नवी मुंबई : रामप्रहर वृत्त वाढत्या कोरोना रुग्णांमुळे पंधरा दिवसांपूर्वी शहरात सर्वच प्रकारच्या खाटांचा तुटवडा निर्माण झाला होता. रुग्णांना खाटांच्या प्रतीक्षेत थांबावे लागत होते. शहरातील ही गंभीर परिस्थिती आता बदलली आहे. दैनंदिन रुग्ण तीनशेच्या घरात आले असून पालिकेच्या डॅशबोर्डवर शहरातील रुग्णालयांमध्ये 50 टक्के खाटा रिक्त असल्याचे चित्र आहे, मात्र अतिदक्षता, …
Read More »तिसर्या लाटेची तयारी
दुसरी लाट शिखर गाठण्याआधीच तिसर्या लाटेचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. केंद्र सरकारचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार के. विजय राघवन यांनी तिसरी लाट कधीही येऊ शकते असा इशारा अधिकृतरित्या दिला आहे. कोरोनाची तिसरी लाट नेमकी कधी आणि कशी येईल, तिचा जोर कितपत असेल याचा अंदाज मात्र तज्ज्ञांनाही अजुन आलेला नाही. तथापि, …
Read More »आदर्श विवाह सोहळा : अकरा जणांच्या उपस्थितीत निवृत्त मुख्याधिकार्यांच्या कन्येचा विवाह
कर्जत : प्रतिनिधी येथील नगर परिषदेचे सेवानिवृत्त मुख्यधिकारी दादाराव अटकोरे यांनी आपल्या मुलीचा विवाह सोहळा अवघ्या अकरा जणांच्या उपस्थितीत संपन्न करून कोरोना महामारीच्या काळात समाजापुढे एक आदर्श ठेवला. शासनाने कितीही निर्बंध आणले तरी त्याचे तंतोतंत पालन होतेच असे नाही. मध्यतंरी विवाह सोहळ्यासाठी 50 जणांची उपस्थिती असावी असा आदेश होता मात्र …
Read More »अलिबाग येथील कौटुंबिक न्यायालयाचे उद्घाटन
अलिबाग : वैवाहिक वादाची तसेच कौटुंबिक हिंसाचाराची प्रकरणे जलदगतीने व सामोपचाराने निकाली निघावीत या हेतूने अलिबाग येथे सुरु करण्यात आलेल्या कौटुंबिक न्यायालयाचे मंगळवारी (दि. 5) उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. रायगडच्या प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विभा इंगळे, पालकमंत्री …
Read More »कर्जतमध्ये 18 ते 45 वयोगटासाठीही लसीकरण
कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार शहरात तीन तीन लसीकरण केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यापैकी पहिले लसीकरण केंद्र गुरुवारी (दि. 6) सुरू करण्यात आले. आज पहिलाच दिवस असल्याने लस घेण्यासाठी नागरिकांनी पहाटे पाच वाजल्यापासूनच गर्दी केली होती. या केंद्रावर 18 ते 45 वयोगटासाठीही लसीकरण करण्यात आले. कर्जत उप जिल्हा …
Read More »आदिवासी वाड्यांमध्ये पाणीटंचाई; सुधागडातील दांड कातकरवाडीतील महिलांची घोटभर पाण्यासाठी वणवण
पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील आदिवासी वाड्यांना भीषण पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या असून, दांड कातकरवाडीतील लहानग्यांसह वृद्ध महिलांची घोटभर पाण्यासाठी रखरखत्या उन्हात फरफट होत असल्याचे चित्र दिसून येतंय. उन्हाळ्यात उद्भवणार्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी तालुक्यातील काही गावात नळ पाणीपुरवठा योजना राबविण्यात आल्या आहेत. तर बहुतांश ठिकाणी नदी, विहिरी, तलावांतील पाण्याचा वापर …
Read More »पोलादपूर तालुक्यामधील परसुले गावातील प्राथमिक शाळेची इमारत पुन्हा उद्ध्वस्त
पोलादपूर : प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळात छप्परावरील कौले उडालेली पोलादपूर तालुक्यातील परसुले गावामधील प्राथमिक शाळेच्या इमारतीची दुरुस्ती केल्यानंतर मंगळवारी (दि. 4) संध्याकाळी झालेल्या वादळी पावसामध्ये ही शाळा पुन्हा एकदा उद्ध्वस्त झाली आहे. पोलादपूर तालुक्यात मंगळवारी सायंकाळी झालेल्या वादळीवारा व पावसामुळे अनेक झाडांच्या फांद्या तुटून रस्त्यावर तसेच इमारतींवर कोसळल्या. शहरात पावसाचे काही …
Read More »जिल्हा शासकीय रुग्णालयात चतुर्थश्रेणी कर्मचार्यांची तातडीने भरती करा; भाजपची मागणी
अलिबाग : प्रतिनिधी येथील रायगड जिल्हा शासकीय रुग्णालयात नर्सेस भरतीला सुरूवात झाली आहे. येथील स्वच्छतेची समस्या पाहता चतुर्थश्रेणी कर्मचार्याचीदेखील तातडीने भारती करा, अशी मागणी भाजप दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांनी जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. सुहास माने यांच्याकडे केली आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात प्रशिक्षीत नर्सेस भरतील सुरुवात झाली आहे. …
Read More »खावटीची घोषणा कागदावरच; सुधागडातील आदिवासी अनुदानाच्या प्रतीक्षेत
पाली : प्रतिनिधी दुर्गम भागात वास्तव्यास असलेल्या आदिवासी, कातकरी समाज बांधवांना राज्य शासनाकडून खावटी अनुदान स्वरूपात मदत जाहीर करण्यात आली होती. मात्र आजतागायत ही मदत आमच्या बँक खात्यात जमा झालीच नाही, अशी ओरड सुधागड तालुक्यातील आदिवासी कातकरी समाज बांधवांतून होताना दिसत आहे. दरवर्षी पावसाळ्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत रोजगार …
Read More »आक्षी येथील शिलालेखाचे संवर्धन व्हावे
रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यामधील आक्षी येथील शिलालेख हा मराठी भाषेतील आद्य शिलालेख म्हणून ओळखला जातो. मात्र इतिहासाच्या या अमुल्य ठेव्याच्या नशिबी उपेक्षाच आली आहे. आक्षी येथील एका रस्त्याच्या कडेला हा शिलालेख धुळ खात पडून आहे. पुरातत्व विभागानेही शिलालेखाच्या संवर्धनासाठी फारसे प्रयत्न केलेले नाही. शिलालेखावरील अक्षरे अस्पष्ट होण्यास सुरवात झाली आहे. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper