Ramprahar News Team

अमरावतीमध्ये नदीत बोट उलटून 11 जण बुडाले; तीन जणांचे मृतदेह हाती

अमरावती : प्रतिनिधीअमरावती जिल्ह्यातील वरूड तालुक्यातील श्री क्षेत्र झुंज येथे वर्धा नदीच्या पात्रात बोट उलटून 11 जण बुडाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि. 15) सकाळी घडली. आतापर्यंत नावाड्यासह तिघांचे मृतदेह सापडले असून इतर लोकांचा शोध घेऊन उशिरापर्यंत बचावकार्य सुरू होते. गाडेगाव येथील मटरे कुटुंबातील दशक्रिया विधीला त्यांचे नातेवाईक सोमवारी तेथे पोहचले …

Read More »

आघाडी सरकारविरोधात आज आंदोलन; ओबीसी आरक्षणावरून भाजपची आक्रमक भूमिका, सर्वोच्च न्यायालयात वकील का दिला नाही? खुलासा करण्याची मागणी

पनवेल : रामप्रहर वृत्त ओबीसी समाजाचा विश्वासघात करून ओबीसी आरक्षण घालविणार्‍या आघाडी सरकार विरोधात भारतीय जनता पक्षातर्फे बुधवारी (दि. 15) राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात उत्तर रायगड जिल्हाही सहभागी होणार आहे, अशी घोषणा भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष प्रशांत ठाकूर यांनी केली. आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाची बाजू …

Read More »

राज्य सरकारची सावकारासारखी वसुली -फडणवीस

मुंबई : एकीकडे कोरोनामुळे शेतकरी असो की सामान्य नागरिक तो अडचणीत आहे आणि तो अडचणीत असताना त्यांना मदत करण्याच्या ऐवजी, त्याच्याकडून जबरदस्ती वसुली या सरकारला करायची आहे. सावकारासारखी वसुली करायची आहे. म्हणून हे सगळे नाटक सुरू आहे, अशी टीका महाविकास आघाडी सरकारवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (दि. 14) …

Read More »

न्यायालयाच्या आदेशानुसार मी अधीक्षक कार्यालयात उपस्थित -नारायण राणे

अलिबाग : प्रतिनिधीमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधानप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सोमवारी (दि. 13) रायगड पोलीस अधीक्षक कार्यालयात उपस्थिती लावली. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी 23 ऑगस्टला महाड येथील पत्रकार परिषदेत केलेल्या आक्षेपार्ह विधान प्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांना महाड न्यायालयात …

Read More »

कोकणासह सर्वत्र पावसाचा जोर कायम

मुंबई : प्रतिनिधी राज्यात काही दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. त्यानुसार कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाने चांगली हजेरी लावली आहे. रायगडमध्ये रविवारी (दि. 12) रात्रीपासून पाऊस सुरू आहे. कोयना, जायकवाडीसारख्या मोठ्या धरणांमधून विसर्ग पुन्हा सुरू करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेच्या तालुक्यांमध्ये घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस बरसत …

Read More »

कुष्ठरुग्ण, दिव्यांगांसाठी लसीकरण मोहीम

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिकेच्या वतीने आणि नगरसेविका अ‍ॅड. वृषाली वाघमारे यांच्या पुढाकाराने कुष्ठरुग्ण आणि दिव्यांगांसाठी विषेश लसीकरण मोहीम सोमवारी (दि. 13) राबविण्यात आली. या मोहिमेचा शुभारंभ भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या उपस्थितीत झाला. महानगरपालिका आणि भाजप नगरसेवकांच्या माध्यमातून कोरोना …

Read More »

हसन मुश्रीफांनी केला 127 कोटींचा घोटाळा; माजी खासदार किरीट सोमय्या यांची चौकशीची मागणी

मुंबई : प्रतिनिधी महाआघाडी सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मनी लाँडरिंग, बेनामी व्यवहारांद्वारे 127 कोटींचा घोटाळा केला असल्याचा आरोप भाजप नेते माजी खासदार डॉ. किरीट सोमय्या यांनी सोमवारी (दि. 13) पत्रकार परिषदेत केला. याबाबत सोमय्या यांनी हसन मुश्रीफ, मुश्रीफ यांची पत्नी आणि त्यांचे …

Read More »

संसद टीव्हीचे उद्या पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण

नवी दिल्ली : संसद टीव्ही या चॅनेलचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी (दि. 15 सप्टेंबर) संसद भवनात आयोजित कार्यक्रमात होणार आहे. या लोकार्पण सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती व्यकंय्या नायडू, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला उपस्थित राहणार आहेत. संसदेच्या राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही सभागृहांचे कामकाज दाखवणार्‍या लोकसभा टीव्ही …

Read More »

रायगडसह राज्यातील पाच जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

मुंबई : बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने महाराष्ट्रात पुढील तीन ते चार दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केली आहे. महाराष्ट्र, गुजरात, गोवा आणि कोकण, मध्य प्रदेश, छत्तीसगढ आणि ओडिशात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. जिल्ह्यांचा विचार करता रायगड, पालघर, …

Read More »

सोनपावलांनी झाले गौराईचे आगमन

अलिबाग ः प्रतिनिधी तीन दिवसांपूर्वी घरोघरी गणेशाचे आगमन झाले होते. त्यानंतर रविवारी (दि. 11) तीन दिवसांची पाहुणी असलेल्या गौराईचे घरोघरी आगमन झाले. गौरी आगमनामुळे महिलावर्गात उत्साहाचे वातावरण आहे. रविवारी दुपारनंतर मुली आणि महिला गौरी आणण्यासाठी गेल्या. कोकणात तेरड्याच्या गौरी आणल्या जातात. परंपरेनुसार माळरानावरून तेरड्याच्या गौरी घरोघरी वाजतगाजत आणण्यात आल्या. त्यानंतर …

Read More »