पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीतील चांगू महाविद्यालयात सन 2021-22 या शैक्षणिक वर्षापासून पत्रकारितेचे शिक्षण घेऊ इच्छिणार्या, मराठी भाषेची गोडी असणार्या बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पत्रकारिता पदविका अभ्यासक्रम (डिप्लोमा इन जर्नालिझम) सुरू करण्यात आला आहे. हा अर्धवेळ अभ्यासक्रम असून शनिवार, रविवार या सुटीच्या दिवसांत चालविला जाणार …
Read More »मुसळधार पावसात आदिवासी बांधवाचे घर कोसळले
सारडे बेलवाडी येथील घटना उरण : प्रतिनिधी मुसळधार पडणार्या पावसात उरण तालुक्यातील सारडे बेलवाडी येथील एका आदिवासी बांधवाचे घर कोलमडून पडले. सुदैवाने घरात कोणीच नसल्याने जीवितहानी टळली. दरम्यान, सामाजिक संघटनांनी पुन्हा नव्याने घर बांधण्यासाठी पुढाकार घेतला आहे. सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसामुळे चंदा नारायण वाघमारे यांचे राहते घर (झोपडी) कोलमडून …
Read More »नवी मुंबईतही लवकरच घरोघरी लसीकरण
नवी मुंबई : प्रतिनिधी नवी मुंबई महापालिका प्रशासनाने आता अंथरुणाला खिळलेल्या नागरिकांसाठी त्यांच्या घरी जाऊन त्यांना लस देण्याचे ठरविले आहे. याचे नियोजन पूर्ण झाले असून लवकरात लवकर ही मोहीम सुरू होईल, असे आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले. याआधी पालिकेने अपंगांसाठी ड्राइव्ह इन लसीकरण, बेघरांसाठी बसस्थानके व चौकांत जाऊन लसीकरणाचे स्तुत्य …
Read More »धोकादायक पुलांची दुरुस्ती करा
अतिवृष्टीमुळे रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील काशिदजवळील पूल वाहून गेला. त्यामुळे महाडच्या सावित्री पूल दुर्घटनेच्या स्मृती जाग्या झाल्या. या दुर्घटनेमुळे जिर्ण आणि धोकादायक पुलांचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. बांधकाम विभागाने दिलेल्या अहवालानूसार जिल्ह्यातील अनेक पूल आजही धोकादयाक अवस्थेत कायम आहेत. काशीद येथील दुर्घटनेची दखल घेऊन रायगड जिल्ह्यातील धोकादायक पुलांच्या …
Read More »कोकणावर अवकृपा
कोकणापासून मुंबईपर्यंत किनारपट्टीचा मोठा पट्टा अतिवृष्टीचे संकट झेलत असताना राज्य सरकार नेमके काय करत आहे हा एक प्रश्नच आहे. निसर्ग चक्रीवादळ असो वा तौक्ते वादळ, या नैसर्गिक आपत्तींमध्ये भरडून निघालेल्या रायगड तसेच कोकणवासियांना आजही मदत मिळालेली नाही. महाड, चिपळूण परिसरात गुरूवारी आलेल्या महाप्रलयामध्ये नुकसान झेलणार्या नागरिकांनी मग सरकारकडून नेमकी काय …
Read More »मंदिरे भाविकांसाठी खुली करावीत
गुरव समाजाची जिल्हाधिकार्यांकडे मागणी पेण : प्रतिनिधी कोरोनाचा प्रभाव कमी झाला असल्याने मंदिरे खुली करावीत, अशी मागणी रायगड मुंबई गुरव समाज संघटनेेचे खजिनदार बंडू खंडागळे यांनी जिल्हाधिकार्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मंदिरे गेली दोन वर्षे बंद असल्याने अनेक गुरव समाज बांधवांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्याचबरोबर मंदिराबाहेरील फूल, …
Read More »माणगावात बकरी ईद उत्साहात
माणगाव : प्रतिनिधी तालुक्यात बुधवार (दि. 21) ईद-उल-अजहा म्हणजेच बकरी ईद उत्साहात साजरी करण्यात आली. मुस्लिम बांधवानी एकमेकांना गळाभेट देत बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या. तसेच हिंदू बांधवांनीही मुस्लिम बांधवांची घरोघरी भेट घेऊन तसेच दूरध्वनीवरून बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यावर्षीही मुस्लिम बांधवानी प्रशासनाने घालून दिलेले निर्बंध व नियमांचे …
Read More »पूरग्रस्त भागातील पंचनामे करून लवकरात लवकर भरपाई द्या
आमदार रविशेठ पाटील यांच्या अधिकार्यांना सूचना पेण : प्रतिनिधी मुसळधार पावसाने पेण तालुक्यातील बाळगंगा, पाताळगंगा आणि भोगावती या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने अनेकांच्या घरांचे नुकसान झाले. आमदार रविशेठ पाटील यांनी मंगळवारी (दि. 20) या पुरग्रस्त भागाची पाहणी केली. व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. अतिवृष्टीमुळे पेण …
Read More »अंबा नदीने ओलांडली धोक्याची पातळी
पाली व जांभूळपाडा पूल पाण्याखाली; वाहतूक ठप्प पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे बुधवारी (दि. 21) अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली. त्यामुळे वाकण-पाली-खोपोली मार्गावरील पाली व जांभुळपाडा पुलावरून पाणी गेले. या पुलांच्या दोन्ही बाजूंकडील वाहतूक तासनतास ठप्प झाली होती. तसेच जांभुळपाडा ते कळंब, जांभुळपाडा ते माणगाव बुद्रुक …
Read More »देवदूत मयूर शेळके यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर
कर्जत : बातमीदार मध्य रेल्वेच्या वांगणी स्थानकात एका लहान मुलाचा जीव वाचवणारा देवदूत मयूर शेळके यांना कोकण विभाग पत्रकार संघाने कोकण शौर्य हा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर केला आहे. कोकण विभाग पत्रकार संघाचा वर्धापन दिन सोहळा बुधवारी (दि. 28) मुरबाड तालुक्यातील संगम येथील देशमुख मराठा सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper