Ramprahar News Team

मुरूड तहसीलदारांसह दोन शिपाई लाचप्रकरणी जाळ्यात

मुरूड : प्रतिनिधी नियंत्रित सत्ता प्रकार असलेल्या जमिनीचा शेरा कमी करण्यासाठी 15 हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी  मुरूडचे तहसीलदार गमन गावीत यांच्यासह दोन शिपाई यांना नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले. तक्रारदार यशवंत पाटील यांना मुरूड तहसील  कार्यालयाकडून नियंत्रित सत्ता प्रकार असलेल्या जमिनीचा शेरा कमी करण्यासाठी दाखला आवश्यक होता. …

Read More »

विद्यार्थ्यांना रेल्वे प्रवासाचे पास द्यावेत; कर्जत भाजप युवा मोर्चाची मागणी

कर्जत : बातमीदार माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षांचे निकाल लागले असून, पुढील शिक्षणासाठी महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळावा म्हणून कर्जतमधील विद्यार्थ्यांना ठाणे आणि खोपोलीपर्यंत, तसेच नवी मुंबईत जावे लागत आहे. या विद्यार्थ्यांना रेल्वेने जाण्याची परवानगी आणि उपनगरीय लोकलचे पासेस द्यावेत, अशी मागणी कर्जत भाजप युवा मोर्चाने येथील स्टेशन मास्तरांकडे निवेदनाद्वारे केली आहे. …

Read More »

पालीत शनिवारी रानभाजी महोत्सव

पाली : प्रतिनिधी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) तर्फे शनिवारी (दि. 14) सकाळी 11 वाजता पाली (ता. सुधागड) येथील भक्तनिवास शेजारील सभागृहात रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. स्थानिक विक्रेत्यांचा रोजगार वाढून रानभाज्यांना ओळख आणि बाजार मिळावा, या हेतूने हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात रानभाज्यांची विक्री करण्यात …

Read More »

ऑनलाइन लसीकरण नोंदणीमुळे आदिवासींची होतेय परवड

कर्जत : प्रतिनिधी कोविशिल्ड लस घेण्यासाठी ऑनलाइन नोंदणी करणे गरजेचे आहे. कर्जत हा आदिवासीबहुल तालुका असल्याने अर्ध्यापेक्षा अधिक लोकांकडे मोबाइल नाहीत आणि नेटवर्क बाबतीत सर्वत्र बोंबाबोंब आहे. यावर शासनाने काहीतरी मार्ग काढावा, अशी मागणी या परिसरातून होत आहे. आदिवासी भागात एकमेव असलेल्या कशेळे (ता. कर्जत) ग्रामीण रुग्णालयात आजूबाजूच्या 50 गावांतील …

Read More »

श्रीवर्धनमध्ये डासांचा प्रादूर्भाव वाढला; नागरिक त्रस्त, नगर परिषदेचे अक्षम्य दुर्लक्ष

श्रीवर्धन : प्रतिनिधी शहरामध्ये मागील काही दिवसांपासून डासांचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून, श्रीवर्धन नगर परिषदेकडून डास प्रतिबंधक उपाययोजना करण्यात येत नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत. श्रीवर्धन शहरातील गटारे उघडी असल्याने डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणावर होत आहे. गाड्यांचे टायर, रिकामे पत्र्याचे डब्बे, रिकाम्या करवंट्या यामध्ये पावसाचे पाणी साठून त्यामध्ये डासांची …

Read More »

रायगडकरांना जबाबदारीने वागावे लागेल

कोरोना रुग्ण दर वाढीच्या बाबतीत एप्रिल 2021 मध्ये रायगड जिल्हा राज्यात आघाडीवर होता. एक काळ असा होता की रायगड जिल्ह्यात रुग्ण वाढीचा दर 30 टक्क्यांपेक्षाही जास्त होता. आता हा दर 2.52 इतका कमी आला आहे. त्यामुळे रायगडमधील सर्व निर्बंध उठणार आहेत. ही रायगडकरांसाठी दिलासादायक बाब आहे. रायगडचा रुग्ण वाढीचा दर …

Read More »

भूलथापांना बळी पडू नका; सिडकोचे आवाहन

नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा सिडको महामंडळाच्या महागृहनिर्माण योजना 2018-19 यशस्वी अर्जदारांना 1 जुलै 2021 पासून घरांचा (सदनिकांचा) ताबा देण्याचा निर्णय सिडकोकडून यापूर्वीच घेण्यात आला असून या संदर्भात संबंधित अर्जदारांनी कोणत्याही भूलथापांना किंवा आमिषांना बळी पडू नये, असे आवाहन सिडकोकडून करण्यात आले आहे. घरांचा ताबा देण्यासाठी सिडकोने कोणत्याही मध्यस्थ संस्था, …

Read More »

सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते सार्वजनिक सभागृहाचे लोकार्पण

पनवेल : रामप्रहर वृत्त आपल्या नगरसेवक निधीतुन विकास कामांना सातत्याने प्राधान्य देत प्रभागात नवनवीन सुधारणा घडवून आणणारे पनवेल महापालिकेच्या प्रभाग क्र. 17चे भाजपचे नगरसेवक प्रकाश बिनेदार यांनी नगरसेवक निधीतुन शिवाजी नगर, पनवेल एस. टी. डेपोच्या बाजुला, पनवेल रेल्वे स्टेशन रोड या ठिकाणी उभारलेल्या सार्वजनिक सभागृहाचे तसेच बोअर वेलचे (हातपंप विहीर) …

Read More »

महाडमधील शेतकरी, व्यापार्‍यांना विमा रकमेच्या 50 टक्के रक्कम तातडीने द्यावी; विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांची अर्थमंत्र्यांकडे मागणी

मुंबई : प्रतिनिधी रायगड तसेच महाड जिल्ह्यामधील जलप्रलयामुळे उद्भवलेल्या पूरपरिस्थितीत येथील शेती आणि व्यापार्‍यांचे प्रचंड नुकसान झाले. महाड शहर आणि तालुक्यांमध्ये ही आपत्ती फार मोठ्या प्रमाणावर भेडसावली. त्यामुळे येथील शेतकरी व व्यापर्‍यांना दिलासा देण्यासाठी विमा रकमेच्या 50 टक्के रक्कम तातडीने त्यांना देण्यात यावी. तसेच व्यापारी व शेतकर्‍यांना कमी व्याजदराने कर्ज …

Read More »

मराठा आरक्षणाबाबत ‘मविआ’ची टाळाटाळ; भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा घणाघात, अशोक चव्हाणांना दिले आव्हान

मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारचे मंत्री अशोक चव्हाणांना आव्हान दिले आहे. ते म्हणाले की, आरक्षणाविषयी राज्याच्या अधिकारातील कामे पूर्ण करण्याऐवजी सतत केंद्रावर आरोप करता. राज्य सरकार नेहमी काही तरी करून आरक्षण टाळण्याचा प्रयत्न करताना दिसते. त्यामुळेच तुम्हाला मराठा समाजाला आरक्षण द्यायचे आहे …

Read More »