Breaking News

Ramprahar News Team

पाच दिवसांच्या हुलकावणीनंतर रायगडात पावसाची दमदार हजेरी

अलिबाग : प्रतिनिधी हवामान खात्याच्या अंदाजाला पाच दिवस हुलकावणी देणार्‍या पावसाने बुधवारी (दि. 16) रायगड जिल्ह्यात दमदार हजेरी लावली. जिल्ह्याच्या काही भागात पावसाची संततधार सुरू होती. काही ठिकाणी अधूनमधून जोरदार सरी कोसळत होत्या. दुपारनंतर मात्र पावसाचा जोर कमी झाल्याचे दिसून आले. मंगळवारी रात्रीपासूनच पावसाला सुरूवात झाली होती. अधूनमधून जोरदार सरी …

Read More »

खोपोलीत कोरोना रुग्णसंख्या स्थिर; औद्योगिक क्षेत्रासह जनजीवन होतेय सामान्य

खोपोली : प्रतिनिधी मागील दहा दिवसांपासून खोपोली नगरपालिका क्षेत्रात दैनंदिन नवीन कोरोना रुग्णसंख्या पंधराच्या खाली येऊन स्थिरावली आहे. एका बाजूला चाचण्या वाढल्या असून, नवीन रुग्णसंख्या स्थिर असल्याने नागरिक व प्रशासनाला दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे शहरातील दैनंदिन व्यवहार व औद्योगिक क्षेत्रातील कामकाजही नियमांचे पालन करून पूर्ण क्षमतेने सामान्यपणे सुरू झाले आहे. …

Read More »

सुधागडातील आदिवासींच्या जमिनी धनदांडग्यांनी लाटल्या; पाच वर्षांतील व्यवहारांची होणार चौकशी, माहिती अधिकार कार्यकर्ते विजय यादव यांच्या पाठपुराव्याला यश

पाली : प्रतिनिधी आदिवासींच्या जमिनी खरेदी व विक्री व्यवहारांची चौकशी करण्याचे आदेश नुकतेच सह जिल्हा निबंधक व मुद्रांक जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. त्यानुसार  सुधागड तालुक्यात गेल्या पाच वर्षात झालेल्या आदिवासींच्या जमिनीच्या व्यवहारांची चौकशी होणार आहे. सुधागड तालुक्यात आदिवासी बांधवांच्या जमिनी आहेत. मात्र या जमिनी बिगर आदिवासींना कवडीमोल किंमतीला विकल्या जात …

Read More »

कोरोनाविषयक निर्बंधातून रायगडला दिलासा मिळण्याची शक्यता कमीच

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्याचा कोरोना संक्रमण दर हळूहळू कमी होत आहे. मात्र अजूनही हा दर 10 टक्यांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे करोनाविषयक निर्बंधांतून रायगड जिल्ह्याला फारसा दिलासा मिळण्याची शक्यता नाही.  रायगड जिल्ह्यात एक हजार 500 रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील 728 जणांवर जनरल वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत. …

Read More »

राजमाता जिजाबाई हिंदवी स्वराज्याची प्रेरणा

राजमाता जिजाबाई यांची 17 जून रोजी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त लेख… परकीय आक्रमणामुळे प्रजा नाडली-पिडली गेली होती, परंतु लखुजी जाधवांची कन्या जिजाबाई अत्यंत बाणेदार व स्वाभिमानी स्त्री होती. राजघराण्याचा वारसा असल्याने आपल्या सासरी तसेच माहेरी त्यांनी अनेक लढाया पाहिल्या होत्या, लढाईच्या रोमहर्षक कथा ऐकल्या होत्या. मराठी माणसाला, महाराष्ट्राला  संकटातून वाचविण्याचा त्यांनी …

Read More »

पोलादपूरच्या हिरवाईची पर्यटकांना साद

पोलादपूर तालुक्यामधील सह्याद्रीच्या पर्वतरांगांतील निसर्गसौंदर्याची अपरिमित उधळण पाहण्यासाठी येथील हिरवाईने आता पर्यटकांना साद घालण्यास सुरूवात केली आहे. येथील ’सोनपंखी’ कार निसर्गकवी कै. वसंत पालकर यांनी, माझं सुंदर कोकण। जणू सोनियाची खाण॥फेडी डोळ्यांचं पारणं। लाल मातीचं कोंदणं॥ गिरी कंदरी चालते। नद्या ओढ्यांचं गायन॥आसमंती सागराचे। घुमे स्वप्नील गुंजन॥ अशा काव्यपंक्तींद्वारे येथील निसर्गसौंदर्याचे …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम; अल्पसंख्याक समाजाला धान्याचे वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित उपक्रमांतर्गत श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि पनवेल भाजपच्या वतीने अल्पसंख्याक समुदायामध्ये धान्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमात पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 14मधील अल्पसंख्याक समुदायामध्ये जवळपास 1150 धान्याचे किट वितरीत करण्यात आले. याबद्दल नगरसेवक …

Read More »

सिडकोतर्फे नैना प्रकल्पाच्या जमीन मालकांना आवाहन

नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा सिडको महामंडळातर्फे नवी मुंबई विमानतळाभोवतालच्या 371 चौ.कि.मी. च्या प्रदेशात साकारण्यात येत असलेल्या, नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र अर्थात नैना प्रकल्पाची अंमलबजावणी जलद गतीने होत असून प्रकल्पाकरिता प्रस्तावित 11 नगर रचना योजनांपैकी क्र. 1 ते 3 या योजनांवर विविध स्तरांवर कार्यावाही सुरू आहे. तर योजना …

Read More »

‘दिबां’च्या नावासाठी डोंबिवलीत सर्वपक्षीय कृती समितीची बैठक

डोंबिवली : रामप्रहर वृत्त नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव द्यावे, या मागणीसाठी सोमवारी (दि. 14) डोंबिवली येथे सर्वपक्षीय कृती समितीची बैठक झाली. या बैठकीमध्ये 24 तारखेला होणार्‍या आंदोलनासंदर्भात दिशा ठरविण्यात आली. या बैठकीला नवी मुंबई विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार …

Read More »

भाजप किसान मोर्चाचा शेतकर्‍यांना दिलासा

खालापूर : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील अनेक शेतकर्‍यांना पीक कर्ज मिळाले नाही किंवा सोसायटीचे अधिकारी अजय भारती टाळाटाळ करतात. शेकाप कार्यकर्त्यांनाच प्राधान्य देतात, अशा अनेक तक्रारी आल्याने भारतीय जनता पक्ष किसान मोर्चाचे सुनील गोगटे पीडित शेतकर्‍यांना घेऊन खालापूर सोसायटी ऑफिसमध्ये जाऊन तेथील अधिकारी अजय भारती यांना जाब विचारला. काही अडचणीमुळे काही …

Read More »