालुक्यातील धाटाव येथील ग्रामस्थांनी शनिवारी (दि.1) ग्रामपंचायत कार्यालयासमोर एक दिवसीय ‘जबाब दो‘ धरणे आंदोलन केले. अनेक ग्रामस्थ या आंदोलनात सहभागी झाले होते. धाटाव ग्रामपंचायतीच्या 14 डिसेंबर रोजी झालेल्या ग्रामसभेत प्रलंबित प्रश्नावर चर्चा न करता सरपंच व सचिव (ग्रामसेवक) यांनी काढता पाय घेतला होता. त्यामुळे ग्रामस्थ चांगलेच …

Read More »

कोरोनाच्या नियमांत सरत्या वर्षाला निरोप

रायगडकरांनी केले 2022चे उत्साहात स्वागत अलिबाग : प्रतिनिधी 2021चे स्वागत जोरात करता आले नाही, त्यामुळे 2022च्या स्वागताची तयारी करणार्‍या रायगडकरांच्या नियोजनावर अखेर पाणी पडले. कोरोनाच्या ओमायक्रॉनने विळखा घट्ट केल्याने नियमांचे बंधन आले परिणामी रायगडकर आणि मुंबई-पुण्यातील पर्यटकांना अगदी साधेपणाने सरत्या वर्षाला निरोप द्यावा लागला, मात्र 2022चे स्वागत फटाक्यांची आतषबाजी करून …

Read More »

‘थर्टी फर्स्ट’ आणि नववर्ष स्वागतासाठी रायगड हाऊसफुल्ल!

प्रशासन, पोलीस यंत्रणाही सज्ज अलिबाग : प्रतिनिधी 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी रोजीच्या नववर्ष स्वागतासाठी रायगड जिल्ह्यातील हॉटेल्स आणि कॉटेजेस फुल्ल झाली आहेत. दुसरीकडे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीसही सज्ज झाले आहेत. बेकायदा पाटर्यांवर पोलिसांची करडी नजर राहणार असून नियमांचा भंग करणार्‍यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. अलिकडच्या काळात गोव्यापाठोपाठ …

Read More »

गणपतीवाडी ते आंबेगाव रस्त्यावर दुभाजक उभारावेत -बंडू खंडागळे

पेण : प्रतिनिधी तालुक्यातील गणपतीवाडी बायपास ते आंबेगाव रस्त्यावर लहान-मोठे अपघात होत असून याठिकाणी लवकरात लवकर दुभाजक बसवावेत अशी मागणी भाजप जिल्हा चिटणीस बंडू खंडागळे यांनी शासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे. पेण-खोपोली बायपास रस्ता हा एक्सप्रेस हायवे प्रमाणे बनल्याने या रस्त्यावरून अनेक वाहने जात असतात. यामध्ये चारचाकी, तीनचाकी प्रवासी रिक्षांचाही समावेश …

Read More »

रोह्यात विनामास्क वावरणार्‍यांवर कारवाई

रोहे : प्रतिनिधी कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असून ओमायक्रॉनचे रुग्ण वाढू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर रोहा नगर परिषद व पोलीस विभागाकडून गुरुवारी (दि. 30) बाजारपेठेत विनामास्क वावरणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. कोरोना प्रादुभाव रोखण्यासाठी शासनाने कोरोना रोखण्यासाठी मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत. सॅनिटायझरचा वापर करा, मास्क वापरा, गर्दी करु …

Read More »

पोलिसांकडे चांगल्या भावनेतून पहा -संजय भावसार; खोपोलीत पोलीस कर्मचार्‍यांचा सन्मान

खोपोली ़: प्रतिनिधी अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षण संघटनेच्या  वतीने उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या पोलीस कर्मचार्‍यांचा नुकताच खोपोलीतील ब्राम्हण सभागृहात सन्मान करण्यात आला. पोलिसांकडे सकारत्मक भावनेतून पाहिल्यास त्याच्या वेदनांची जाणीव होईल, असे मत संघटनेचे राज्याचे अध्यक्ष संजय भावसार यांनी व्यक्त केले. खोपोली पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांच्या हस्ते गणेश पूजन करण्यात …

Read More »

पेण तालुक्यातील 27 गावे आणि 39 वाड्यांवर पाणीटंचाईचे संकट; शहापाडा धरणात फक्त 15 दिवसांचा साठा

पेण : प्रतिनिधी उत्तर शहापाडा योजनेतील 27 गावे, 39 वाड्यांना पाणीपुरवठा करणार्‍या शहापाड़ा धरणाची पाणीपातळी खालावली असून जेमतेम 15 दिवस पुरेल एवढा पाणीसाठा धरणात शिल्लक आहे. सध्या धरणात मृत गाळयुक्त पाणी शिल्लक असून तेच पाणी पिण्यासाठी सोडले जाते.  सध्या सर्दी, खोकला या आजारांनी नागरिक त्रस्त असताना गाळमिश्रित पाणी सोडले जात …

Read More »

नेरळमध्ये हुतात्म्यांना अभिवादन

कर्जत : बातमीदार हुतात्मा भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांच्यासह गोमाजी पाटील यांनी शांत असलेल्या माणसाला जगण्याची आणि प्रसंगी आक्रमक होण्याची शिकवण दिली. त्यामुळेच माझ्याकडून स्वतःचा जीव धोक्यात घालून दुसर्‍याचे प्राण वाचविण्याची हिम्मत निर्माण झाली, असे प्रतिपादन शूरवीर मयूर शेळके यांनी गुरुवारी (दि. 30) नेरळ येथे केले. नेरळ येथील कोतवालवाडी …

Read More »