Breaking News

Ramprahar Team

नेरळमध्ये व्यापार करणार्यांना पोलिसांची ताकीद

अनेकांचे पासेस रद्द; व्यवसायाच्या ठिकाणीच राहण्याचे आदेश कर्जत ः बातमीदार नेरळ बाजारपेठेत किराणा व्यवसाय करणारे व्यावसायिक हे अंबरनाथ, उल्हासनगर व ठाणे येथून येऊन व्यवसाय करतात आणि पुन्हा घरी परततात. त्यामुळे नेरळ गावात याची चर्चा सुरू असून जिल्हा प्रशासनाने याबाबत कडक भूमिका घेण्याचे आदेश दिले आहेत, तर पोलिसांनी उल्हासनगरमधून येणारी एक …

Read More »

आदिवासी बांधवांना मदत

उरण : लॉकडाऊनमध्ये रोजंदारीवर जगणार्‍या आदिवासी बांधवांना मदतीचा हात देण्याचा प्रयत्न अ‍ॅड. निग्रेश पाटील आणि मित्र परिवार यांनी करून त्यांना रेशन, जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. त्याचप्रमाणे गाव संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष तथा स्वराज्य रिक्षा संघटना अध्यक्ष अ‍ॅड. निग्रेश पाटील आणि मित्र परिवार यांच्या वतीने जांभुळपाडा आदिवासीवाडी, कंठवली आदिवासीवाडी, विंधणे …

Read More »

उनपाचे कोरोना संसर्ग नियंत्रण पथक

उरण : रामप्रहर वृत्त जगासह आपल्या देशात व राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे बळी जाणार्‍यांचा आकडा दिवसेंदिवस फुगत चालला आहे. हा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी संसर्ग नियंत्रण कक्षाची नियुक्ती करण्यात आली आहे. उरण नगरपालिकेनेही नोडल अधिकारी, मुख्याधिकारी अवधूत तावडे यांच्या नेतृत्वाखाली कोरोना संसर्ग नियंत्रण पथकाची  नियुक्ती केली आहे. …

Read More »

कोरोनाबाधित महिलेची यशस्वी प्रसूती

आई व बाळ दोघेही सुखरूप पनवेल, नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबई महापालिकेच्या कोरोनाबाधित रुग्णांसाठी राखीव ठेवलेल्या वाशी येथील रुग्णालयात कोरोनाचा संसर्ग झालेल्या महिलेची यशस्वीरित्या प्रसूती करण्यात आली. ही महिला व बाळ दोघेही सुखरूप असल्याची माहिती महापालिका सूत्रांनी दिली. वाशी येथील नवी मुंबई महापालिकेच्या सार्वजनिक रुग्णालयाचे ’कोविड-19’ रुग्णालयात काही दिवसांपूर्वी …

Read More »

पत्रकार संघटनेकडून गरजूंना मदतीचा हात

पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. त्याच्यापासून बचाव करण्यासाठी आपल्या घरात सुरक्षित राहणे हा एकमेव पर्याय आहे. लॉकडाऊन परिस्थितीमध्ये हातावर पोट असणार्‍यांसाठी मात्र जगणे अत्यंत अवघड बनले आहे. लॉकडाऊन परिस्थितीमध्ये उदरनिर्वाहाचा प्रश्न ज्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. अशा लोकांच्या मदतीसाठी पनवेलची तालुका पत्रकार विकास मंच ही संस्था …

Read More »

कोरोनाचे विषाणू म्हणजे हवेतील सुरुंग -डॉ. ययाती गांधी

पनवेल : प्रतिनिधी युद्धात बाँबस्फोट अथवा सुरुंगस्फोट होऊन जीवितहानी होते. बाहेर पडल्यास तशीच जीवितहानी कोरोनामुळे होते हे लक्षात असू द्या, कोरोनाबाबत अजूनही जनमानसात हवे तितके गांभीर्य दिसत नसल्याने पनवेलमधील डॉ. ययाती प्रभाकर गांधी यांनी नागरिकांना काळजी घ्या, स्वतःची अन् इतरांची ही असा सल्ला दिला आहे. हस्तांदोलनातून तसेच पृष्ठभागांशी प्रत्यक्ष स्पर्श …

Read More »

भाजप नगरसेविकेने राबविला आरोग्यविषयक उपक्रम

नवी मुंबई : बातमीदार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रहिवासी भयभीत असताना त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी नेरूळ पश्चिमेला प्रभाग 96च्या भाजपच्या स्थानिक नगरसेविका रूपाली भगत व समाजसेवक गणेश भगत यांनी आरोग्यविषयक उपक्रमांचा धडाका लावत स्थानिक रहिवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. कोरोनाचे पडघम वाजू लागताच नगरसेविका रूपाली भगत व समाजसेवक गणेश भगत यांनी …

Read More »

भाजप नेते चंद्रकांत घरत यांच्याकडून उरणमध्ये गरिबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

उरण : वार्ताहर कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये यासाठी शासनाने 21  दिवसांचे लॉकडाऊन केले आहे. हातावर पोट असलेल्या गरिबांचे खूप हाल झाले आहेत. त्यांना हाताला काम नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे. उरणचे आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप रायगड जिल्हा ओबीसी सेलचे अध्यक्ष चंद्रकांत घरत यांच्या वतीने गरिबांना सोमवारी (दि. …

Read More »

नियमांचे उल्लंघन करून सोसायटीची बैठक

कामोठ्यातील यमुना गृहनिर्माण संस्थेतील प्रकार; रहिवाशांमध्ये चिंतेचे वातावरण कळंबोली : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याची कोरोनाच्या साथीने झोप उडविली आहे. देशात, राज्यात आणीबाणीची परिस्थिती असताना पनवेल महानगरपालिका हद्दीतील कोमोठे येथील यमुना गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी गृहनिर्माण संस्थेच्या आवारात मंगळवारी (दि. 7) सकाळी 11.30 वाजता खुली बैठक घेतली. संचारबंदी, लॉकडाऊन कलम 144 व सूचनांचे, …

Read More »

कोरोनाविरुद्धचा लढा

जगभरात विशेषत: युरोपात तसेच महासत्ता अमेरिकेत कोरोनामुळे हाहाकार उडाला आहे. भारतातही कोरोनाग्रस्त दिवसेंदिवस वाढत आहेत. असे असले तरी इतर देशांच्या तुलनेत आपल्याकडे रुग्ण व मृतांचा आकडा मोठा नाही. सरकारने वेळीच उचललेल्या ठोस पावलांमुळे आपण 130 कोटी नागरिक सुरक्षित आहोत, मात्र धोका अजूनही टळलेला नाही. सध्या सगळीकडे एकच चर्चा आहे ती …

Read More »