पनवेल ः वार्ताहर तालुक्यातील ताडपट्टी मालडुंगे परिसरातील आदिवासी बांधवांसह विधवा व अपंगांना पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्यात आली. ताडपट्टी मालडुंगे परिसरातील काही आदिवासी बांधवांसह विधवा व अपंगांना अद्यापपर्यंत जीवनावश्यक वस्तू मिळाल्या नसल्याची माहिती पत्रकार संजय कदम यांनी पनवेल तालुका पोलीस …
Read More »पोलीस ठाण्यात निर्जंतुकीकरण फवारणी
पनवेल ः वार्ताहर रामटेक दिपकेर पेस्ट कंट्रोल (नेरूळ) नवी मुंबई विभागाच्या माध्यमातून खांदेश्वर पोलीस ठाण्यात निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिप पेस्ट कंट्रोलकडून खांदेश्वर पोलीस ठाणे इमारतीत व पोलिसांच्या वापरात येणार्या वाहनांवर निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली. दीप पेस्ट कंट्रोल यांनी केलेल्या कामाबद्दल खांदेश्वर पोलीस अधिकारी-कर्मचार्यांनी त्यांचे आभार व्यक्त …
Read More »मुंबईत कार्यरत नवी मुंबईकरांमुळे कोरोनाचा धोका
मुंबईतच वास्तव्याची तरतूद करावी; महापौर जयवंत सुतार यांची मागणी नवी मुंबई ः प्रतिनिधी नवी मुंबईत वास्तव्यास असणारे अनेक आरोग्य अधिकारी, नर्सेस, बँक कर्मचारी मुंबई महापालिका क्षेत्रात कार्यरत आहेत. यातील अनेकांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे नवी मुंबईतील अशा कर्मचार्यांची मुंबईतील कार्यरत असलेल्या त्याच ठिकाणीच वास्तव्याची तरतूद करावी, अशी मागणी नवी …
Read More »छात्रभारतीकडून मजुरांना मदतीचा हात
मोहोपाडा ः प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे मजुरांच्या हाताला काम नसल्यामुळे त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची उपासमार होऊ नये यासाठी छात्रभारती पुढे येऊन काम करीत आहे. मोहोपाडा (नवीन पोसरी) येथे आतापर्यंत छात्रभारतीच्या वतीने 30 कष्टकरी मजुरांना व कुटुंबीयांना 218 किलो तांदूळ, 218 किलो आटा, 90 लिटर तेल, 70 किलो डाळ, 60 …
Read More »उरणकरांचा पाणीपुरवठा आठवड्यातून एक दिवस बंद
उरण : प्रतिनिधी उरण तालुक्याला पाणीपुरवठा करणार्या रानसई धरणात जून अखेरपर्यंत पिण्याच्या पाण्याचा साठा उपलब्ध आहे, मात्र पाऊस लांबणीवर पडल्यास खबरदारीची उपाययोजना म्हणून 3 मेच्या लॉकडाऊननंतर आठवड्यातून एक दिवस ग्रामपंचायत आणि नगर परिषद क्षेत्रातील पाणीपुरवठा बंद करून शटडाऊन घेण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे उरण विभागाचे उपअभियंता रंजित …
Read More »शिधावाटप दुकाने बंद ठेवणार्यांवर कारवाई
शिधावाटप उपनियंत्रकांचे आदेश; परवाने होणार रद्द पनवेल ः बातमीदार नवी मुंबईमधील ऐरोली, दिघा ते बेलापूरपर्यंत पसरलेल्या शिधावाटप दुकानदारांनी 1 मेपासून मोफत अन्नधान्य वाटप करणार नसल्याची भूमिका घेतली आहे. नियमित धान्यवाटप झाले की शिधावाटप दुकाने बंद केली जातील, असेही स्पष्ट केले आहे. या आशयाचे पत्र मुख्य शिधावाटप अधिकार्यांना दिले आहे. दुकानदारांच्या …
Read More »‘कोरोना रुग्ण नसलेल्या भागात लघुउद्योग सुरू करावे’
खोपोली : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील कोरोनाबाधित नसलेल्या तालुक्यांमध्ये छोट्या-छोट्या उद्योगांना परवानगी द्यावी, असंघटित क्षेत्रातील कामगारांना इतर खर्चासाठी आर्थिक मदत द्यावी, त्याचप्रमाणे स्थलांतरित कामगारांना परतीसाठी त्यांच्या भागात विशेष रेल्वेसेवा सुरू करावी या व इतर मागण्या खोपोलीचे माजी नगराध्यक्ष दत्तात्रेय मसुरकर यांनी केल्या आहेत. यासोबत त्यांनी विविध गोष्टींकडे मुख्यमंत्र्यांचे पत्राद्वारे लक्ष वेधले …
Read More »माथेरानमधील अश्वांना खाद्यवाटप; अश्वपालकांना दिलासा
माथेरान : रामप्रहर वृत्त येथील वाहतुकीचे प्रमुुख साधन असलेल्या घोड्यांचे लॉकडाऊन काळात खाद्याअभावी हाल होऊ नयेत यासाठी माथेरानबाहेरील अनेक स्वयंसेवी संस्थांनी तसेच दानशूर व्यक्तींनी अश्वखाद्य पुरविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे अश्वपालकांना दिलासा मिळाला आहे. रायगड जिल्हा हर हर चांगभलं धनगर समाज संस्थेचे अध्यक्ष संतोष आखाडे यांनी अश्वखाद्य मिळावे यासाठी नवी …
Read More »कर्जत तालुक्यात विंधण विहिरी खोदण्यास परवानगी
कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यातील दुर्गम भागात दरवर्षी उन्हाळ्यामध्ये पाणीटंचाई जाणावत असते. पाणीटंचाईग्रस्त गावे आणि वाड्यांना दिलासा देण्यासाठी शासनाच्या वतीने विंधण विहिरी खोदण्यात येतात. या वर्षी तालुक्यातील 19 ठिकाणी विंधण विहिरी खोदण्यास परवानगी देण्यात आली असून त्यासाठी कर्जत तालुका पाणीटंचाई कृती समितीने 13 लाख रुपयांची तरतूद केली आहे. कर्जत तालुक्यात …
Read More »खालापुरात अन्नधान्य पुरवठ्यासाठी सज्जता
खोपोली : प्रतिनिधी लॉकडाऊनमध्ये अनेक कुटूंबांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत पडली असून, कोणीही उपाशी राहू नये यासाठी खालापुरात प्रशासनानेदेखील कंबर कसली आहे. खालापूर तालुक्यात 131 रास्तभाव दुकान आहेत. अंत्योदय आणि प्राधान्य लाभार्थी कुटूंबाला तांदूळ आणि गहूपुरवठा करण्यात आला आहे. 8677 अंत्योदय लाभार्थींना 25 किलो तांदूळ आणि 10 किलो गहू वाटप …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper