Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

पेणमधील खारबंदिस्ती पूर्ववत करण्याची शेतकर्‍यांची मागणी

पाली ः प्रतिनिधी तालुक्यातील खारमाचेला, खारचिर्बी, व जुईअब्बास विभागातील साधारणतः 2700 एकर शेतीत खारे पाणी शिरून सुपीक शेती नापीक होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे खारलँड विभागाने शेतीचा बचाव करणारी खारबंदिस्ती खारबंदिस्ती पूर्ववत करावी, अशी मागणी खारमाचेला विभागातील शेकडो शेतकर्‍यांनी केली आहे. या संदर्भात खारलँड विभागाला सोमवारी (दि. 26) निवेदन देण्यात आले. …

Read More »

खोपोली शहरातील नागरी समस्या सोडवा

भाजप आक्रमक; मुख्याधिकार्‍यांना निवेदन खोपोली ः प्रतिनिधी खोपोली शहरातील विविध नागरी समस्यांबाबत भारतीय जनता पक्ष शहर आक्रमक झाली असून, शहराध्यक्ष इंदरमल खंडेलवाल यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकार्‍यांनी मुख्याधिकारी अनुप दुरे यांना निवेदन देण्यात आले. या समस्या तातडीने सोडविण्याची मागणीही या वेळी करण्यात आली. शहरातील पाणी समस्या, स्वच्छता, बंद नाट्यगृह, उद्यानांची दुर्दशा, मुख्य …

Read More »

सुषमा अंधारेंविरोधात श्रीवर्धनमध्ये निषेध रॅली

श्रीवर्धन ः प्रतिनिधी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी हिंदू देवतांबद्दल तसेच संतांबद्दल केलेल्या अपमानास्पद वक्तव्याविरोधात त्यांचा हिंदू एकता मंचातर्फे श्रीवर्धनमध्ये निषेध रॅली काढण्यात आली. त्यानंतर त्यांच्याविरूद्ध योग्य कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करणारे निवेदनही पोलीस ठाण्यात देण्यात आले. या निषेध रॅलीमध्ये मोठ्या संख्येने वारकरी हातामध्ये टाळ, चिपळ्या, भगव्या पताका, …

Read More »

अंबा नदी होतेय दूषित

प्लास्टिक पिशव्यांसह निर्माल्याचा खच पाली ः प्रतिनिधी अंबा नदी सुधागडवासियांबरोबरच पालीकरांची जीवनदायिनी म्हणून ओळखली जाते. संपूर्ण पालीसह बाजूच्या गावांना अंबा नदीतून पाणी पुरवठा होतो, मात्र सध्या या नदीला प्लास्टिकच्या पिशवीतून टाकलेल्या निर्माल्याच्या कचर्‍याने घेरले आहे. त्यामुळे नदीचे पाणी दूषित होत आहे. घरात देवपुजेसाठी वापरलेली फुले, हार दुसर्‍या दिवशी शिळे होतात. …

Read More »

खोपोलीजवळ टँकर वेल्डिंगदरम्यान स्फोट; दोन जण गंभीर

खोपोली, खालापूर : प्रतिनिधी मुंबई-पुणे महामार्गावर रिकाम्या पेट्रोल टँकरला वेल्डिंग करीत असताना स्फोट होऊन दोन जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी (दि. 27) दुपारी 1.30च्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार मुंबई-पुणे महामार्गावर हाळ गावच्या हद्दीत सागर हॉटेलसमोरील गॅरेजमध्ये एका रिकाम्या पेट्रोल टँकरचे (एमएच 49 बीएफ 7570) वेल्डिंग काम सुरू होते. या वेळी …

Read More »

अलिबाग शहापूर येथे उधाणाचा तडाखा

22 घरांसह 300 एकर शेतीला फटका अलिबाग : प्रतिनिधी तालुक्यातील शहापूर येथे सोमवारी (दि. 26) पहाटे 3 वाजता उधाणाचे पाणी घरात शिरल्याची घटना घडली. यामुळे 22 घरांसह 300 एकर शेतीला या उधाणाचा तडाखा बसला. सोमवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास शहापूर गावाला उधाणाच्या पाण्याने वेढा दिला. गाढ झोपेत असलेल्या गावकर्‍यांची यामुळे …

Read More »

आगरकोट किल्ल्याला गतवैभव मिळणार!

केंद्रीय पुरातत्व विभागाकडून प्रवेशद्वाराची डागडुजी रेवदंडा : प्रतिनिधी केंद्रीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या पुढाकाराने रेवदंडा आगरकोट किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या (चौकोनी बुरूज) डागडुजीचे काम सुरू झाल्याने इतिहासप्रेमींनी समाधान व्यक्त केले. रेवदंडा आगरकोट किल्ला ढासळत असल्याने याकडे इतिहासप्रेमींनी अनेक वेळा केंद्रीय पुरातत्व खात्याचे लक्ष वेधले होते. अखेर केंद्रीय पुरातत्व विभागाच्या वतीने रेवदंडा आगरकोट किल्ल्याच्या …

Read More »

नववर्षाच्या स्वागतासाठी रायगड पोलिसांची फौज तैनात

अलिबाग : प्रतिनिधी सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी तसेच नववर्षाच्या स्वागतासाठी  रायगड जिल्ह्यात मोठ्या संख्येने पर्यटक येण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रायगड पोलीस सज्ज झाले आहेत. जिल्ह्यात पोलीस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली आहे. वाहतूक नियंत्रणासाठी 86 ठिकाणी 90 वाहतूक पोलीस कर्मचारी तैनात केले जाणार आहेत. अतिउत्साही पर्यटकांवर, मद्यपान …

Read More »

अतिउत्साही पर्यटकांवर पोलिसांचा वॉच; रायगड जिल्ह्यात बंदोबस्तात मोठी वाढ

अलिबाग : प्रतिनिधी सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी तसेच नववर्षाच्या स्वागतासाठी  रायगड जिल्ह्यात मोठ्या संख्येनी पर्यटक येण्याची शक्यता आहे. त्यामुळे वहातुक कोंडी टाळण्यासाठी रायगड पोलीस सज्ज झाले आहेत. जिल्ह्यात पोलीस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली आहे. वाहतुक नियंत्रणासाठी 86 ठिकाणी 90 वाहतूक पोलीस कर्मचारी तैनात केले जाणार आहेत. अतिउत्साही पर्यटकांवर,  मद्यपान …

Read More »

महाडमध्ये राजमाता जिजाऊ साहित्य संमेलन

महाड : प्रतिनिधी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने महाड मध्ये राजमाता जिजाऊ राज्यस्तरीय साहित्य संमेलन रविवारी (दि. 25) महाडमध्ये झाले. या वेळी बोलताना संमेलनाध्यक्ष सुरेश मेहता यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात इंग्रजी भाषा काळाची गरज असली तरी इंग्रजी अनिवार्य असू नये असे सांगून मराठी भाषेजवळ असलेली आपली नाळ तोडू नये, …

Read More »